युवकांचा स्तुत्य उपक्रम....

इमेज
  महेश नवमीनिमित्त माहेश्वरी मित्र परिवारातर्फे गुरुकुलातील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप परळी वैजनाथ: प्रतिनिधी.... दरवर्षीप्रमाणे या वर्षीही महेश नवमीचा उत्सव अत्यंत उत्साहात आणि श्रद्धेने साजरा करण्यात आला. या महोत्सवाचे औचित्य साधून श्री स्वामी श्रद्धानंद गुरुकुल येथील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप करण्यात आले. युवकांच्या या कौतुकास्पद कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. हा सेवा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सिद्धांत मंत्री, केदार सारडा, हर्ष भंडारी, रुपेश बंग, अथर्व कलंत्री, अनिकेत सारडा, श्याम बजाज, यश डीडवाणी, श्रीनिवास जाजू, युवराज जाजू, गोकुल भंसाली, गणेश सोनी, तेजस इनदानी, जय तोष्णीवाल, यश लोढा तसेच समस्त माहेश्वरी मित्र परिवाराचे विशेष सहकार्य लाभले. माहेश्वरी मित्र परिवारातर्फे सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहे. समाजसेवा आणि सुसंस्कारांचे हे कार्य आपण सर्वांच्या साथीने असेच पुढे सुरू ठेवूया, असा संकल्प यावेळी करण्यात आला.

MB NEWS- *महिला व बाल विकास विभागाची पदे राज्यसेवा परीक्षेतून भरण्याऐवजी सरळसेवेने भरावित; हजारो विद्यार्थ्यांची मागणी* 🕳️ _परिक्षेची तयारी करणारे उमेदवार आंदोलनाच्या मार्गावर_

 *महिला व बाल विकास विभागाची पदे  राज्यसेवा परीक्षेतून भरण्याऐवजी सरळसेवेने भरावित; हजारो विद्यार्थ्यांची मागणी*

🕳️ _परिक्षेची तयारी करणारे उमेदवार आंदोलनाच्या मार्गावर_


परळी वैजनाथ, प्रतिनिधी.....

       महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) सरळसेवा परीक्षेतून भरण्यात येणारी महिला व बाल विकास विभागाची पदे आता राज्यसेवा परीक्षेतून भरली जाणार असल्याचे सांगितले जात आहे.त्यामुळे परिक्षेची पूर्वतयारी करणार्यांना मानसिक कुचंबणा सहन करावी लागत आहे. विभागातील बालविकास प्रकल्प अधिकारी (नागरी), सहायक आयुक्त, परिविक्षाधीन अधीक्षक, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, जिल्हा कार्यक्रम अधिकारी (महिला व बालविकास) ही पदे आता सरळसेवा परीक्षा पद्धतीने न भरता राज्यसेवा परीक्षेतून भरली जाणार आहेत.ही पदे  राज्यसेवा परीक्षेतून भरण्याऐवजी सरळसेवेने भरावित अशी हजारो विद्यार्थ्यांची मागणी आहे. अन्यथा परिक्षेची तयारी करणारे उमेदवार आंदोलनाच्या मार्गावर आहेत.

      ‘एमपीएससी’च्या या निर्णयावर परीक्षेच्या विशेष तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. या निर्णयाची कोणतीही पूर्व कल्पना दिलेली नाही. यामुळे अनेक विद्यार्थ्‍यांचे नुकसान होणार आहे. ‘एमपीएससी’ने एक संधी देऊन या विभागातील पदांची परीक्षा पुन्हा सरळसेवेने घ्यावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.

२०१४ नंतर कोणतीही वर्ग ‘अ’ पदाची परीक्षा झाली नाही.यावर्षी परीक्षा होईल, या आशेने चार वर्षांपासून विद्यार्थ्यांची तयारी सुरू आहे.बदललेल्या सेवा प्रवेश नियमामुळे विद्यार्थ्यांचे मानसिक खच्चीकरण होणार आहे.

गेल्या आठ वर्षांत विद्यार्थ्यांना पूर्व सूचना का दिली नाही? सरळसेवा परीक्षेला एक परिक्षा आणि थेट मुलाखत असे  स्वरूप होते.राज्यसेवा परीक्षेतून आता तीन टप्प्यांतून जावे लागणार आहे.महिला व बालविकास विभागांतर्गत येणाऱ्या महिला व बालविकास आयुक्तालयामधील बालविकास प्रकल्प अधिकारी (नागरी), सहायक आयुक्त, परिविक्षा अधीक्षक, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, जिल्हा कार्यक्रम अधिकारी (महिला व बालविकास) गट-अ पदांसाठी सेवाप्रवेश नियम यात बदल करून ही पदे सरळसेवेने न भरता आता राज्यसेवा परीक्षेद्वारे भरली जाणार आहेत. यामुळे मागील तीन वर्षांपासून या परीक्षेची तयारी करणारे शेकडो विद्यार्थी संकटात सापडले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

            आता ऐन वेळी जर सेवाशर्ती बदलून परीक्षा दुसऱ्या परीक्षेत वर्ग करत असतील तर मागील तीन वर्षापासून अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यावर हा अन्याय होणार असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. राज्यसेवा आणि आत्ता पर्यंतची सरळसेवा यांच्या परीक्षा पध्दतीत खूप विषमता आहे, बदल करायचा जरी असेल तर तो सावकाश एक ते दोन वर्षांच्या पूर्व सुचनेने करावा, केंद्रीय लोकसेवा आयोग देखील एक वर्ष पूर्वसूचना देऊन बदल करते आता अचानक करण्यात असलेल्या बदलामुळे आम्ही संकटात सापडलो असल्याचे या  विद्यार्थ्यांनी सांगितले.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या