इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

MB NEWS-शेतकऱ्यांच्या प्रश्नावर किसान सभा आक्रमक*

 शेतकऱ्यांच्या प्रश्नावर किसान सभा आक्रमक



विविध प्रश्नावर सिरसाळ्यात उद्या चक्का जाम आंदोलन- कॉ मुरलीधर नागरगोजे


परळी वै /  प्रतिनिधी


मागील वर्षी ३ काळे कृषी कायदे वापस घेल्यानंतर संयुक्त किसान मोर्चाला शेतकरी आंदोलन मागे घेण्यासाठी केंद्र सरकारने आंदोलकांवर दाखल केलेले गुन्हे मागे घेतले जातील व शेतकऱ्यांना हमीभाव देण्यासाठी केंद्रीय समिती स्थापन करून तोडगा काढण्याचे आश्वासन दिले होते परंतु ते पाळले गेले नाही म्हणून रविवारी (ता३१) देशव्यापी "विश्वास घात" दिवस पाळुण सिरसाळा येथे चक्का जाम आंदोलन करण्यात येणार आहे.


    एमएसपी ची केवळ घोषणा नको. उत्पादन खर्चावर आधारित दीडपट जास्त हमीभावाचा कायदा करा. केवळ सत्ता मिळवण्यासाठीच स्वामीनाथन आयोगाचा पुळका कशाला? आता त्याची शेतकरी हितासाठी अंमलबजावणी करा. शेतकऱ्यांना आत्महत्येच्या गर्त्यात लोटणारे आयात-निर्यात धोरण बदलून ते खऱ्या अर्थाने शेतकरी हिताचे करा. संयुक्तकिसान मोर्चाच्या किसान आंदोलनात सरकारने शेतकऱ्यांवर दडपशाहीने दाखल केलेले सर्व गुन्हे वापस घ्या. रासायनिक खतांच्या किंमती कमी करुन खतांचा काळाबाजार थांबवा. शेती उपयोगी सर्व साहित्य जीएसटी कक्षेतून वगळून ते मोठ्या अनुदानावर व मुबलक प्रमाणात शेतकऱ्यांना उपलब्ध करून द्या. सर्व प्रलंबित पीक विम्याचे शेतकऱ्यांना लवकरात लवकर वाटप करा. यासह विविध मागण्सांसाठी महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या वतीने रविवारी (ता.३०) सकाळी 11 वाजता सिरसाळा येथील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक येथे चक्का जाम आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात शेतकऱ्यांनी मोठया संख्येनी सहभागी व्हावे असे आवाहन किसान सभेचे कॉ.भगवान बडे, कॉ.गंगाधर पोटभरे, कॉ. महादेव शेरकर, कॉ.मनोज स्वामी, कॉ.संजय नवघरे, कॉ. मदन वाघमारे यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!