इमेज
  अहिल्यानगर ते बीड राज्य मार्गाच्या रुंदीकरणासाठी ९६६ कोटी रुपयांना मंजुरी ​अहिल्यानगर ते बीड या प्रमुख राज्य मार्ग क्र. १६ च्या सुधारणा व रुंदीकरणासाठी राज्य शासनाने ९६६ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. आमदारांचे स्वीय सहाय्यक विनोद रोडे यांनी यासंदर्भात अधिकृत माहिती दिली आहे. ​अहिल्यानगर ते बीड दरम्यानचा सुमारे ९६ किलोमीटर लांबीचा हा प्रमुख राज्य मार्ग अनेक वर्षांपासून अत्यंत धोकादायक आणि वळणावळणाचा बनला होता. यामुळे या मार्गावर वारंवार अपघात घडत होते. वाहनचालक, प्रवासी आणि स्थानिक नागरिकांकडून या रस्त्याच्या सुधारणेची मागणी सातत्याने केली जात होती. या पार्श्वभूमीवर आमदार धस यांनी विविध स्तरांवर प्रयत्न केले होते. ​राज्य शासनाने या आश्वासनाची पूर्तता करत टाकळी काझी ते बीड दरम्यान किमी १३/१०० ते १०९/७०० या टप्प्यातील संपूर्ण रस्त्याच्या सुधारणा कामासाठी हा निधी मंजूर केला आहे. या अंतर्गत धोकादायक वळणांचे सरळीकरण करणे, रस्त...

MB NEWS-आरोपीला अटक करुन कारवाई करण्याची मागणी

 परळीत सकल राजस्थानी समाजाच्या वतीने संजय बियाणी यांच्या हत्येप्रकरणी निवेदन




आरोपीला अटक करुन कारवाई करण्याची मागणी

परळी (प्रतिनिधी-)

नांदेड येथील  बांधकाम व्यावसायीक संजय बियाणी यांची माथेफिरुने हत्या केली.  परळी सकल राजस्थानी समाजाच्या वतीने आज निषेध व्यक्त करण्यात आला. आरोपीला अटक करुन त्याच्यावर कडक कार्यवाही करावी अशी मागणी समाजाच्या वतीने तहसिलदारांना निवेदनाद्वारे करण्यात आली. 

          आज सकाळी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून सकाळी 11 वा. शहरातील प्रमुख मार्गावरुन मोटारसायकल रॅली काढून समाज बांधव तहसिल कार्यालयावर धडकले. 

परळी येथील सकल राजस्थानी समाजाच्या वतीने बांधकाम व्यावसायीक संजय बियाणी यांच्या मारेकर्‍यांना अटक करावी या मागणीसाठी परळी तहसिलदारांना निवेदन देण्यात आले. संजय बियाणी यांच्या निघृण हत्येच्या पार्श्वभूमीवर सकल राजस्थानी समाज संतप्त झाला असून आज पोलीस प्रशासनाच्या विरोधात तिव्र घोषणा देत मोर्चा काढून निवेदन देण्यात आले. 

Click: परळी शिवारात विहिरीत आढळला मृतदेह*

परळी तालुका माहेश्वरी सभा  व सकल राजस्थानी समाज परिवारातील सदस्यांनी एकत्र येऊन परळी तहसिल कार्यालयास निवेदनात म्हटले आहे की,नांदेड येथील व्यावसायीक संजय बियाणी हे समाजाचे कार्यकर्ते असून उद्योग व्यवसायासोबत सामाजिक कामातही अग्रेसर असतात. नांदेड येथील माहेश्वरी समाजातील गरजूंना 21 रो-हाऊसेस व 52 सदनिका अत्यंत अल्पदरात उपलब्ध करुन दिल्या असून अत्यंंत काबाडकष्ट करुन त्यांनी शुन्यातून आपले विश्व निर्माण केले आहे. समाजाभिमुख उपक्रमातही ते नेहमीच आघाडीवर असतात. अशा एका समाजासाठी काम करणार्‍या व दानशूर व्यक्तीमत्व असलेल्या संजय बियाणी यांच्या हत्येमुळे प्रामाणिक व सामाजिक काम करणार्‍या सर्वांसमोरच जिवनमरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. भरदिवसा गोळ्या घालून झालेली हत्या मानवतेला काळीमा फासणारी असून या घटनेचा परिणाम बियाणी यांचे कुटूंबीय तसेच समाज मनावर विपरीतपणे झाला असल्याचे या निवेदनात म्हटले आहे.

Click:*'त्या' विवाहितेच्या आत्महत्येला कारणीभूत लोकांविरुद्ध परळीत गुन्हा; आरोपींवर कारवाईची भावाची आर्त मागणी*  

 दरम्यान, या घटनेची सखोल चौकशी करुन या मागे कोण आहेत? याचा शोध घेत गोळ्या घालणार्‍या त्या नराधमांना अटक करुन त्यांना कठोर शासन करावे अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली. आज निघालेल्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर परळी शहरातील राजस्थानी समाजातील सर्व व्यापारी प्रतिष्ठाने दुपारपर्यंत बंद ठेवण्यात आली होती. समाजातील मान्यवर नागरिकांसह व्यापारी, डॉक्टर, वकील, शिक्षक, प्राध्यापक आदींसह शेकडो समाज बांधव सहभागी झाले होते. घोषणांनी तहसिल परिसर गजबजून गेला होता. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या