परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी  या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे  दर्शन घेतलं.  जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...

पीकविमा प्रश्नी किसान सभा दिल्लीत

 *■ पीकविमा प्रश्नी किसान सभा दिल्लीत*



● ऍड.अजय बुरांडेसह शिस्ट मंडळाने घेतली कृषी सचिवांची भेट


परळी / प्रतिनिधी


सण २०२० खरीप पीकविमा शेतकऱ्यांनी वेळेत तक्रार दाखल केली नाही म्हणून विमा कंपनीने विमा देण्यास नाकारला होता त्यासाठी किसान सभेने मागील २ वर्षापासून शेतकऱ्यांची बाजू राज्य व केंद्र पातळीवर लावून धरली आहे.त्याचाच भाग म्हणून ३ ऑगस्ट रोजी महाराष्ट्र राज्य किसान सभेचे शिष्टमंडळ या प्रश्नांचा पाठपुरावा करण्यासाठी दिल्लीत पोहोचले आहे.


४ ऑगस्ट रोजी कृषी सचिव श्री. मनोज कुमार यांना भेटून शिष्टमंडळाने सविस्तर चर्चा केली. तद्नंतर जे प्रधानमंत्री पीक विमा योजनेचे देशाचं काम पाहतात असे कृषी सहसचिव श्री. रितेश चौहान यांची देखील भेट घेऊन जोरकसपणे शेतकऱ्यांची बाजू पुराव्यानिशी मांडली. यावेळी देशाचे कृषी सहसचिव श्री.चौहान यांनीआपण यावर सहानुभूतीने निर्णय घेण्याचा प्रयत्न करू असे सांगितले. सोबतच संबंधित प्रकरणात विमा कंपन्यांचे असोसिएशन सुप्रीम कोर्टात गेल्याने, सदर प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने त्यावर तात्काळ निर्णय घेणे उचित ठरणार नाही असे कळवले.


पुढील प्रयत्नांचा भाग म्हणून किसान सभा आज शुक्रवार दि 5 रोजी सर्वोच्च न्यायालयात, कोर्टाने शेतकऱ्यांची बाजू ऐकावी यासाठी कायदेशीर पावलं उचलत असून, विधितज्ञांच्या भेटी-गाठी घेत, कायदेशीर सल्ला घेऊन सावध पावलं टाकत आहे. किसान सभेच्या दिल्लीत गेलेल्या या शिष्ठ मंडळाची  केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्याशी गुरुवार दि 4 रोजी ठरलेली नियोजित भेट कृषी मंत्री आजारी असल्याने होऊ शकली नाही.शुक्रवार दि 5 रोजी पुन्हा एखादा हे शिष्टमंडळ कृषी मंत्र्यांना भेटून शेतकऱ्यांवर झालेला अन्याय किसान सभा त्यांच्या लक्षात आणून देण्याचा प्रयत्न करत आहे.


पीक विमा प्रश्नी दिल्लीत गेलेल्या या शिष्टमंडळात महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या व शेतकऱ्यांच्या वतीने कॉम्रेड अजय बुरांडे, बीड जिल्हा किसान सभेचे सचिव कॉम्रेड मुरलीधर नागरगोजे, कॉम्रेड दत्ता डाके व जगदीश फरताडे बाजू मांडत आहेत, तर शिष्टमंडळाचे नेतृत्व अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष कॉम्रेड अशोक ढवळे हे करत आहेत.दिल्ली येथील प्रशासकीय अधिकारी व विविध केंद्रीय मंत्री यांना भेटीगाठीचे नियोजन व शिष्टमंडळाला लागेल ती मदत केरळचे नवनिर्वाचित राज्यसभा खासदार डॉ. शिवदासन हे करीत आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!