इमेज
  अहिल्यानगर ते बीड राज्य मार्गाच्या रुंदीकरणासाठी ९६६ कोटी रुपयांना मंजुरी ​अहिल्यानगर ते बीड या प्रमुख राज्य मार्ग क्र. १६ च्या सुधारणा व रुंदीकरणासाठी राज्य शासनाने ९६६ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. आमदारांचे स्वीय सहाय्यक विनोद रोडे यांनी यासंदर्भात अधिकृत माहिती दिली आहे. ​अहिल्यानगर ते बीड दरम्यानचा सुमारे ९६ किलोमीटर लांबीचा हा प्रमुख राज्य मार्ग अनेक वर्षांपासून अत्यंत धोकादायक आणि वळणावळणाचा बनला होता. यामुळे या मार्गावर वारंवार अपघात घडत होते. वाहनचालक, प्रवासी आणि स्थानिक नागरिकांकडून या रस्त्याच्या सुधारणेची मागणी सातत्याने केली जात होती. या पार्श्वभूमीवर आमदार धस यांनी विविध स्तरांवर प्रयत्न केले होते. ​राज्य शासनाने या आश्वासनाची पूर्तता करत टाकळी काझी ते बीड दरम्यान किमी १३/१०० ते १०९/७०० या टप्प्यातील संपूर्ण रस्त्याच्या सुधारणा कामासाठी हा निधी मंजूर केला आहे. या अंतर्गत धोकादायक वळणांचे सरळीकरण करणे, रस्त...

MB NEWS-ऊसतोड कामगारांच्या मुला-मुलींसाठी मंजूर 20 वसतिगृहे तात्काळ सुरू करा; धनंजय मुंडे यांची मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी

 ऊसतोड कामगारांच्या मुला-मुलींसाठी मंजूर 20 वसतिगृहे तात्काळ सुरू करा; धनंजय मुंडे यांची मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी






*शाळा-कॉलेज सुरू, आम्ही निधीही दिला, वसतिगृहे उभी, आता तातडीने प्रवेश सुरू करण्याची गरज; धनंजय मुंडेंचे पत्र*


मुंबई (दि. 06) - माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून ऊसतोड कामगारांच्या कल्याणासाठी साकारलेल्या लोकनेते गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार महामंडळाच्या अंतर्गत 2021 साली सुरू करण्यात आलेल्या संत भगवानबाबा शासकीय वसतिगृह योजनेतून पहिल्या टप्प्यात मंजूर करण्यात आलेली 20 वसतिगृहे तातडीने सुरू करून ऊसतोड कामगारांच्या पाल्यांसाठी तेथे प्रवेश प्रक्रिया सुरू करावी, अशी मागणी माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी एका पत्राद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. 

Click&watch:परळीत भाजपचे स्पाॅट पंचनामा आंदोलन......

जून 2021 मध्ये शासन निर्णय जारी करून संत भगवानबाबा शासकीय वसतिगृह योजनेच्या पहिल्या टप्प्यातील 20 वसतीगृहांना मंजुरी देण्यात आली होती. तसेच भाड्याच्या जागेत सदर वसतिगृहे उभारण्यासाठी आवश्यक निधी देखील उपलब्ध करून देण्यात आला होता. त्यानुसार इमारत अधिग्रहण व अन्य प्रक्रिया देखील समाज कल्याण विभागाने पूर्ण केलेली आहे. 


यांतर्गत बीड जिल्ह्यात मुला-मुलींसाठी स्वतंत्र प्रत्येकी 100 ची क्षमता असलेले 12 तर अहमदनगर व जालना जिल्ह्यात प्रत्येकी 4 असे एकूण 20 वसतिगृह मंजूर करण्यात आले आहेत.


ऊसतोडणी हंगाम संपल्याने सध्या ऊसतोड कामगार हे आपल्या गावीच असतात, मात्र मुला-मुलींच्या शाळेसाठी त्यांना तालुका किंवा जिल्ह्याच्या ठिकांनी त्यांना ठेवणे हे त्या कामगारांना परवडणारे नसते, त्यामुळे शिक्षणात खंड पडण्याची तसेच मुलींचे अल्प वयात लग्न लावून देण्याची भीती असते; यावर शिक्षण व त्याला पूरक सुविधा पुरवणे हाच दीर्घकालीन उपाय असून या उद्देशानेच संत भगवानबाबा शासकीय वसतिगृह योजना सुरू करण्यात आली होती, असेही धनंजय मुंडे यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.


दरम्यान महाविकास आघाडी सरकारच्या काळात या 20 वसतिगृहांना भाड्याच्या जागेत उभारण्यासाठी व अन्य पूरक सुविधांसाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला होता, सदर वसतिगृहाची इमारत अधिग्रहण आदी प्रक्रिया देखील पूर्ण करण्यात आलेली असून सध्या शाळा सुरू झाल्या आहेत तसेच महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रिया सुरू आहेत, त्यामुळे मंजूर 20 ही वसतिगृहे सरकारने तात्काळ सुरू करावेत व ऊसतोड कामगारांच्या पाल्यांना प्रवेश देणे सुरू करावे, अशी विनंती धनंजय मुंडे यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या