इमेज
  गर्भवती महिला हेळसांड: उपचारातील हलगर्जी प्रकरणी गित्ते हाॅस्पिटल मधील सीसीटीव्ही फुटेज जप्त करण्याची मागणी परळी वैजनाथ, प्रतिनिधी:        शहरातील गित्ते हाॅस्पिटल या खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान गर्भातील बाळाचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणात आता पुरावे सुरक्षित ठेवण्याची मागणी पुढे आली आहे. तक्रारदाराने शहर पोलीस ठाण्यात निवेदन देऊन संबंधित रुग्णालय तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि डीव्हीआर तात्काळ जप्त करून सुरक्षित ताब्यात घेण्याची मागणी केली आहे.          तक्रारदार वैजनाथ संभाजी मुंडे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, त्यांच्या पत्नीवर उपचार करताना डाॅ.कल्पना सचिन गित्ते यांच्याविरुद्ध हलगर्जीपणा झाल्याचा आरोप यापूर्वीच लेखी तक्रार करुन करण्यात आला आहे. या प्रकरणात सत्य समोर येण्यासाठी रुग्णालयातील आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज महत्त्वाचे ठरणार असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.२३ एप्रिल ते २४ एप्रिलदरम्यान रुग्णालयातील केबिन, कॉरिडॉर तसेच बाहेरील परिसरातील सीसीटीव्ही फुटेज जप्त करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच रु...

MB NEWS-विजेच्या प्रश्नावर सिरसाळा येथील विज वितरणच्या अधिकाऱ्यास माकप चा घेराव

 विजेच्या प्रश्नावर सिरसाळा येथील विज वितरणच्या अधिकाऱ्यास माकप चा घेराव



परळी : दि 21 प्रतिनिधी

       सिरसाळा परिसरातील ग्रामीण भागातील वीज पुरवठा सुरळीत करावा या मागणीसाठी मार्क्सवादी कम्युनिष्ट पक्षाच्या वतीने सिरसाळा येथील विजवितरणच्या अभियंत्यास गुरूवारी घेरावा घालण्यात आला.



  विजेचे वाढीव भारनियमन रद्द करण्यात यावे, वीज पुरवठा चोवीस तास सुरळीत करावा, शेतीसाठी बारा तास वीजपुरवठा करण्यात यावा, शेतकरी ग्राहकांना कोटेशन देण्यात यावे, आवश्यक ठिकाणी पोल, तार यांची व्यवस्था करण्यात यावी, वीज वितरण कंपनीच्या कनिष्ठ अभियंतानी मुख्य कार्यालय ठिकाणी मुक्कामी असावा या मागण्यासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने सिरसाळा येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयासमोर अभियंता अभिजीत राठोड व श्री निंबाळकर यांना घेराव घालून  गुरुवारी(ता.21) आंदोलन केले. गेल्या दोन महिन्यापासून सिरसाळा व परिसरातील गावांमध्ये वीज वितरण कंपनीकडून मोठ्या प्रमाणात भारनियमन होत असल्याने नागरिक ऐन उन्हाळ्यात त्रस्त झाले आहेत. तसेच शेतीसाठी ही वीज पुरवठा सुरळीत होत नसल्याने पिके करपत आहेत. शेतामध्ये अवघ्या दोन ते तीन तास वीज पुरवठा होत असल्याने पिकांना पाणी देणे कठीण बनले आहे. गावात सध्या वीज वितरण कंपनीकडून सातत्याने विजेची वसूली होताना दिसते. मात्र वितरण कंपनीकडून सुविधाचा खेळखंडोबा दिसून येतो. अनेक वेळा वीज गेल्यानंतर चार- चार तास फ्यूज   टाकण्यास कर्मचारी दुर्लक्ष करतात. तसेच वीज वितरण कंपनीमधील अभियंते, कंत्राटी कर्मचारी मोबाईल स्वीच ऑफ करून ठेवतात असा आरोप आंदोलकांनी यावेळी केला. या आंदोलनात माकप चे जिल्हा सचिव कॉ.अजय बुरांडे, तालुका सचिव कॉ. गंगाधर पोटभरे, किसान सभेचे जिल्हा सचिव कॉ. मुरलीधर नागरगोजे, कॉ. सुदाम शिंदे, कॉ. भगवान बडे, कॉ अनुरथ गायकवाड, मदन वाघमारे, बाबा शेरकर, आदींचा समावेश होता.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट