दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न

इमेज
  चैत्यभूमी दादर येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न बीड ,प्रतिनिधी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, चैत्यभूमी दादर (पश्चिम), मुंबई येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, हे शिबिर दि. १२ मे ते २१ मे २०२६ या कालावधीत संपन्न होणार आहे. बौद्ध धम्माचा सखोल अभ्यास करण्याची इच्छा असलेल्या विविध समाजातील धर्मांतरित बौद्ध बांधवांसाठी हे विशेष शिबिर आयोजित करण्यात आले आहे. सत्यशोधक ओबीसी परिषद, सत्यशोधक समाज महासंघ, चर्मकार संघ, अखिल भारतीय धम्म महासंघ, प्रजासत्ताक जनता परिषद तसेच इतर विविध माध्यमांतून धर्मांतरित झालेल्या ओबीसी, पूर्वाश्रमीचे मातंग, वाल्मिकी, चर्मकार, ढोर समाजातील बौद्ध बांधवांना या शिबिरात सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय डॉ. भीमराव य. आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच संस्थेचे ट्रस्टी व राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा मुंबई केंद्रीय कार्यालय प्रमुख आद. अॅड. डॉ. एस. के. भंडारे यांच्या सल्ल्याने या शिबिराचे आय...

MB NEWS-तिघांसाठी काळरात्र: कारचा भिषण आपघात; तीन ठार-तीन जखमी

 तिघांसाठी काळरात्र: कारचा भिषण आपघात; तीन ठार-तीन जखमी



रस्त्याच्या कडेला  बोलत उभे असलेल्या चौघांना अंबाजोगाईच्या दिशेने जात असलेल्या भरधाव कारने 4 जणांना चिरडल्याची घटना घाटनांदुर ( ता. अंबाजोगाई ) येथे सोमवारी ( दि. ४ ) रात्री १० च्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज चौकात घडली. यामध्ये दोघे जागीच ठार तर एकाचा लातूर येथे घेऊन जाताना रस्त्यात मृत्यू झाला. एक जण गंभीर असून कार मधील दोघे जखमी आहेत.

वैभव सतीश गीरी ( वय १७ वर्ष ) लहू बबन काटुळे ( वय ३० वर्ष ) असे जागीच ठार झालेल्या दोघांची नावे असून, रमेश विठ्ठल फुलारी ( वय ४७ ) असे लातूर येथे घेऊन जाताना मृत्यू झालेल्या जखमीचे नाव आहे.‌ तसेच उध्दव निवृत्ती दोडतले हे गंभीर जखमी आहेत. हे चौघेही सोमवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज चौकातील एका टपरी समोर उभे होते. यावेळी अंबाजोगाईच्या दिशेने कार क्रमांक एम.एच. २४ व्ही २५१८ ही भरधाव वेगाने आली. चौकात येताच चालकाचे नियंत्रण सुटल्याने ती सरळ या चौघांवर येऊन धडकून फरफटत नेले. पुढे विद्युत खांबाला धडकून कार थांबली. अपघात घडताच ग्रामस्थांनी मदतीसाठी धाव घेतली परंतु वैभव गिरी व लहू काटुळे हे जागीच ठार झाले होते तर रमेश फुलारी आणि उध्दव दोडतले हे गंभीर जखमी होते. या दोघांनाही तातडीने अंबाजोगाई येथे हलविण्यात आले. रमेश फुलारी यांची प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी लातूर येथे हलविण्यात आले. लातूर येथे जाताना रस्त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. एका अपघाताने तिघांचा बळी गेला आहे. दोडतले हे गंभीर जखमी आहेत. तसेच कार मधील दोघे जखमी आहेत. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....