परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी  या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे  दर्शन घेतलं.  जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...

MB NEWS-दोन गावांना जोडणारा पुल नसल्याने ग्रामस्थांना करावा लागतोय नदीपात्रातून प्रवास

 पंकजाताई मुंडेंना व्हिडीओ काॅल करून बुलढाणा जिल्हयातील ग्रामस्थांनी मांडली व्यथा;पंकजाताई मुख्यमंत्र्यांना भेटल्या ; प्रश्न मार्गी लावण्याचा मुख्यमंत्र्यांनी दिला शब्द

दोन गावांना जोडणारा पुल नसल्याने ग्रामस्थांना करावा लागतोय नदीपात्रातून प्रवास

मुंबई  ।दिनांक २१।

सिंदखेडराजा व देऊळगाव राजा (जि. बुलढाणा) तालुक्यातील दोन गावांना जोडणारा पुल नसल्याने ऐन पावसाळ्यात ग्रामस्थांना मोठया अडचणीला सामोरे जात नदीपात्रातून प्रवास करावा लागत आहे. ग्रामस्थांनी ही समस्या आज भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांना व्हिडीओ काॅल करत त्यांचेसमोर मांडली. पंकजाताईंनी सायंकाळी  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटून यासंदर्भात पत्र दिल्यानंतर  हा प्रश्न लवकर सोडविण्याचा शब्द त्यांनी पंकजाताईना  दिल्याने ग्रामस्थ सुखावले आहेत.


   सिंदखेडराजा तालुक्यातील  मौजे जळगाव आणि देऊळगावराजा तालुक्यातील पिंपळगांव या दोन गावांना जोडणारा पुल नाही. सध्या मुसळधार पावसामुळे नदी दुथडी भरून वाहत आहे. पुल नसल्याने दोन्ही गावातील नागरिकांना तसेच विद्यार्थ्यांना वाहतूकीसाठी नदी पात्रातूनच प्रवास करावा लागतो त्यामुळे त्यांना मोठया अडचणीला सामोरे जावे लागत आहे. यासंदर्भात ग्रामस्थांनी गावांतील सामाजिक कार्यकर्ते  डॉ.सुनील कायंदे यांच्या माध्यमातून आज दुपारी पंकजाताई मुंडे यांच्याशी व्हिडीओ कॉलवर संवाद साधला. पंकजाताईंनी यावेळी ग्रामस्थांच्या अडचणी व त्यांची व्यथा जाणून घेतली. पुलाची निर्मिती करून होणारा त्रास कमी करावा अशी विनंती सर्व ग्रामस्थांनी  यावेळी केली. यासंदर्भात पंकजाताईंनी सायंकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन पत्र दिले आणि लवकरात लवकर पुलाचा प्रश्न सोडवण्याची विनंती केली, यावर मुख्यमंत्र्यांनी हा प्रश्न तातडीने मार्गी लावू असा शब्द देत संबंधित विभागाला आदेशित केले.   

••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!