इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

MB NEWS-विजेच्या प्रश्नावर सिरसाळा येथील विज वितरणच्या अधिकाऱ्यास माकप चा घेराव

 विजेच्या प्रश्नावर सिरसाळा येथील विज वितरणच्या अधिकाऱ्यास माकप चा घेराव



परळी : दि 21 प्रतिनिधी

       सिरसाळा परिसरातील ग्रामीण भागातील वीज पुरवठा सुरळीत करावा या मागणीसाठी मार्क्सवादी कम्युनिष्ट पक्षाच्या वतीने सिरसाळा येथील विजवितरणच्या अभियंत्यास गुरूवारी घेरावा घालण्यात आला.



  विजेचे वाढीव भारनियमन रद्द करण्यात यावे, वीज पुरवठा चोवीस तास सुरळीत करावा, शेतीसाठी बारा तास वीजपुरवठा करण्यात यावा, शेतकरी ग्राहकांना कोटेशन देण्यात यावे, आवश्यक ठिकाणी पोल, तार यांची व्यवस्था करण्यात यावी, वीज वितरण कंपनीच्या कनिष्ठ अभियंतानी मुख्य कार्यालय ठिकाणी मुक्कामी असावा या मागण्यासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने सिरसाळा येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयासमोर अभियंता अभिजीत राठोड व श्री निंबाळकर यांना घेराव घालून  गुरुवारी(ता.21) आंदोलन केले. गेल्या दोन महिन्यापासून सिरसाळा व परिसरातील गावांमध्ये वीज वितरण कंपनीकडून मोठ्या प्रमाणात भारनियमन होत असल्याने नागरिक ऐन उन्हाळ्यात त्रस्त झाले आहेत. तसेच शेतीसाठी ही वीज पुरवठा सुरळीत होत नसल्याने पिके करपत आहेत. शेतामध्ये अवघ्या दोन ते तीन तास वीज पुरवठा होत असल्याने पिकांना पाणी देणे कठीण बनले आहे. गावात सध्या वीज वितरण कंपनीकडून सातत्याने विजेची वसूली होताना दिसते. मात्र वितरण कंपनीकडून सुविधाचा खेळखंडोबा दिसून येतो. अनेक वेळा वीज गेल्यानंतर चार- चार तास फ्यूज   टाकण्यास कर्मचारी दुर्लक्ष करतात. तसेच वीज वितरण कंपनीमधील अभियंते, कंत्राटी कर्मचारी मोबाईल स्वीच ऑफ करून ठेवतात असा आरोप आंदोलकांनी यावेळी केला. या आंदोलनात माकप चे जिल्हा सचिव कॉ.अजय बुरांडे, तालुका सचिव कॉ. गंगाधर पोटभरे, किसान सभेचे जिल्हा सचिव कॉ. मुरलीधर नागरगोजे, कॉ. सुदाम शिंदे, कॉ. भगवान बडे, कॉ अनुरथ गायकवाड, मदन वाघमारे, बाबा शेरकर, आदींचा समावेश होता.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!