परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी  या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे  दर्शन घेतलं.  जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...

MB NEWS-पाश्चात्यांच्या अनुकरणापेक्षाभारतीय संस्कृती परंपरा जपणे आवश्यक- ष.ब्र 108 श्री सद्गुरु डॉ.विरूपाक्ष शिवाचार्य स्वामी

 पाश्चात्यांच्या अनुकरणापेक्षा भारतीय संस्कृती परंपरा जपणे आवश्यक-  ष.ब्र 108 श्री सद्गुरु डॉ.विरूपाक्ष शिवाचार्य स्वामी



परळी,भौतिक अलंकारांचे लक्ष कमी करून सात्विक अलंकारांचे धारण केले पाहिजे,  हे सध्याच्या युगात अतिशय आवश्यक आहे. पाश्चात्यांचे अनुकरण करण्यात धन्यता मानण्यापेक्षा आपली भारतीय संस्कृती परंपरा जपणे अतिशय आवश्यक आहे असे प्रतिपादन श्रीक्षेत्रमन्मथधाम संस्थान ,कपिलाधार मांजरसुंबा-बीड येथील  ष.ब्र 108 श्री सद्गुरु डॉ.विरूपाक्ष शिवाचार्य स्वामीजी केले                                          वीरशैव लिंगायत समाज परळीच्या वतीने   येथील श्री संत गुरुलिंग स्वामी मठ बेलवाडी मध्ये श्री ष ब्र 108 श्री गुरूशांतेश्वर  स्वामीजी(, हिरेमठ संस्थान, नेगळूरू, जिल्हा हावेरी,कर्नाटक) यांच्या आषाढमास तपोअनुष्ठान निमित्त  दिनांक 19जुलै 22  सायंकाळी पाच वाजता ष ब्र 108 सद्गुरु श्री विरुपाक्ष शिवाचार्य महाराज मन्मथधामकर  यांचे प्रवचन  झाले .                                       

       यावेळी मार्गदर्शन करताना परमपूज्य गुरुवर्यांनी बाह्य आवरण भस्म ,रुद्राक्ष माळा,  हे सर्व सात्विक अलंकार आहेत. इतर भौतिक अलंकार हे आपल्याला अहंकार देतात तर सात्विक अलंकार हे आपल्याला आत्मिक आनंद विनम्रता तसेच अलौकिक असे समाधान देतात. म्हणून भौतिक अलंकारांचे लक्ष कमी करून या सात्विक अलंकारांचे धारण केले पाहिजे हे सध्याच्या युगात अतिशय आवश्यक आहे. पाश्चात्यांचे अनुकरण करण्यात धन्यता मानण्यापेक्षा आपली भारतीय संस्कृती परंपरा जपणे अतिशय आवश्यक आहे. कुटुंबातील परिवारातील देशातील परस्पर सद्भाव वाढविणे आवश्यक आहे. वीरशैव  सिद्धांतामध्ये जीवात्मा शिव तत्वामध्ये विलिन करण्यासाठी तामसिक अलंकार पेक्षा सात्विक अलंकार जास्त महत्त्वाचे आहे. वीरशैवाचार षोडशसंस्कारातिल अत्यंत उपयुक्त व वैशिष्ट्य पूर्ण गर्भेष्टलिंगधारणेच्या संस्कार कुठलाही स्त्रीपुरुष मधील भेदभाव न मानता सर्वांना समान रूपाने लिंगधारण करण्या ची परंपरा विरशैवाचे एक अद्भुत वैशिष्ट्य आहे.असे  सद्गुरु डॉ.  विरुपाक्ष शिवाचार्य महाराजानी  आपल्या प्रवचनात सांगितले    यावेळी सर्व समाज बांधव व भाविकांची लक्षणीय उपस्थिती होती.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!