युवकांचा स्तुत्य उपक्रम....

इमेज
  महेश नवमीनिमित्त माहेश्वरी मित्र परिवारातर्फे गुरुकुलातील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप परळी वैजनाथ: प्रतिनिधी.... दरवर्षीप्रमाणे या वर्षीही महेश नवमीचा उत्सव अत्यंत उत्साहात आणि श्रद्धेने साजरा करण्यात आला. या महोत्सवाचे औचित्य साधून श्री स्वामी श्रद्धानंद गुरुकुल येथील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप करण्यात आले. युवकांच्या या कौतुकास्पद कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. हा सेवा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सिद्धांत मंत्री, केदार सारडा, हर्ष भंडारी, रुपेश बंग, अथर्व कलंत्री, अनिकेत सारडा, श्याम बजाज, यश डीडवाणी, श्रीनिवास जाजू, युवराज जाजू, गोकुल भंसाली, गणेश सोनी, तेजस इनदानी, जय तोष्णीवाल, यश लोढा तसेच समस्त माहेश्वरी मित्र परिवाराचे विशेष सहकार्य लाभले. माहेश्वरी मित्र परिवारातर्फे सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहे. समाजसेवा आणि सुसंस्कारांचे हे कार्य आपण सर्वांच्या साथीने असेच पुढे सुरू ठेवूया, असा संकल्प यावेळी करण्यात आला.

MB NEWS-दोन गावांना जोडणारा पुल नसल्याने ग्रामस्थांना करावा लागतोय नदीपात्रातून प्रवास

 पंकजाताई मुंडेंना व्हिडीओ काॅल करून बुलढाणा जिल्हयातील ग्रामस्थांनी मांडली व्यथा;पंकजाताई मुख्यमंत्र्यांना भेटल्या ; प्रश्न मार्गी लावण्याचा मुख्यमंत्र्यांनी दिला शब्द

दोन गावांना जोडणारा पुल नसल्याने ग्रामस्थांना करावा लागतोय नदीपात्रातून प्रवास

मुंबई  ।दिनांक २१।

सिंदखेडराजा व देऊळगाव राजा (जि. बुलढाणा) तालुक्यातील दोन गावांना जोडणारा पुल नसल्याने ऐन पावसाळ्यात ग्रामस्थांना मोठया अडचणीला सामोरे जात नदीपात्रातून प्रवास करावा लागत आहे. ग्रामस्थांनी ही समस्या आज भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांना व्हिडीओ काॅल करत त्यांचेसमोर मांडली. पंकजाताईंनी सायंकाळी  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटून यासंदर्भात पत्र दिल्यानंतर  हा प्रश्न लवकर सोडविण्याचा शब्द त्यांनी पंकजाताईना  दिल्याने ग्रामस्थ सुखावले आहेत.


   सिंदखेडराजा तालुक्यातील  मौजे जळगाव आणि देऊळगावराजा तालुक्यातील पिंपळगांव या दोन गावांना जोडणारा पुल नाही. सध्या मुसळधार पावसामुळे नदी दुथडी भरून वाहत आहे. पुल नसल्याने दोन्ही गावातील नागरिकांना तसेच विद्यार्थ्यांना वाहतूकीसाठी नदी पात्रातूनच प्रवास करावा लागतो त्यामुळे त्यांना मोठया अडचणीला सामोरे जावे लागत आहे. यासंदर्भात ग्रामस्थांनी गावांतील सामाजिक कार्यकर्ते  डॉ.सुनील कायंदे यांच्या माध्यमातून आज दुपारी पंकजाताई मुंडे यांच्याशी व्हिडीओ कॉलवर संवाद साधला. पंकजाताईंनी यावेळी ग्रामस्थांच्या अडचणी व त्यांची व्यथा जाणून घेतली. पुलाची निर्मिती करून होणारा त्रास कमी करावा अशी विनंती सर्व ग्रामस्थांनी  यावेळी केली. यासंदर्भात पंकजाताईंनी सायंकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन पत्र दिले आणि लवकरात लवकर पुलाचा प्रश्न सोडवण्याची विनंती केली, यावर मुख्यमंत्र्यांनी हा प्रश्न तातडीने मार्गी लावू असा शब्द देत संबंधित विभागाला आदेशित केले.   

••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या