इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

MB NEWS-ओबीसी आरक्षण: निर्णयाचे प्रा.टी.पी.मुंडे यांनी केले स्वागत!

 ओबीसी आरक्षण:  निर्णयाचे प्रा.टी.पी.मुंडे यांनी केले स्वागत!




परळी वैजनाथ प्रतिनिधी

ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात आज सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला हा निकाल ओबीसीच्या भावना जपणारा निकाल आहे त्यामुळे ओबीसीच्या आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे या निर्णयाचे महाराष्ट्राचे ओबीसी नेते प्रा.टी.पी.मुंडे सर यांनी स्वागत केले आहे तसेच शिंदे फडणवीस सरकारचे व सर्वोच्च न्यायालयाचे त्यांनी आभार मानले आहेत. 



    बाटिया आयोगाने आपला अहवाल सर्वोच्च न्यायालयात सादर केल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने हा निकाल दिला आहे या निकालात सर्वोच्च न्यायालयाने ओबीसींना 27% राजकीय आरक्षण बहाल केले आहे त्यामुळे आरक्षणाचा प्रश्न सुटला आहे. वेळोवेळी ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या संदर्भात आपण आवाज उठवलेला आहे प्रसंगी आंदोलने केली आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थेतील  निवडणुकीमध्ये ओबीसींना त्यांच्या हक्काच्या राजकीय आरक्षणापासून वंचित राहावे लागले होते परंतु आता आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे.


   सर्वोच्च न्यायालयाने आपल्या सुनावणीत 27% राजकीय आरक्षणासह निवडणुका दोन आठवड्यात जाहीर करा असा आदेश दिला आहे. ओबीसींना त्यांच्या हक्काचे आरक्षण मिळाल्याने संपूर्ण ओबीसी मध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे 


   2019 पासून महाविकास आघाडी सरकारने एम्पिरिकल डेटा सादर केला नाही तसेच त्यावर ट्रिपल टेस्ट सुद्धा घेतली नाही त्यामुळे याचा फटका स्थानिक स्वराज्य संस्थेतील घेण्यात आलेल्या निवडणुकीत ओबीसींना बसला अनेक ओबीसी प्रतिनिधींना आरक्षणा विना निवडणूक लढवावी लागली.


   शिंदे फडणवीस सरकारने सत्तेवर आल्यानंतर सर्वप्रथम ओबीसी आरक्षणासंदर्भात बैठक घेऊन  सर्वोच्च न्यायालयामध्ये इम्पेरिकल डेटा सादर केला तसेच ट्रिपल टेस्ट पूर्ण केली त्यामुळे ओबीसी चे राजकीय आरक्षण पूर्ववत झाले त्यामुळे शिंदे फडणवीस सरकारचे त्यांनी आभार मानले आहेत तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!