तिघांसाठी काळरात्र: कारचा भिषण आपघात; तीन ठार-तीन जखमी
रस्त्याच्या कडेला बोलत उभे असलेल्या चौघांना अंबाजोगाईच्या दिशेने जात असलेल्या भरधाव कारने 4 जणांना चिरडल्याची घटना घाटनांदुर ( ता. अंबाजोगाई ) येथे सोमवारी ( दि. ४ ) रात्री १० च्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज चौकात घडली. यामध्ये दोघे जागीच ठार तर एकाचा लातूर येथे घेऊन जाताना रस्त्यात मृत्यू झाला. एक जण गंभीर असून कार मधील दोघे जखमी आहेत.
वैभव सतीश गीरी ( वय १७ वर्ष ) लहू बबन काटुळे ( वय ३० वर्ष ) असे जागीच ठार झालेल्या दोघांची नावे असून, रमेश विठ्ठल फुलारी ( वय ४७ ) असे लातूर येथे घेऊन जाताना मृत्यू झालेल्या जखमीचे नाव आहे. तसेच उध्दव निवृत्ती दोडतले हे गंभीर जखमी आहेत. हे चौघेही सोमवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज चौकातील एका टपरी समोर उभे होते. यावेळी अंबाजोगाईच्या दिशेने कार क्रमांक एम.एच. २४ व्ही २५१८ ही भरधाव वेगाने आली. चौकात येताच चालकाचे नियंत्रण सुटल्याने ती सरळ या चौघांवर येऊन धडकून फरफटत नेले. पुढे विद्युत खांबाला धडकून कार थांबली. अपघात घडताच ग्रामस्थांनी मदतीसाठी धाव घेतली परंतु वैभव गिरी व लहू काटुळे हे जागीच ठार झाले होते तर रमेश फुलारी आणि उध्दव दोडतले हे गंभीर जखमी होते. या दोघांनाही तातडीने अंबाजोगाई येथे हलविण्यात आले. रमेश फुलारी यांची प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी लातूर येथे हलविण्यात आले. लातूर येथे जाताना रस्त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. एका अपघाताने तिघांचा बळी गेला आहे. दोडतले हे गंभीर जखमी आहेत. तसेच कार मधील दोघे जखमी आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा