प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार

इमेज
चंद्रपूरच्या प्रदूषणावर ना. पंकजा मुंडे ॲक्शन मोडवर ; विधानसभेतील लक्षवेधीत मांडली परखड भूमिका प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न माझ्यासाठी महत्वाचा मुंबई, दि. २५ - चंद्रपूरसारख्या अतिप्रदूषित औद्योगिक क्षेत्रासाठी शॉर्ट टर्म, मिड टर्म आणि लॉंग टर्म गोल्सचा स्वतंत्र आराखडा तयार करण्यात आला असून तो चंद्रपूरमध्ये पायलट प्रकल्प म्हणून राबविण्यात येणार आहे असे स्पष्ट करत हा आराखडा अंतिम करून सभागृहासमोर सादर करण्यात येईल, नागरिकांचे आरोग्य  माझ्यासाठी महत्वाचे आहे असं राज्याच्या  पर्यावरण मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी आज विधानसभेत परखडपणे सांगितलं.   आ. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरमधील कोल वॉशरी, कोळसा खाणी, सिमेंट उद्योग आणि थर्मल पॉवर प्रकल्पांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मंत्री मुंडे म्हणाल्या की, मी काही दिवसांपूर्वी चंद्रपूरचा दौरा केला.या दौऱ्यात मी स्वतः अनेक उद्योग, कोल वॉशरी आणि प्रभावित गावांना भेटी दिल्या. त्या भागातील प्रदूषणाची तीव्रता प्रत्यक्ष पाहिल...

MB NEWS-खोटे अट्रोसिटी गुन्हे मागे घ्या-सकल मराठा समाजाचे उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन

  खोटे अट्रोसिटी गुन्हे मागे घ्या-सकल मराठा समाजाचे उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन 

परळी वैजनाथ, प्रतिनिधी....

       गेल्या दीड वर्षभरात परळी तालुक्यातील मौजे दादाहरी वडगाव येथे अनेक खोटे अट्रोसिटी कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गावात कुठल्याही जातीच्या व्यक्तीचा इतर कुठल्याही माणसाचा द्वेष नाही. सर्वजण एकोप्याने राहतात. मात्र काही गावाबाहेरील नेतेमंडळी स्वतःची राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी समाजा-समाजात तेढ निर्माण करत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. खोट्या केसेस दाखल झाल्याच्या पार्श्वभूमीवर आज परळीत सकल मराठा समाजाच्या वतीने प्रशासनाला निवेदन देऊन तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी खोटे गुन्हे मागे घेण्याची मागणी लावून धरण्यात आली. 

गुन्हा दाखल नंतर होतो आणि आरोपी अगोदर अटक केला जातो हा प्रकार संशयास्पद असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. परळी ग्रामीण पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांचे एकतर्फी वागणे चुकीचे असून शहानिशा न करता गुन्हे दाखल करून घेण्याचा प्रकार चुकीचा आणि निषेधार्य आहे. गणेश शिंदे हा व्यक्ती अपंग असून कुठलीही चूक नसतांना त्याच्यावर खोटा अट्रोसिटी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात प्रत्यक्ष वयक्तिक प्रॉपर्टीचा वाद असून, यात मा.न्यायालयाने मनाई हुकूम काढलेला आहे. खोटे गुन्हे दाखल करून समाजा-समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना वेळीच चाप बसला पाहिजे अशी अपेक्षा मराठा आंदोलकांकडून व्यक्त करण्यात आली. त्याचबरोबर खोट्या गुन्ह्यांमध्ये दोषी असलेल्या लोकांवर कारवाई करावी व फरार आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा उग्र स्वरुपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा सकल मराठा समाजाच्या वतीने देण्यात आला आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या