मोठ्या संख्येने उपस्थित रहा....

इमेज
द्रोणाचार्य सेमी इंग्लिश स्कूल व पूजा प्राथमिक विद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे आज आयोजन परळी वैजनाथ | प्रतिनिधी द्रोणाचार्य सेमी इंग्लिश स्कूल व पूजा प्राथमिक विद्यालय, परळी वैजनाथ यांच्या वतीने २० वे वार्षिक स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले आहे. हे स्नेहसंमेलन आज  बुधवार, दि. ५ फेब्रुवारी २०२५ रोजी दुपारी ३.३० वाजता लोकनेते गोपीनाथराव मुंडे  नटराज रंग मंदिर, परळी वैजनाथ येथे संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रामलिंग राजनळे सर (माजी मुख्याध्यापक, वैद्यनाथ विद्यालय) राहणार असून उद्घाटन  गणेश गिरी (गटशिक्षणाधिकारी, गटसाधन केंद्र, परळी वै.) यांच्या हस्ते होणार आहे. या काकार्यक्रमास बाजीराव  भैय्या   धर्माधिकारी (माजी नगराध्यक्ष),  कोकणे  (विस्ताराधिकारी),  धनंजय ढोणे  (पोलीस निरीक्षक),  दिवाकर जोशी (गझलकार), प्रा. रविंद्र जोशी सर (पत्रकार,  दैनिक पुढारी),  व्यंकटेश शिंदे (नगरसेवक) हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.           स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांचे नृत...

पीकविमा प्रश्नी किसान सभा दिल्लीत

 *■ पीकविमा प्रश्नी किसान सभा दिल्लीत*



● ऍड.अजय बुरांडेसह शिस्ट मंडळाने घेतली कृषी सचिवांची भेट


परळी / प्रतिनिधी


सण २०२० खरीप पीकविमा शेतकऱ्यांनी वेळेत तक्रार दाखल केली नाही म्हणून विमा कंपनीने विमा देण्यास नाकारला होता त्यासाठी किसान सभेने मागील २ वर्षापासून शेतकऱ्यांची बाजू राज्य व केंद्र पातळीवर लावून धरली आहे.त्याचाच भाग म्हणून ३ ऑगस्ट रोजी महाराष्ट्र राज्य किसान सभेचे शिष्टमंडळ या प्रश्नांचा पाठपुरावा करण्यासाठी दिल्लीत पोहोचले आहे.


४ ऑगस्ट रोजी कृषी सचिव श्री. मनोज कुमार यांना भेटून शिष्टमंडळाने सविस्तर चर्चा केली. तद्नंतर जे प्रधानमंत्री पीक विमा योजनेचे देशाचं काम पाहतात असे कृषी सहसचिव श्री. रितेश चौहान यांची देखील भेट घेऊन जोरकसपणे शेतकऱ्यांची बाजू पुराव्यानिशी मांडली. यावेळी देशाचे कृषी सहसचिव श्री.चौहान यांनीआपण यावर सहानुभूतीने निर्णय घेण्याचा प्रयत्न करू असे सांगितले. सोबतच संबंधित प्रकरणात विमा कंपन्यांचे असोसिएशन सुप्रीम कोर्टात गेल्याने, सदर प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने त्यावर तात्काळ निर्णय घेणे उचित ठरणार नाही असे कळवले.


पुढील प्रयत्नांचा भाग म्हणून किसान सभा आज शुक्रवार दि 5 रोजी सर्वोच्च न्यायालयात, कोर्टाने शेतकऱ्यांची बाजू ऐकावी यासाठी कायदेशीर पावलं उचलत असून, विधितज्ञांच्या भेटी-गाठी घेत, कायदेशीर सल्ला घेऊन सावध पावलं टाकत आहे. किसान सभेच्या दिल्लीत गेलेल्या या शिष्ठ मंडळाची  केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्याशी गुरुवार दि 4 रोजी ठरलेली नियोजित भेट कृषी मंत्री आजारी असल्याने होऊ शकली नाही.शुक्रवार दि 5 रोजी पुन्हा एखादा हे शिष्टमंडळ कृषी मंत्र्यांना भेटून शेतकऱ्यांवर झालेला अन्याय किसान सभा त्यांच्या लक्षात आणून देण्याचा प्रयत्न करत आहे.


पीक विमा प्रश्नी दिल्लीत गेलेल्या या शिष्टमंडळात महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या व शेतकऱ्यांच्या वतीने कॉम्रेड अजय बुरांडे, बीड जिल्हा किसान सभेचे सचिव कॉम्रेड मुरलीधर नागरगोजे, कॉम्रेड दत्ता डाके व जगदीश फरताडे बाजू मांडत आहेत, तर शिष्टमंडळाचे नेतृत्व अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष कॉम्रेड अशोक ढवळे हे करत आहेत.दिल्ली येथील प्रशासकीय अधिकारी व विविध केंद्रीय मंत्री यांना भेटीगाठीचे नियोजन व शिष्टमंडळाला लागेल ती मदत केरळचे नवनिर्वाचित राज्यसभा खासदार डॉ. शिवदासन हे करीत आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....