इमेज
 चि. यशोधन आणि कु. किरण विवाहबंधनात: मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापुरात संपन्न झाला शाही विवाह सोहळा कोल्हापूर प्रतिनिधी: परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार आणि सौ. मनिषा अवचार यांचे सुपुत्र चि. यशोधन तसेच स्मृतीशेष रवींद्र मगदूम यांची कनिष्ठ सुपुत्री कु. किरण यांचा शुभविवाह नुकताच कोल्हापूर येथील एल. डी. लोन, चिंचवड रोड येथे अतिशय थाटामाटात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला सामाजिक, राजकीय,औष्णिक वीज निर्मिती,औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले. विशेषतः, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून अवचार आणि मगदूम कुटुंबाच्या आनंदात सहभाग नोंदवला. याप्रसंगी या प्रसंगी उपमुख्य अभियंता, भास्कर इंगळे कोराडी नागपूर, नितीन रडे. मुबंई, जगदीश मोरे, नासिक तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन आरोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय उदार, थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष अंगदभा...

MB NEWS-पंकजाताई मुंडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना दिले पत्र

 भगवान भक्तीगडावरील विकास कामांसाठी निधी मंजूर करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

पंकजाताई मुंडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना दिले पत्र

महाविकास आघाडी सरकारच्या काळात थांबविण्यात आला होता निधी


बीड  ।दिनांक२१।

राष्ट्रसंत भगवानबाबा यांचे जन्मस्थळ असलेल्या सावरगांव (ता. पाटोदा) येथील भगवान भक्तीगडावरील विकास कामांसाठी निधी मंजूर करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज संबंधित विभागाला दिले. भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांच्या पत्रावर मुख्यमंत्र्यांनी ही तातडीने कार्यवाही केली.  महाविकास आघाडी सरकारच्या काळात हा निधी थांबविण्यात आला होता, तो निधी आता मंजूर झाल्याने कामे पूर्ण होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.


    पंकजाताई मुंडे यांनी आज मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेऊन भगवान भक्तीगड तसेच जिल्हयातील अन्य विकास कामांबाबत पत्र देऊन निधी मंजूर करण्याची विनंती केली.भगवान भक्तीगडासाठी आपण मंत्री असताना २ कोटी ३५ लाख रूपये इतका निधी मंजूर केला होता. या निधीतील विकासाची अनेक कामे अद्याप पुर्ण झाली नाहीत.  या ठिकाणी राष्ट्रसंत भगवानबाबा यांची भव्य मुर्ती तसेच ध्यान मंदिर व स्मारकाचे काम पुर्ण झालेले आहे. मराठवाडयासह महाराष्ट्रातील ऊसतोडणी मजूरांचे श्रध्दास्थान आणि सर्वधर्म समभावाचे प्रतिक म्हणून  या गडाकडे पाहिले जाते.  ऊसतोड कामगारांच्या व सर्वसामान्य नागरिकांच्या कष्टातून (वर्गणीतून) ’भगवान भक्तीगडा’ची उभारणी झाली आहे. गडावरील अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी निधी मंजूर करावा अशी मागणी पंकजाताईंनी पत्राद्वारे केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी तात्काळ निधी मंजूरीचे आदेश दिले. दरम्यान या भेटीत पंकजाताईंनी जिल्हयातील अन्य विकासाचे प्रश्न सादर करत ते सोडवावेत अशी मागणी केली.

••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या