प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार

इमेज
चंद्रपूरच्या प्रदूषणावर ना. पंकजा मुंडे ॲक्शन मोडवर ; विधानसभेतील लक्षवेधीत मांडली परखड भूमिका प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न माझ्यासाठी महत्वाचा मुंबई, दि. २५ - चंद्रपूरसारख्या अतिप्रदूषित औद्योगिक क्षेत्रासाठी शॉर्ट टर्म, मिड टर्म आणि लॉंग टर्म गोल्सचा स्वतंत्र आराखडा तयार करण्यात आला असून तो चंद्रपूरमध्ये पायलट प्रकल्प म्हणून राबविण्यात येणार आहे असे स्पष्ट करत हा आराखडा अंतिम करून सभागृहासमोर सादर करण्यात येईल, नागरिकांचे आरोग्य  माझ्यासाठी महत्वाचे आहे असं राज्याच्या  पर्यावरण मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी आज विधानसभेत परखडपणे सांगितलं.   आ. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरमधील कोल वॉशरी, कोळसा खाणी, सिमेंट उद्योग आणि थर्मल पॉवर प्रकल्पांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मंत्री मुंडे म्हणाल्या की, मी काही दिवसांपूर्वी चंद्रपूरचा दौरा केला.या दौऱ्यात मी स्वतः अनेक उद्योग, कोल वॉशरी आणि प्रभावित गावांना भेटी दिल्या. त्या भागातील प्रदूषणाची तीव्रता प्रत्यक्ष पाहिल...

MB NEWS-मुंबई ते आष्टी दरम्यान प्रवासी रेल्वे वाहतूक सुरू करा खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांची मागणी,रेल्वे राज्यमंत्र्यांचा सकारात्मक प्रतिसाद

  मुंबई ते आष्टी दरम्यान प्रवासी रेल्वे वाहतूक सुरू करा



खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांची मागणी,रेल्वे राज्यमंत्र्यांचा सकारात्मक प्रतिसाद


बीड । दि. ०२ ।
बीड जिल्हावासियांसाठी अत्यंत जिव्हाळ्याचा असलेला नगर-बीड-परळी रेल्वे प्रकल्प सध्या जलद गतीने पूर्णत्वाकडे जातो आहे.या प्रकल्पाचा नगर ते आष्टी दरम्यानच्या लोहमार्ग कामाचा टप्पा पूर्ण झाले असल्याने या मार्गावर मुंबई ते आष्टी दरम्यान प्रवासी रेल्वे वाहतूक सुरू करावी अशी मागणी खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांनी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे केली आहे.

गतवर्षी नगर ते आष्टी दरम्यानचा एकसष्ठ किमीच्या लोहमार्गाचे काम पूर्ण  झाल्यानंतर खा.प्रितमताई मुंडे यांच्या उपस्थितीत नगर तर आष्टी दरम्यान रेल्वेची ट्रायल घेण्यात आली होती.हा रेल्वे मार्ग पूर्णपणे प्रवासी वाहतुकीस सज्ज असल्यामुळे मुंबई-नगर-आष्टी दरम्यान प्रवासी वाहतुक सुरू करण्याची मागणी सामान्य लोकांमधून होत आहे,जनसामान्यांच्या भावना आणि प्रवासी नागरीकांच्या मागणीची दखल घेऊन खा.प्रितमताई मुंडे यांनी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची भेट घेऊन मुंबई ते आष्टी रेल्वेसेवा सुरू करण्याची मागणी केली आहे.

नगर-बीड-परळी रेल्वे मार्गातील नगर ते आष्टी दरम्यानचा पहिला टप्पा पूर्ण होणे प्रवासी वाहतुकीसाठी महत्वपूर्ण आहे,या मार्गावर लवकरात लवकर रेल्वेची प्रवासी वाहतूक सुरू करू अशी सकारात्मक प्रतिक्रिया रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी खा.प्रितमताई मुंडे यांच्या मागणीवर व्यक्त केली आहे, खा.प्रितमताई मुंडे यांचा पाठपुरावा आणि रेल्वे राज्यमंत्र्यांच्या प्रतिसादाने लवकरच मुंबई ते आष्टी रेल्वे सेवा सुरू होईल अशी अपेक्षा बीड जिल्ह्यातील नागरीकांमधून व्यक्त होते आहे.


--

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या