इमेज
 चि. यशोधन आणि कु. किरण विवाहबंधनात: मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापुरात संपन्न झाला शाही विवाह सोहळा कोल्हापूर प्रतिनिधी: परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार आणि सौ. मनिषा अवचार यांचे सुपुत्र चि. यशोधन तसेच स्मृतीशेष रवींद्र मगदूम यांची कनिष्ठ सुपुत्री कु. किरण यांचा शुभविवाह नुकताच कोल्हापूर येथील एल. डी. लोन, चिंचवड रोड येथे अतिशय थाटामाटात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला सामाजिक, राजकीय,औष्णिक वीज निर्मिती,औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले. विशेषतः, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून अवचार आणि मगदूम कुटुंबाच्या आनंदात सहभाग नोंदवला. याप्रसंगी या प्रसंगी उपमुख्य अभियंता, भास्कर इंगळे कोराडी नागपूर, नितीन रडे. मुबंई, जगदीश मोरे, नासिक तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन आरोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय उदार, थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष अंगदभा...

MB NEWS -अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला राजीनामा

 अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला राजीनामा



 अखेर आज जनतेशी संवाद साधत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी  राजीनामा दिला आहे.


शिवसेनेचे दिग्गज नेते मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 50 बंडकोर आमदारांनी महाविकास आघाडी सरकारचे समर्थन काढल्याचे जाहीर केले, त्यामुळे ठाकरे सरकार अल्पमतात आले आहे. दरम्यान, आताच सुप्रीम कोर्टाने महाविकास आघाडी सरकारला धक्का देणारा निर्णय दिला. उद्या सरकारला बहुमत सिद्ध करावे लागणार आहे. या निर्णयानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी बंडखोरांवर टीकाही केली.





यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, ''मी गेल्यावेळेस म्हणालो होतो, काळजी करण्याची गरज नाही. ज्या गोष्टी चालू होत्या, त्या चालूस राहतील. तुमच्या आशिर्वादाने इथपर्यंची वाटचाल चांगली झाली. सरकार म्हणून आपण काय केलं, छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगडला निधीन देऊन सुरुवात केली. हा एक योगायोग होता. त्यानंतर शेतकऱ्यांना कर्जमुक्त केलं. आतासुद्धा पीक विमा योजनेचे बीड पॅटर्न करुन घेतले.'' 



''या सगळ्या गोंधळात, काही गोष्टी बाजूला पडतात. आज मंत्रिमंडळाची बैठक झाली. आज मला विशेष समाधान आहे, आयुष्य सार्थकी लागलं. स्वतः शिवसेनाप्रमुखांनी ज्या शहराला संभाजीनगर नाव दिलं, त्याचे नामांतर माझ्या हाताने झाले. उस्मनाबादचेही धाराशिव केले. जिथे लहानाचा मोठा झालो, आता मुख्यमंत्री झालो, त्या वांद्रे वसाहतीत लोकांना भूखंड मंजूर केला.''


'सर्व सहकार्यांचे आभार'


ते पुढे म्हणाले की, '' असे म्हणतात ना एखादी गोष्ट चांगली चालू असते, तेव्हा दृष्ट लागते. कोणाची लागली, ते तुम्हाला माहिती आहे. आज मला सोनिया , शरद पवार आणि सर्व सहकाऱ्यांचे आभार मानायचे आहे. दुःख या गोष्टीचे वाटले की, या ठरावाच्या वेळेस आम्ही फक्त चार मंत्री होतो, बाकीचे मंत्री तुम्ही जानता कुठे आहेत. इतर पक्षांनी एका शब्दानेही या नामांतराला विरोध केला नाही, त्यांना धन्यवाद. ज्यांचा विरोध होता असं भासवलसं जात होतं, ते सोबत राहिले आणि जे सोबत होते, ते विरोधात गेले. 



'बाळासाहेबांनी खूप काही दिलं'


''बाळासाहेबांनी अनेक लहानांना मोठं केलं. नगरसेवक, आमदार खासदार आणि मंत्रीही केलं. ही माणसे मोठी झाली, मोठी झाल्यानंतर आम्हालाच विसरले. ज्यांना मोठं केलं, सत्ता आल्यानंतर शक्य ते सगळं दिलं, ती लोक आज नाराज आहेत. मी मातोश्रीवर आल्यानंतर साधी माणसं येथे येतायत, ते म्हणतात आम्ही सोबत आहोत. ज्यांना दिलं, ते नाराज, ज्यांना काही दिलं नाही, ते सोबत आहेत. याला म्हणतात शिवसेना. या नात्याच्या जोरावर सेना उभी आहे. अनेक आव्हान या लोकांच्या सोबतीने परतवत आली आहे.'' 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या