प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार

इमेज
चंद्रपूरच्या प्रदूषणावर ना. पंकजा मुंडे ॲक्शन मोडवर ; विधानसभेतील लक्षवेधीत मांडली परखड भूमिका प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न माझ्यासाठी महत्वाचा मुंबई, दि. २५ - चंद्रपूरसारख्या अतिप्रदूषित औद्योगिक क्षेत्रासाठी शॉर्ट टर्म, मिड टर्म आणि लॉंग टर्म गोल्सचा स्वतंत्र आराखडा तयार करण्यात आला असून तो चंद्रपूरमध्ये पायलट प्रकल्प म्हणून राबविण्यात येणार आहे असे स्पष्ट करत हा आराखडा अंतिम करून सभागृहासमोर सादर करण्यात येईल, नागरिकांचे आरोग्य  माझ्यासाठी महत्वाचे आहे असं राज्याच्या  पर्यावरण मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी आज विधानसभेत परखडपणे सांगितलं.   आ. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरमधील कोल वॉशरी, कोळसा खाणी, सिमेंट उद्योग आणि थर्मल पॉवर प्रकल्पांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मंत्री मुंडे म्हणाल्या की, मी काही दिवसांपूर्वी चंद्रपूरचा दौरा केला.या दौऱ्यात मी स्वतः अनेक उद्योग, कोल वॉशरी आणि प्रभावित गावांना भेटी दिल्या. त्या भागातील प्रदूषणाची तीव्रता प्रत्यक्ष पाहिल...

MB NEWS-रमाई आवास योजनेतून नाथऱ्याच्या 14 घरकुलांना मंजुरी* *जिल्हा परिषद गटनेते अजय मुंडे यांच्या हस्ते लाभार्थ्यांना मंजुरी आदेश वितरित*

  *रमाई आवास योजनेतून नाथऱ्याच्या 14 घरकुलांना मंजुरी*

*जिल्हा परिषद गटनेते अजय मुंडे यांच्या हस्ते लाभार्थ्यांना मंजुरी आदेश वितरित*


परळी (दि. 31) : रमाई आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत सन 2019-20 अंतर्गत परळी तालुक्यातील नाथरा येथील आणखी 14 घरकुलांना मंजुरी देण्यात आली असून, सदर मंजुरी आदेशांचे जिल्हा परिषद गटनेते अजय मुंडे यांच्या हस्ते संबंधित लाभार्थींना वितरण करण्यात आले. गावातील आणखी पात्र लाभार्थींना घरकुल मंजूर करून देण्यात येणार असल्याचे यावेळी श्री अजय मुंडे म्हणाले.


सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मार्फत मागासवर्गीय आर्थिक दुर्बल घटकांतील गरजू कुटुंबांचे स्वतःचे हक्काचे घर उभारण्याचे स्वप्न पूर्ण व्हावे, यासाठी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला जात आहे. 


बीड जिल्ह्यात मागील वर्षी ग्रामीण व शहरी भागातील सुमारे 8000 घरकुलांना मंजुरी देऊन निधी उपलब्ध करून देण्यात आला होता तर यावर्षी ग्रामीण व शहरी मिळून महाराष्ट्रात बीड जिल्ह्यात सर्वाधिक 15 हजार घरकुलांना मंजुरी देण्याच्या उद्दिष्टाला मान्यता देण्यात आली आहे.


दरम्यान नाथरा गावासह परळी तालुक्यातील पात्र असलेल्या प्रत्येकाला घरकुल योजनेतून स्वतःचे घर उभारता यावे, यासाठी ना. धनंजय मुंडे साहेबांच्या माध्यमातून प्रयत्न करत असल्याचे श्री. अजय मुंडे यांनी म्हटले, तसेच घरकुलांना मंजुरी मिळालेल्या सर्वांचे त्यांनी अभिनंदन केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या