प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार

इमेज
चंद्रपूरच्या प्रदूषणावर ना. पंकजा मुंडे ॲक्शन मोडवर ; विधानसभेतील लक्षवेधीत मांडली परखड भूमिका प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न माझ्यासाठी महत्वाचा मुंबई, दि. २५ - चंद्रपूरसारख्या अतिप्रदूषित औद्योगिक क्षेत्रासाठी शॉर्ट टर्म, मिड टर्म आणि लॉंग टर्म गोल्सचा स्वतंत्र आराखडा तयार करण्यात आला असून तो चंद्रपूरमध्ये पायलट प्रकल्प म्हणून राबविण्यात येणार आहे असे स्पष्ट करत हा आराखडा अंतिम करून सभागृहासमोर सादर करण्यात येईल, नागरिकांचे आरोग्य  माझ्यासाठी महत्वाचे आहे असं राज्याच्या  पर्यावरण मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी आज विधानसभेत परखडपणे सांगितलं.   आ. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरमधील कोल वॉशरी, कोळसा खाणी, सिमेंट उद्योग आणि थर्मल पॉवर प्रकल्पांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मंत्री मुंडे म्हणाल्या की, मी काही दिवसांपूर्वी चंद्रपूरचा दौरा केला.या दौऱ्यात मी स्वतः अनेक उद्योग, कोल वॉशरी आणि प्रभावित गावांना भेटी दिल्या. त्या भागातील प्रदूषणाची तीव्रता प्रत्यक्ष पाहिल...

MB NEWS-*रेजोनंस इंटिग्रेटेड स्कूलमुळे शालेय जीवनातच पाया पक्का होण्यास मदत होईल- बाजीराव भैय्या धर्माधिकारी* _कोटा (राजस्थान) येथील नामांकित आणि अग्रगण्य रेजोनंस इंटिग्रेटेड स्कूलचा परळीत शुभारंभ_

  *रेजोनंस इंटिग्रेटेड स्कूलमुळे शालेय जीवनातच पाया पक्का होण्यास मदत होईल- बाजीराव भैय्या धर्माधिकारी*



_कोटा (राजस्थान) येथील नामांकित आणि अग्रगण्य रेजोनंस इंटिग्रेटेड स्कूलचा परळीत शुभारंभ_

परळी वैजनाथ, प्रतिनिधी....

         श्रीहरिकोटा (राजस्थान) येथील देशभरातील नामांकित आणि अग्रगण्य "रेजोनंस करीअर अकॅडमी "यांनी परळी मधील फाऊंडेशन इंग्लिश स्कूल येथे "इंटिग्रेटेड स्कूल" सुरु केले आहे. या अभिनव उपक्रमाचे उद्घाटन माजी नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी व मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी बोलताना  रेजोनंस इंटिग्रेटेड स्कूलमुळे शालेय जीवनातच पाया पक्का होण्यास मदत होईल असे प्रतिपादन बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी केले.

        फाऊंडेशन इंग्लिश स्कूल येथे झालेल्या या उद्घाटन कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष माजी नगराध्यक्ष विजयप्रकाश तोतला, रेजोनंस चे उपाध्यक्ष अजय नागर ,नागेश त्रिपाठी ,अकॅडमीक चीफ झा ,रितू तोतला ,प्रभारी मुख्याध्यावपक गजानन  यांच्यासह गुरुजन,पालक व विद्यार्थी शिक्षणप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी पुढे बोलताना बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी सांगितले की, सध्याच्या स्पर्धात्मक परिस्थितीमध्ये एनटीएस, ओलंपियाड, नीट,जेईई यासह अनेक स्पर्धा परीक्षा बाबत विद्यार्थ्यांना शालेय जीवनातच पाया पक्का होणे गरजेचे आहे.मध्य भारत व उत्तर भारतातील पालक आपल्या पाल्यांचा पाया शालेय जीवनातच पक्का करतात. त्यामुळे आयुष्यात कुठलीही स्पर्धा परीक्षा ते विद्यार्थी सहज क्रॅक करु शकतात.अभ्यासक्रम आणि ज्ञान या दोन भिन्न बाबी असून आपला पाल्य केवळ "मार्कवंत" न करता "गुणवंत" कसा होईल यासाठी पालकांनी प्रयत्नशील असेल पाहिजे असे त्यांनी सांगितले.

             गेल्या दहा वर्षात रेजोनंस कोटा या संस्थेतून 18000 विद्यार्थी नीट परीक्षेतून एमबीबीएस साठी निवडल्या गेले.  2.5 लक्ष विद्यार्थी अभियांत्रिकी करीता निवडले गेले आहेत. रेजोनन्स द्वारा अनेक आयआयटीयन्स घडविल्या गेले आहेत व अनेक विद्यार्थी एम्स साठी निवडल्या गेले आहेत.परळी व पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांना रेजोनंसच्या फाऊंडेशन इंग्लिश स्कूल मधील इंटिग्रेटेड करीअर स्कूलमुळे खूप लाभ होणार असून विविध स्पर्धा परीक्षांचा पाया शालेय जीवनातच पक्का होण्यास मदत होणार आहे. परळी व परिसरातील विद्यार्थी पालकांनी लाभ घ्यावा असे आवाहन बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या