इमेज
 चि. यशोधन आणि कु. किरण विवाहबंधनात: मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापुरात संपन्न झाला शाही विवाह सोहळा कोल्हापूर प्रतिनिधी: परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार आणि सौ. मनिषा अवचार यांचे सुपुत्र चि. यशोधन तसेच स्मृतीशेष रवींद्र मगदूम यांची कनिष्ठ सुपुत्री कु. किरण यांचा शुभविवाह नुकताच कोल्हापूर येथील एल. डी. लोन, चिंचवड रोड येथे अतिशय थाटामाटात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला सामाजिक, राजकीय,औष्णिक वीज निर्मिती,औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले. विशेषतः, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून अवचार आणि मगदूम कुटुंबाच्या आनंदात सहभाग नोंदवला. याप्रसंगी या प्रसंगी उपमुख्य अभियंता, भास्कर इंगळे कोराडी नागपूर, नितीन रडे. मुबंई, जगदीश मोरे, नासिक तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन आरोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय उदार, थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष अंगदभा...

MB NEWS- *शेवटी आज झाला "त्या" चार चिमुकल्यांच्या मृत्यूप्रकरणी गुन्हा दाखल*

 *शेवटी आज झाला "त्या" चार चिमुकल्यांच्या मृत्यू प्रकरणी गुन्हा दाखल*

 


गेवराई, एमबी न्युज वृत्तसेवा......

वाळू उपसा झालेल्या खड्ड्यात बुडून चार ऊसतोड मजुरांच्या मुलांचा मृत्यू झाल्याची घटना गेवराई तालुक्यातील शहजाणपूर चकला येथे घडली होती सदरील घटना ही  रविवारी रात्री उशीरा  उघडकीस आल्याने मोठी खळबळ उडाली होती. तर गेवराई तालुक्यातून होणारा अवैध वाळू उपसा प्रश्न पुन्हा एकदा  ऐरणीवर आला होता. याप्रकरणी जिल्हाधिकारी यांनी देखील  गंभीर दखल घेऊन चौकशी समिती नियुक्त केली होती. त्यानुसार या समितीने अहवाल देताच मयत मुलांच्या वडिलांच्या फिर्यादीवरून चार वाळू माफियांविरोधात मुलांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गेवराई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गेवराई तालुक्यातील मादळमोही जिल्हा परिषद गटातील शहाजानपूर चकला हे सिंदफना काठावरील गाव आहे. या ठिकानाहून नेहमीच मोठ्या प्रमाणावर वाळू उपसा होत होता म्हणून या ठिकाणी ठिक ठिकाणी  खड्यात पाणी साचलेले आहे. याच पाण्यात बुडून शहाजानपूर येथील बबलू गुणाजी वक्ते, गणेश बाबुराव इनकर, आकाश राम सोनवणे आणि अमोल संजय कोळेकर या नऊ ते बारा वर्षे वयाच्या बालकांचा पाण्यात बुडून दुर्देवी मृत्यू झाला होता. ही घटना घडल्यानंतर ग्रामस्थ आक्रमक झाले असून जोपर्यंत वाळू उपसा करणाऱ्या लोकांवर कारवाई होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याची भूमिका घेतल्याने या ठिकाणी  मोठे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.तसेच सदरील घटनेनंतर हद्दीबाबत महसूल प्रशासन मात्र ऐकमेकांकडे बोट दाखवायला सुरूवात केली होती.तर दोषींवर कठोर कारवाई करण्याचे लेखी आश्वासन बीड-गेवराई महसूल व पोलिस प्रशासनाने दिल्यानंतर मुलांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले होते.

तसेच या प्रकरणी पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी गंभीर दखल घेतली होती.  जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी चौकशी समिती नेमली होती. या समितीचा अहवाल येताच या प्रकरणी मयत मुलांच्या वडिलांच्या फिर्यादीवरून पांडूरंग चोरमले, विलास निर्मळ, संदीप निर्मळ व आर्जुन कोळेकर (सर्व रा.तांदळवाडी) यांच्या विरोधात गेवराई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सपोनि संदीप काळे हे करत आहेत.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या