प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार

इमेज
चंद्रपूरच्या प्रदूषणावर ना. पंकजा मुंडे ॲक्शन मोडवर ; विधानसभेतील लक्षवेधीत मांडली परखड भूमिका प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न माझ्यासाठी महत्वाचा मुंबई, दि. २५ - चंद्रपूरसारख्या अतिप्रदूषित औद्योगिक क्षेत्रासाठी शॉर्ट टर्म, मिड टर्म आणि लॉंग टर्म गोल्सचा स्वतंत्र आराखडा तयार करण्यात आला असून तो चंद्रपूरमध्ये पायलट प्रकल्प म्हणून राबविण्यात येणार आहे असे स्पष्ट करत हा आराखडा अंतिम करून सभागृहासमोर सादर करण्यात येईल, नागरिकांचे आरोग्य  माझ्यासाठी महत्वाचे आहे असं राज्याच्या  पर्यावरण मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी आज विधानसभेत परखडपणे सांगितलं.   आ. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरमधील कोल वॉशरी, कोळसा खाणी, सिमेंट उद्योग आणि थर्मल पॉवर प्रकल्पांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मंत्री मुंडे म्हणाल्या की, मी काही दिवसांपूर्वी चंद्रपूरचा दौरा केला.या दौऱ्यात मी स्वतः अनेक उद्योग, कोल वॉशरी आणि प्रभावित गावांना भेटी दिल्या. त्या भागातील प्रदूषणाची तीव्रता प्रत्यक्ष पाहिल...

MB NEWS-गरीब कुटुंबातील मुलींच्या लग्नाला व वैद्यकीय आढचणीतील रुग्णांना केली जाते आर्थिक मदत पौळ पिंपरीचे सरपंच पती माणिकराव पौळ यांचा उपक्रम

  गरीब कुटुंबातील मुलींच्या लग्नाला व वैद्यकीय आढचणीतील रुग्णांना केली जाते आर्थिक मदत 

पौळ पिंपरीचे सरपंच पती माणिकराव पौळ यांचा उपक्रम 


परळी (प्रतिनिधी)

तालुक्यातील मौजे पौळ पिंपरी हे मोठ्या लोकसंख्येचे गाव आहे. येथील ग्रामपंचायत गेल्या 15 वर्षांपासून राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली व राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष लक्ष्मण तात्या पौळ यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात आहे. गावातील विकासाबरोबरच सामाजिक अडचणी सोडविण्यात पक्षाचे गावातील नेते नेहमी अग्रभागी असतात. त्यापैकीच अग्रगण्य नाव म्हणजे युवक नेते माणिकराव पौळ आणि त्यांच्या पत्नी सौ.शामल माणिकराव पौळ. गावातील गरीब कुटुंबातील मुलींच्या लग्नाला आर्थिक हातभार लावण्यासोबत कोणाला वैद्यकीय अडचणीत आर्थिक मदत लागत असेल तरीही ते धावून जातात. गेल्या अनेक वर्षांपासूनची त्यांची ही मदत परंपरा अद्यापही अविरतपणे सुरूच आहे.

राजकारण हे समाजकारणाला धरून केले गेले पाहिजे असं म्हणतात. आशा पद्धतीचे राजकारण करणारे लोक फार क्वचित आढळून येतात. त्यातल्या त्यात गावातील राजकारणात तर ही बाब अत्यंत दुर्मिळ दिसते. मात्र काही नेते मंडळी अशीही आहेत की जी राजकारणाच्या सर्व चौकटी बाजूला ठेऊन लोकांच्या अविरत सेवेत असतात. गोरगरिबांच्या लग्नाला आणि वैद्यकीय अडचणीला मदत करण्याचा संकल्प करून तो गेल्या अनेक वर्षांपासून प्रत्यक्षात आणण्याचे काम पौळ पिंपरीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते माणिकराव पौळ यांच्या माध्यमातून होत आहे. गावातील सर्वसामान्य कुटुंबातील मुलींच्या लग्नाला लागेल तशी आणि जमेल तशी आर्थिक मदत तर करतातच मात्र गावातील एखाद्याला वैद्यकीय अडचण निर्माण झाल्यास ते धावून जातात. ते सांगतात की, आमचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्याय मंत्री ना.धनंजय मुंडे आणि त्यांचे खंबीर सारथी वाल्मिक अण्णा कराड आणि लक्ष्मण तात्या पौळ यांच्याकडून आम्हाला समाजकार्याची नेहमीच प्रेरणा आणि प्रोत्साहन मिळत असल्याने आम्ही लोकांच्या मदतीला धावून जाऊ शकतो. मदतीचा हा यज्ञ आम्ही पुढेही चालू ठेवणार असल्याचा संकल्पही त्यांनी बोलून दाखवला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या