इमेज
 चि. यशोधन आणि कु. किरण विवाहबंधनात: मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापुरात संपन्न झाला शाही विवाह सोहळा कोल्हापूर प्रतिनिधी: परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार आणि सौ. मनिषा अवचार यांचे सुपुत्र चि. यशोधन तसेच स्मृतीशेष रवींद्र मगदूम यांची कनिष्ठ सुपुत्री कु. किरण यांचा शुभविवाह नुकताच कोल्हापूर येथील एल. डी. लोन, चिंचवड रोड येथे अतिशय थाटामाटात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला सामाजिक, राजकीय,औष्णिक वीज निर्मिती,औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले. विशेषतः, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून अवचार आणि मगदूम कुटुंबाच्या आनंदात सहभाग नोंदवला. याप्रसंगी या प्रसंगी उपमुख्य अभियंता, भास्कर इंगळे कोराडी नागपूर, नितीन रडे. मुबंई, जगदीश मोरे, नासिक तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन आरोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय उदार, थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष अंगदभा...

MB NEWS-शिक्षण सभापती गोपाळ आंधळे यांच्या पुढाकाराने वृक्षरोपण

 सत्यवान-सावित्री कथास्थळी नव्याने वटवृक्षाचे रोपण ; वटसावित्री पौर्णिमेनिमित्त असंख्य महिलांनी घेतलं दर्शन 



 शिक्षण सभापती गोपाळ आंधळे यांच्या पुढाकाराने वृक्षरोपण 

परळी :   जेष्ठ शुध्द पोर्णिमा म्हणजे वटपोर्णिमा, आपल्या पतीस दिर्घ आयुष्य लाभून हाच पती पुढचे सात जन्म मिळावा यासाठी देशभरातील महिला हा सण मोठ्या उत्साहात  साजरा करतात. यमाच्या तावडीतून आपल्या पतीचे प्राण वाचवणार्या सत्यवान-साविञीची घटना ज्या ठिकाणी घडली आहे त्या पूर्वी सात मोठे वटवृक्ष होते परंतु सध्या त्या ठिकाण वटवृक्ष नसल्याने हा परिसर ओस पडला होता, त्या ठिकाणी शिक्षण सभापती गोपाळ आंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली सौ.रोहिणीताई स्वामी व अनिताताई स्वामी यांच्या हस्ते वटपोर्णिमानिमित्त वटवृक्ष रोपाचे वृक्षरोपण करण्यात आले. 










यावेळी श्री. आंधळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले ते म्हणाले, सत्यवानाचे प्राण साविञीने परत मिळवले ते परम पावन क्षेञ म्हणजेच प्रभाकर क्षेञ तेच आजचे परळी वैद्यनाथ ज्योतिर्लिंग तिर्थक्षेत्र होय. ही कथा जेथे घडली ते ठिकाण म्हणजे आज मलिकपूरा भागाच्या पाठिमागे वटसाविञी नगर जवळ असलेल्या तलावाच्या मधोमध हे वटेश्वर लिंग आणि सावित्री चे मंदिर एका दगडी वट्यावर उघड्यावर आहे. एवढे धार्मिक महत्त्व आणि अधिष्ठान असलेले हे मंदिर जीर्णोध्दाराच्या प्रतीक्षेत आहे. हे आपले दुर्दैवच म्हणावे लागेल.

यावेळी वृक्षरोपण कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मुख्याध्यापक बळवंत चव्हाण सर,  प्राचार्य अतुल दुबे सर , क्रीडा शिक्षक अजय जोशी सर, अविनाश गवळी, मुसा भाई  उपस्थित होते, तर या परिसरातील सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार सचिन भांडे,संतोष पौळ,दिपक क्षिरसागर आदी वृक्षप्रेमी यांनी वृक्षरोपण करण्यासाठी परिश्रम घेतले. पूजाविधी करण्यासाठी या परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या