परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी  या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे  दर्शन घेतलं.  जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...

MB NEWS-*विकास कामं करताना मी कधी भेदभाव केला नाही, आताच्या पालकमंत्र्याकडून मात्र भेदभाव - पंकजाताई मुंडे*

  *विकास कामं करताना मी कधी भेदभाव केला नाही, आताच्या पालकमंत्र्याकडून मात्र भेदभाव - पंकजाताई मुंडे*



*लक्ष्मी हरवलीय म्हणून बीड जिल्हयाला वाईट दिवस आले*


*तुमच्या कामासाठी मला सत्तेची गरज नाही ; तुमचा आशीर्वाद हाच   मंत्रीपदापेक्षा खूप मोठा*


*केज पंचायत समितीच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे थाटात लोकार्पण*


केज ।दिनांक २५। 

विकास काम करताना कोणतं गांव कोणत्या पक्षाचं हे पाहिलं नाही, मी कामे करताना भेदभाव केला नाही. मात्र, आताचे पालकमंत्री भेदभाव करतात. आम्ही शुन्याने गुणणारी कामं करणारी नाहीत असा घणाघात भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी केला. लक्ष्मी हरवलीय म्हणून बीड जिल्हयाला वाईट दिवस आलेत असं सांगतानाच मला तुमची कामे करण्यासाठी  सत्तेची गरज नाही तुमचा आशीर्वाद हा मला मंत्रीपदापेक्षा खूप मोठा आहे असेही त्या म्हणाल्या.


  केज पंचायत समितीच्या आठ कोटी रूपये खर्च करून बांधण्यात आलेल्या नवीन प्रशासकीय इमारतीचे व कर्मचारी निवासस्थानाचे लोकार्पण पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते आज कोरोनाचे सर्व नियम पाळून मोठया थाटात संपन्न झाले, त्यावेळी त्या बोलत होत्या. ग्रामविकास मंत्री असताना पंकजाताई मुंडे यांनी जिल्हय़ातील सर्व पंचायत समित्यांना नवीन इमारतीसाठी मोठा निधी दिला होता, त्याचेच लोकार्पण आज झाले. आ. नमिता मुंदडा, भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, रमेश आडसकर, अक्षय मुंदडा, पं.स. सभापती परिमला घुले, विष्णू घुले, उप सभापती ऋषीकेश आडसकर, संतोष हंगे, संदीप पाटील, उषाताई मुंडे, योगिनी थोरात, विजयकांत मुंडे, अशोक लोढा, भरत काळे आदी यावेळी उपस्थित होते.


   पुढे बोलतांना पंकजाताई म्हणाल्या, मीडियाला विनंती आहे, एकदा लोकांमध्ये जाऊन विचारा. मी जेव्हा पालकमंत्री होते, तेव्हा खूप काही केले. माझ्या वडिलांचे ऋण उतरवण्याचे काम केले. मात्र मागच्या पाच वर्षात स्थिती उलट झाली. हा जनतेसाठी मोठा धडा आहे. आपल्या जिल्ह्यातील लक्ष्मी हरवली आहे. म्हणून बीड जिल्ह्याला वाईट दिवस आले आहेत. शेतकरी म्हणतात विमा मिळाला नाही, तेव्हा मला वाईट वाटते. मी पालकमंत्री असते तर अधिकाऱ्यांचे कान धरले असते. शेतकऱ्यांचे काम आधी केले असते. मी विकास करताना कोणते गाव कुठल्या पक्षाचे आहे, हे पाहिले नाही. मात्र सध्याच्या पालकमंत्र्यांनी भेदभाव केला. बीड जिल्ह्यातील राजकारणी कंत्राटदार झाले आहेत. मी बारामतीच्या पंचायत समितीला निधी दिला होता, मात्र भेदभाव कधीही केला नाही.


..*त्यांना आयत्या पीठावर रेघोटया ओढण्याची सवय*

-----------------

रेल्वेला निधी दिला म्हणून बढाया मारता. पण हा प्रकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विशेष तरतूद करून मंजूर केला आहे. तुमचं सरकार राज्यात होतं त्यावेळेस जिल्हयाला निधी का दिला नाही. आयत्या पिठावर रेघोटया ओढण्याची सवय यांना लागली आहे अशी टिका त्यांनी केली. नगरपंचायत निवडणुकीत आमचा विजय नाही मात्र विरोधकांचा पराभव मोठा आहे असेही त्या म्हणाल्या.


*सामान्य जनतेची लूट पाहवत नाही ; रस्त्यावर उतरून आवाज उठवू*

--------------

सुरुवातीला आम्ही दोन वर्ष शांत बसलो होतो. राजकारण नको, नवीन आहात म्हणून कुणावर टीकाटिप्पणी केली नाही. मी काम केली,कसलीही अपेक्षा केली नाही, मात्र आज बीड जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या माफियाराज आणि सामान्य लोकांची लूट पाहावत नाही. म्हणून रस्त्यावर उतरून न्याय मागणार असल्याची भूमिका त्यांनी बोलून दाखवली. आम्ही गप्प बसणार नाही, सामान्य लोकांच्या हितासाठी आलेलं सरकार आहे, लोकांच्या हिताकडे दुर्लक्ष झालं तर त्यांना आम्ही क्षमा करणार नाही. त्यांच्या विरोधात रस्त्यावर उतरून आवाज उठवूं. असं पंकजाताई मुंडे म्हणाल्या.  आम्ही पुढच्या निवडणुका देखील जिंकू जनता आमच्या पाठिशी आहे असेही त्यांनी सांगितले.

••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!