इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

MB NEWS-किसान सभेच्या मागणीनुसार कृषी दुकानदार व शेतकरी प्रतिनिधींची तहसिलदारांच्या अध्यक्षतेखाली झाली बैठक

 किसान सभेच्या मागणीनुसार कृषी दुकानदार व शेतकरी प्रतिनिधींची तहसिलदारांच्या अध्यक्षतेखाली झाली बैठक




परळी वै.ता.१६ प्रतिनिधी

      किसान सभेच्या मागणीनुसार कृषी चे अधिकारी, कृषी सेवा केंद्राचे सर्व विक्रेते व शेतकरी प्रतिनिधींची बैठक बुधवारी (ता.१५) झाली. यात शेतकऱ्यांची अडवणुक करण्यात येउ नये या शेतकरी प्रतिनिधींच्या मागणीवर सर्वच विभागाच्या अधिकाऱ्यांनी कृषी दुकानदारांना  तंबी दिली.


      अखिल भारतीय किसान सभेच्या शिष्टमंडळानी सोमवारी (ता.१३) तहसिलदार व तालुका कृषी अधिकाऱ्यांना निवेदन देउन तालुक्यातील ठोक व किरकोळ बीयाणे व खत विक्रेते, कृषी अधिकारी व शेतकरी प्रतिनिधींची बैठक घेण्याची मागणी केली होती. त्या निवेदनाची दखल घेउन बुधवारी (ता.१५) दुपारी चार वाजता परळी पंचायत समितीच्या सभागृहात बैठक घेण्यात आली. त्या बैठकीत समितीचे अध्यक्ष तहसिलदार सुरेश शेजुळ, उपविभागीय कृषी अधिकारी सुर्यकांत वडखेलकर, सचिव गटविकास अधिकारी संजय केंद्रे, तालुका कृषी अधिकारी अशोक सोनवणे, पंचायत समितीचे कृषी अधिकारी शेषेराव कांदे, शेतकरी प्रतिनिधी म्हणुन किसान सभेचे कॉ अजय बुरांडे, कॉ पांडुरंग राठोड यांच्यासह तालुक्यातील सुमारे सत्तर कृषी सेवा केंद्राचे मालक सहभागी झाले होते. या बैठकीत तालुक्यातील शेतकऱ्यांची आर्थीक लुट होत असल्याचा मुद्दा शेतकरी प्रतिनिधींनी उपस्थीत केला. यावर प्रशासनानी तात्काळ उपाययोजना करावी, शेतकऱ्यांना मागणी नुसार बीयाणे व खत पुरवठा करावा, लिंकींग पध्दत बंद करावी, महिको बीयाणे कंपनी सुरू ठेवण्याबाबत कृषी विभागानी मागणी करावी, शेतकऱ्यांची फसवणुक करणाऱ्या विरूध्द कारवाई करावी या मागण्या करण्यात आल्या. यावर कृषी विभागाचे कृषी दुकानांवर लक्ष असुन कुठे साठेबाजी व शेतकऱ्यांची फसवणुक होत असल्यास प्रशासनाच कळवावे. कृषी विभाग तात्काळ कारवाई करेल. कृषी विभाग शेतकऱ्यांच्या बाजुने कायम राहील अशी ग्वाही यावेळी दिली तसेच. कृषी दुकानदारांनी त्यांच्याकडे उपलब्ध बियाणे व खताचा कंपनीच्या नावासह शिल्लक साठा दर्शनी भागात बोर्डावर लिहुन लावावा असे आदेश दिले आहेत. किसान सभेच्या मागणीनुसार घेण्यात आलेली बैठक सुमारे दोन तास चालली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!