इमेज
 चि. यशोधन आणि कु. किरण विवाहबंधनात: मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापुरात संपन्न झाला शाही विवाह सोहळा कोल्हापूर प्रतिनिधी: परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार आणि सौ. मनिषा अवचार यांचे सुपुत्र चि. यशोधन तसेच स्मृतीशेष रवींद्र मगदूम यांची कनिष्ठ सुपुत्री कु. किरण यांचा शुभविवाह नुकताच कोल्हापूर येथील एल. डी. लोन, चिंचवड रोड येथे अतिशय थाटामाटात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला सामाजिक, राजकीय,औष्णिक वीज निर्मिती,औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले. विशेषतः, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून अवचार आणि मगदूम कुटुंबाच्या आनंदात सहभाग नोंदवला. याप्रसंगी या प्रसंगी उपमुख्य अभियंता, भास्कर इंगळे कोराडी नागपूर, नितीन रडे. मुबंई, जगदीश मोरे, नासिक तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन आरोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय उदार, थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष अंगदभा...

पीकविमा प्रश्नी किसान सभा दिल्लीत

 *■ पीकविमा प्रश्नी किसान सभा दिल्लीत*



● ऍड.अजय बुरांडेसह शिस्ट मंडळाने घेतली कृषी सचिवांची भेट


परळी / प्रतिनिधी


सण २०२० खरीप पीकविमा शेतकऱ्यांनी वेळेत तक्रार दाखल केली नाही म्हणून विमा कंपनीने विमा देण्यास नाकारला होता त्यासाठी किसान सभेने मागील २ वर्षापासून शेतकऱ्यांची बाजू राज्य व केंद्र पातळीवर लावून धरली आहे.त्याचाच भाग म्हणून ३ ऑगस्ट रोजी महाराष्ट्र राज्य किसान सभेचे शिष्टमंडळ या प्रश्नांचा पाठपुरावा करण्यासाठी दिल्लीत पोहोचले आहे.


४ ऑगस्ट रोजी कृषी सचिव श्री. मनोज कुमार यांना भेटून शिष्टमंडळाने सविस्तर चर्चा केली. तद्नंतर जे प्रधानमंत्री पीक विमा योजनेचे देशाचं काम पाहतात असे कृषी सहसचिव श्री. रितेश चौहान यांची देखील भेट घेऊन जोरकसपणे शेतकऱ्यांची बाजू पुराव्यानिशी मांडली. यावेळी देशाचे कृषी सहसचिव श्री.चौहान यांनीआपण यावर सहानुभूतीने निर्णय घेण्याचा प्रयत्न करू असे सांगितले. सोबतच संबंधित प्रकरणात विमा कंपन्यांचे असोसिएशन सुप्रीम कोर्टात गेल्याने, सदर प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने त्यावर तात्काळ निर्णय घेणे उचित ठरणार नाही असे कळवले.


पुढील प्रयत्नांचा भाग म्हणून किसान सभा आज शुक्रवार दि 5 रोजी सर्वोच्च न्यायालयात, कोर्टाने शेतकऱ्यांची बाजू ऐकावी यासाठी कायदेशीर पावलं उचलत असून, विधितज्ञांच्या भेटी-गाठी घेत, कायदेशीर सल्ला घेऊन सावध पावलं टाकत आहे. किसान सभेच्या दिल्लीत गेलेल्या या शिष्ठ मंडळाची  केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्याशी गुरुवार दि 4 रोजी ठरलेली नियोजित भेट कृषी मंत्री आजारी असल्याने होऊ शकली नाही.शुक्रवार दि 5 रोजी पुन्हा एखादा हे शिष्टमंडळ कृषी मंत्र्यांना भेटून शेतकऱ्यांवर झालेला अन्याय किसान सभा त्यांच्या लक्षात आणून देण्याचा प्रयत्न करत आहे.


पीक विमा प्रश्नी दिल्लीत गेलेल्या या शिष्टमंडळात महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या व शेतकऱ्यांच्या वतीने कॉम्रेड अजय बुरांडे, बीड जिल्हा किसान सभेचे सचिव कॉम्रेड मुरलीधर नागरगोजे, कॉम्रेड दत्ता डाके व जगदीश फरताडे बाजू मांडत आहेत, तर शिष्टमंडळाचे नेतृत्व अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष कॉम्रेड अशोक ढवळे हे करत आहेत.दिल्ली येथील प्रशासकीय अधिकारी व विविध केंद्रीय मंत्री यांना भेटीगाठीचे नियोजन व शिष्टमंडळाला लागेल ती मदत केरळचे नवनिर्वाचित राज्यसभा खासदार डॉ. शिवदासन हे करीत आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या