इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

 नीट परिक्षेचा निकाल 7 तारखेला !




नवी दिल्ली- मेडिकल एन्टरन्स परीक्षेच्या अर्थात नीट ची निकालाची तारीख जाहीर झाली आहे.7 सप्टेंबर रोजी हा निकाल लागणार असून त्यापूर्वी omr शिट्स आणि उत्तरपत्रिका मिळेल.त्यामुळे विद्यार्थ्यांनो तयारीत रहा अन अपडेट मिळवण्यासाठी News&Views शी कनेक्टेड रहा.


नीट परीक्षा दिलेल्या विद्यार्थी आणि पालकांसाठी मोठी बातमी आहे. NEET परीक्षेच्या निकालाची तारीख जाहीर झाली आहे. ७ सप्टेंबर रोजी हा निकाल लागणार असल्याची माहिती मिळाली आहे.


राष्ट्रीय परीक्षा एजन्सीने याबाबत माहिती दिली आहे. देशातील एकूण १८, ७२, ३२९ विद्यार्थ्यांनी नीट परीक्षा दिली होती. त्यापैकी १०.६४ विद्यार्थीनी असल्याची माहिती मिळाली आहे. देशात नीटसाठी पहिल्यांदाच १८ लाखहून अधिक विद्यार्थ्यांनी अर्ज भरले होते.


याचे निकाल 30 ऑगस्ट आणि ७ सप्टेंबर रोजी येणार आहेत.


गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा नीट परीक्षेसाठी बसणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये २.५ लाख विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे. १७ जुलै रोजी नीट परीक्षा घेण्यात आली होती.


या परीक्षेचा निकाल तुम्ही ऑनलाइन पाहू शकता. neet.nta.nic.in या वेबसाईटवर जाऊन तुम्ही तुमचा निकाल पाहू शकणार आहात. तिथे तुमचा सीट नंबर आणि दिलेली माहिती अपलोड केल्यानंतर तुम्हाला निकाल पाहता येईल


त्याचा निकाल आता जाहीर होणार आहे. विद्यार्थ्यांना दिलेल्या ईमेल आयडीवर उत्तर की, OMR शीट्स रिलीझ करण्याबाबत अपडेट मिळेल. एकदा जाहीर केल्यानंतर, विद्यार्थ्यांना त्यावर आक्षेप घ्यायचा असेल तर ती संधी दिली जाणार आहे. त्यानंतर अंतिम निकाल ७ सप्टेंबरपर्यंत येईल अशी माहिती मिळाली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!