इमेज
 चि. यशोधन आणि कु. किरण विवाहबंधनात: मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापुरात संपन्न झाला शाही विवाह सोहळा कोल्हापूर प्रतिनिधी: परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार आणि सौ. मनिषा अवचार यांचे सुपुत्र चि. यशोधन तसेच स्मृतीशेष रवींद्र मगदूम यांची कनिष्ठ सुपुत्री कु. किरण यांचा शुभविवाह नुकताच कोल्हापूर येथील एल. डी. लोन, चिंचवड रोड येथे अतिशय थाटामाटात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला सामाजिक, राजकीय,औष्णिक वीज निर्मिती,औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले. विशेषतः, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून अवचार आणि मगदूम कुटुंबाच्या आनंदात सहभाग नोंदवला. याप्रसंगी या प्रसंगी उपमुख्य अभियंता, भास्कर इंगळे कोराडी नागपूर, नितीन रडे. मुबंई, जगदीश मोरे, नासिक तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन आरोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय उदार, थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष अंगदभा...

MB NEWS- *कुंडलिका मध्यम प्रकल्पाच्या उजव्या कालव्यावरील लोणवळ तलाव दरम्यान बंद नलिकेद्वारे कालवा जोडणीच्या कामास 1 कोटी 13 लाख 66 हजार रुपयांची प्रशासकीय मान्यता प्रदान*

कुंडलिका मध्यम प्रकल्पाच्या उजव्या कालव्यावरील लोणवळ तलाव दरम्यान बंद नलिकेद्वारे कालवा जोडणीच्या कामास 1 कोटी 13 लाख 66 हजार रुपयांची प्रशासकीय मान्यता प्रदान


माजी पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी जलसंपदा विभागाच्या बैठकांमध्ये वेळोवेळी उपस्थित केला होता मुद्दा


जिल्ह्यातील प्रस्तावित इतरही प्रकल्प मार्गी लागतील धनंजय मुंडेंना विश्वास


परळी (दि. 21) - बीड जिल्ह्यातील उपळी ता. धारूर येथील गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळ अंतर्गत येणाऱ्या कुंडलिका मध्यम प्रकल्पातून उजव्या कालव्या द्वारे लोणवळ तलावात सोडण्यात येणारे पाणी बचत व लाभ क्षेत्राची वाढ व्हावी, या माजी पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या सूचनेनुसार आता बंद नलिकेद्वारे वितरित करण्यात येणार असून, या दुरुस्ती कामासाठी 1 कोटी 13 लाख 66 हजार रुपये खर्चाच्या आरखड्यास जलसंपदा विभागाने प्रशासकीय मान्यता दिली आहे. 


लोणवळ तलावात बंद नलिकेद्वारे पाणी सोडल्याने पूर्वी पाणी वाहत जाऊन लागणारा वेळ कमी होणार असून त्याचबरोबर तेलगाव, कुप्पा, नित्रुड आदी भागातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध होणार आहे. माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे तत्कालीन पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यासह माजलगाव मतदारसंघाचे आमदार प्रकाश सोळंके यांनी वेळोवेळी यासह बीड जिल्ह्यातील अन्य काही लघु व मध्यम प्रकल्पातील दुरुस्ती व अन्य कामांसाठी पाठपुरावा केला होता. 


मागील अडीच वर्षांच्या काळात जलसंपदा विभागाने बीड जिल्ह्यातील प्रस्तावित असलेल्या काही लघु व मध्यम प्रकल्पांना पाणी उपलब्धीचा मार्ग मोकळा करून दिलेला आहे, त्या प्रकल्पांचे काम आगामी काही दिवसात हाती घेणे अपेक्षित आहे. त्याचबरोबर काही मध्यम व लघु प्रकल्पांचा गाळ काढून उंची वाढवणे, माजलगाव उजवा कालवा अस्तरीकरण, यासह काही तलावांच्या व कालव्यांच्या दुरुस्तीची कामे प्रस्तावित किंवा मान्यतेसाठी अंदाजपत्रकासह सादर करण्यात आलेली आहेत, जिल्ह्यातील ही सर्व कामे आगामी काळात मार्गी लागतील, असा विश्वास धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या