इमेज
  ग्लोबल विकास ट्रस्ट आणि परळी नगरपालिकेचा स्तुत्य उपक्रम; पथनाट्यातून दिला वृक्षसंगोपनाचा संदेश परळी वैजनाथ (प्रतिनिधी) पर्यावरण संवर्धन आणि वृक्षसंगोपनाचा प्रभावी संदेश देण्यासाठी परळी शहरात आज एका विशेष जनजागृतीपर पथनाट्याचे आयोजन करण्यात आले होते. ग्लोबल विकासच ट्रस्ट, नगरपालिका प्रशासन आणि स्थानिक वृक्षसंवर्धन चळवळ यांच्या संयुक्त विद्यमाने हा स्तुत्य उपक्रम हाती घेण्यात आला आहे. आज, शुक्रवार २६ जून रोजी शहरातील प्रमुख आणि गजबजलेल्या भागात या पथनाट्याचे सादरीकरण करण्यात आले. यामध्ये मोंढा मार्केट, बस स्टँड, छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि नेहरू चौक तळ परिसराचा समावेश होता. या पथनाट्याला परळीकरांनी प्रचंड गर्दी करत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. नाट्यातून दिला 'झाडे लावा, झाडे जगवा'चा संदेश वाढते प्रदूषण आणि निसर्गाचा बिघडत चाललेला समतोल या पार्श्वभूमीवर मानवी जीवनात वृक्षांचे काय महत्त्व आहे, हे कलाकारांनी आपल्या प्रभावी अभिनयातून मांडले. केवळ झाडे लावणे पुरेसे नसून त्यांचे संगोपन करणे ही काळाची गरज कशी बनली आहे, यावर पथनाट्यातून प्रकाश टाकण्यात आला. पाणीटंचाई, ग्लोबल वॉर्मिंग आण...

MB NEWS-विजेच्या प्रश्नावर सिरसाळा येथील विज वितरणच्या अधिकाऱ्यास माकप चा घेराव

 विजेच्या प्रश्नावर सिरसाळा येथील विज वितरणच्या अधिकाऱ्यास माकप चा घेराव



परळी : दि 21 प्रतिनिधी

       सिरसाळा परिसरातील ग्रामीण भागातील वीज पुरवठा सुरळीत करावा या मागणीसाठी मार्क्सवादी कम्युनिष्ट पक्षाच्या वतीने सिरसाळा येथील विजवितरणच्या अभियंत्यास गुरूवारी घेरावा घालण्यात आला.



  विजेचे वाढीव भारनियमन रद्द करण्यात यावे, वीज पुरवठा चोवीस तास सुरळीत करावा, शेतीसाठी बारा तास वीजपुरवठा करण्यात यावा, शेतकरी ग्राहकांना कोटेशन देण्यात यावे, आवश्यक ठिकाणी पोल, तार यांची व्यवस्था करण्यात यावी, वीज वितरण कंपनीच्या कनिष्ठ अभियंतानी मुख्य कार्यालय ठिकाणी मुक्कामी असावा या मागण्यासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने सिरसाळा येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयासमोर अभियंता अभिजीत राठोड व श्री निंबाळकर यांना घेराव घालून  गुरुवारी(ता.21) आंदोलन केले. गेल्या दोन महिन्यापासून सिरसाळा व परिसरातील गावांमध्ये वीज वितरण कंपनीकडून मोठ्या प्रमाणात भारनियमन होत असल्याने नागरिक ऐन उन्हाळ्यात त्रस्त झाले आहेत. तसेच शेतीसाठी ही वीज पुरवठा सुरळीत होत नसल्याने पिके करपत आहेत. शेतामध्ये अवघ्या दोन ते तीन तास वीज पुरवठा होत असल्याने पिकांना पाणी देणे कठीण बनले आहे. गावात सध्या वीज वितरण कंपनीकडून सातत्याने विजेची वसूली होताना दिसते. मात्र वितरण कंपनीकडून सुविधाचा खेळखंडोबा दिसून येतो. अनेक वेळा वीज गेल्यानंतर चार- चार तास फ्यूज   टाकण्यास कर्मचारी दुर्लक्ष करतात. तसेच वीज वितरण कंपनीमधील अभियंते, कंत्राटी कर्मचारी मोबाईल स्वीच ऑफ करून ठेवतात असा आरोप आंदोलकांनी यावेळी केला. या आंदोलनात माकप चे जिल्हा सचिव कॉ.अजय बुरांडे, तालुका सचिव कॉ. गंगाधर पोटभरे, किसान सभेचे जिल्हा सचिव कॉ. मुरलीधर नागरगोजे, कॉ. सुदाम शिंदे, कॉ. भगवान बडे, कॉ अनुरथ गायकवाड, मदन वाघमारे, बाबा शेरकर, आदींचा समावेश होता.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या