दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न

इमेज
  चैत्यभूमी दादर येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न बीड ,प्रतिनिधी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, चैत्यभूमी दादर (पश्चिम), मुंबई येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, हे शिबिर दि. १२ मे ते २१ मे २०२६ या कालावधीत संपन्न होणार आहे. बौद्ध धम्माचा सखोल अभ्यास करण्याची इच्छा असलेल्या विविध समाजातील धर्मांतरित बौद्ध बांधवांसाठी हे विशेष शिबिर आयोजित करण्यात आले आहे. सत्यशोधक ओबीसी परिषद, सत्यशोधक समाज महासंघ, चर्मकार संघ, अखिल भारतीय धम्म महासंघ, प्रजासत्ताक जनता परिषद तसेच इतर विविध माध्यमांतून धर्मांतरित झालेल्या ओबीसी, पूर्वाश्रमीचे मातंग, वाल्मिकी, चर्मकार, ढोर समाजातील बौद्ध बांधवांना या शिबिरात सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय डॉ. भीमराव य. आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच संस्थेचे ट्रस्टी व राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा मुंबई केंद्रीय कार्यालय प्रमुख आद. अॅड. डॉ. एस. के. भंडारे यांच्या सल्ल्याने या शिबिराचे आय...

MB NEWS - अंशतः बदल :विरोधी पक्षनेते अजित पवार उद्या फक्त परळी व अंबाजोगाई तालुक्याचाच दौरा करणार

 विरोधीपक्ष नेते अजितदादा पवार, माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या रविवारच्या बीड जिल्हा दौऱ्यात अंशतः बदल - ऍड. राजेश्वर चव्हाण



परळी व अंबाजोगाई तालुक्यात झालेल्या पीक नुकसानीची करणार पाहणी, अन्य तालुक्यातील नुकसानीचा घेणार आढावा


परळी वै. (दि. 30) - राज्याच्या विधानसभेचे विरोधीपक्ष नेते अजितदादा पवार हे बीड जिल्ह्याचे माजी पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या समवेत रविवारी (दि. 31 जुलै) सकाळी 8 वाजल्यापासून बीड जिल्ह्यातील परळी, अंबाजोगाई आदी तालुक्यांचा दौरा करणार असून, ते जिल्ह्यात पावसाने व किडीच्या प्रादूर्भावाने नुकसान झालेल्या पिकांची थेट बांधावर जाऊन पाहणी करणार आहेत अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष राजेश्वर आबा चव्हान यांनी दिली आहे.


रविवारी अजितदादा पवार व माजी मंत्री धनंजय मुंडे हे सकाळी 9 वाजता प्रभू वैद्यनाथांचे दर्शन घेऊन या दौऱ्याची सुरुवात करणार आहेत. मागील काही दिवसात गोगलगाय व अन्य किडीच्या प्रादुर्भावाने सोयाबीन सह विविध पिकांचे मोठे नुकसान झाले होते त्याचबरोबर काही ठिकाणी कमी व अधिक पावसाने पेरणी केलेले बियाणे उगवलेच नाही तर काही ठिकाणी अधिकच्या पावसाने शेतात पाणी साठलेले आहे. कोणत्याही परिस्थितीत बहुतांश शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आहे, असे असताना सत्ता पक्ष शेतकऱ्यांचे अश्रू पुसायला सध्यातरी उपलब्ध असल्याचे दिसत नाही, मात्र विरोधीपक्ष नेते अजितदादा पवार व धनंजय मुंडे हे मात्र शेतकऱ्यांच्या बांधावर उतरून त्यांना आधार देण्यासाठी सरसावले असल्याचे पाहायला मिळते आहे. 


दरम्यान अजितदादा पवार व धनंजय मुंडे हे परळी नंतर सकाळी 10.15 वा. जवळगाव ता. अंबाजोगाई येथील पीक नुकसानीची पाहणी करून स्थानिक शेतकऱ्यांशी संवाद साधतील, त्याचबरोबर ते बीड जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील शेतकरी प्रतिनिधी व लोकप्रतिनिधी यांची परळी व अंबाजोगाई येथे निवेदने स्वीकारून त्यांच्याकडून तालुकानिहाय माहिती घेतील. अंबाजोगाई वरून पुढे ते लातूर मार्गे मुंबईकडे प्रयाण करणार असून, बीड जिल्ह्यातील उर्वरित तालुक्यातील प्रत्यक्ष भेटी काही अपरिहार्य कारणांमुळे स्थगित करण्यात आल्या असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ऍड. राजेश्वर चव्हाण यांनी दिली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....