दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न

इमेज
  चैत्यभूमी दादर येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न बीड ,प्रतिनिधी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, चैत्यभूमी दादर (पश्चिम), मुंबई येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, हे शिबिर दि. १२ मे ते २१ मे २०२६ या कालावधीत संपन्न होणार आहे. बौद्ध धम्माचा सखोल अभ्यास करण्याची इच्छा असलेल्या विविध समाजातील धर्मांतरित बौद्ध बांधवांसाठी हे विशेष शिबिर आयोजित करण्यात आले आहे. सत्यशोधक ओबीसी परिषद, सत्यशोधक समाज महासंघ, चर्मकार संघ, अखिल भारतीय धम्म महासंघ, प्रजासत्ताक जनता परिषद तसेच इतर विविध माध्यमांतून धर्मांतरित झालेल्या ओबीसी, पूर्वाश्रमीचे मातंग, वाल्मिकी, चर्मकार, ढोर समाजातील बौद्ध बांधवांना या शिबिरात सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय डॉ. भीमराव य. आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच संस्थेचे ट्रस्टी व राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा मुंबई केंद्रीय कार्यालय प्रमुख आद. अॅड. डॉ. एस. के. भंडारे यांच्या सल्ल्याने या शिबिराचे आय...

MB NEWS-माईंच्या जाण्याने "अनाथ" शब्दच हरवला -डॉ.शालिनीताई कराड

 माईंच्या जाण्याने "अनाथ" शब्दच हरवला -डॉ.शालिनीताई कराड 



"माई" म्हणजे आई... पद्मश्री सिंधुताई सपकाळ म्हणजे अवघ्या देशाची आई आणि जिला आपण माई म्हणतो. माईंनी गावसतील तेवढे अनाथ माणसं आणि गावसतील तेवढ्या गाई जमा करून त्यांचा सांभाळ केला. ही गोष्ट कोणालाही सोपी अशी नाही. शेकडो गाई आणि हजारो अनाथ सांभाळणारी कोण? तर ती माई? अशा अनेक अनाथांना आधार देणारी माय गेल्याने "अनाथ' हा शब्दच पोरका झाला आहे. डॉ.शालिनीताई कराड यांनी पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांच्या निधनानंतर त्यांच्या शोकभवना त्यांनी व्यक्त केल्या.

"स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी" ही म्हण सार्थ ठरवणाऱ्या माई आहेत. जगण्याला शॉर्टकट नसतो आणि मृत्यूला लाच देता येत नाही हे माईंचे वाक्य! वास्तविक जगणे त्या जगल्या. लोकजीवन, लोकसंस्कृती आणि लोकभ्यास करता करता त्यांनी डोक्यावरचा पदर खाली पडू दिला नाही हे विशेष. त्या 22 देश फिरल्या परंतु त्यांनी "नववारी" सोडली नाही. जगात भारी "नववारी" ही त्यांची मुलींना शिकवण. येणाऱ्या अनेक पिढ्यांसाठी दीपस्तंभ असणाऱ्या माईंचे जाणे म्हणजे अवघ्या राज्याला पोरके करून जाणे आहे असे प्रतिपादन डॉ.शालिनीताई कराड यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....