युवकांचा स्तुत्य उपक्रम....

इमेज
  महेश नवमीनिमित्त माहेश्वरी मित्र परिवारातर्फे गुरुकुलातील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप परळी वैजनाथ: प्रतिनिधी.... दरवर्षीप्रमाणे या वर्षीही महेश नवमीचा उत्सव अत्यंत उत्साहात आणि श्रद्धेने साजरा करण्यात आला. या महोत्सवाचे औचित्य साधून श्री स्वामी श्रद्धानंद गुरुकुल येथील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप करण्यात आले. युवकांच्या या कौतुकास्पद कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. हा सेवा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सिद्धांत मंत्री, केदार सारडा, हर्ष भंडारी, रुपेश बंग, अथर्व कलंत्री, अनिकेत सारडा, श्याम बजाज, यश डीडवाणी, श्रीनिवास जाजू, युवराज जाजू, गोकुल भंसाली, गणेश सोनी, तेजस इनदानी, जय तोष्णीवाल, यश लोढा तसेच समस्त माहेश्वरी मित्र परिवाराचे विशेष सहकार्य लाभले. माहेश्वरी मित्र परिवारातर्फे सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहे. समाजसेवा आणि सुसंस्कारांचे हे कार्य आपण सर्वांच्या साथीने असेच पुढे सुरू ठेवूया, असा संकल्प यावेळी करण्यात आला.

 *सरकारमध्ये कामगार प्रतिनिधी नसल्यानेच कामगारांचे प्रश्न सुटत नाहीत- काॅ. डी एल कराड* 



परळी वैजनाथ, प्रतिनिधी ...

        राज्य व केंद्र सरकारमध्ये कामगारांचे प्रतिनिधी प्रतिनिधित्व करीत नसल्यामुळेच वर्षानुवर्ष कामगारांचे प्रश्न प्रलंबित राहतात. याचा विचार करून कामगार एकजुटीने सरकारला नमवले पाहिजे असे प्रतिपादन सिटूचे राष्ट्रीय उपाध्यक्ष काॅ. डी एल कराड यांनी केले.

         परळी वैजनाथ येथे दिनांक 23 ऑगस्ट रोजी बीड जिल्हा सिटूचे अधिवेशन पार पडले. या अधिवेशनाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून कराड उपस्थित होते. या अधिवेशनाला सिटू संघटनेचे राज्य सरचिटणीस काॅ.एम.एम. शेख, राज्य कोषाध्यक्ष के आर रघु उपस्थित होते. संघटनेचे सरचिटणीस डॉ. अशोक थोरात यांनी संघटनेच्या मागील तीन वर्षाचा कार्य अहवाल सादर केला व अधिवेशनात तो मंजूर करण्यात आला.काॅ.  एम एम शेख यांनी यावेळी राज्यातील व देशातील कामगारांच्या प्रश्नाबद्दल मार्गदर्शन करून संघटनेत एकजुटीने सक्रिय होऊन लढा दिल्यास हमखास यश येते त्यामुळे सर्वांनी संघटित व्हावे असे आवाहन केले.

     यावळी डी वाय एफ आय चे जिल्हा अध्यक्ष विशाल देशमुख, शेतमजूर युनियन चे जिल्हा अध्यक्ष सुदाम शिंदे, किसान सभेचे जिल्हा अध्यक्ष मुरलीधर नागरगोजे यांनी या मेळाव्याला शुभेच्छा दिल्या.

   यावेळी नूतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. यामध्ये काॅ. बी जी खाडे यांची अध्यक्षपदी व अशोक थोरात यांची सरचिटणीस म्हणून निवड करण्यात आली. कॉ. शिवाजी कुरे व काॅ. दत्ता डाके यांची उपाध्यक्षपदी व किरण सावजी यांची कोषाध्यक्ष म्हणून निवड झाली. कॉ के आर रघु यांनी नवीन कार्यकारणीला मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा बीजी खाडे यांनी अध्यक्षीय समारोप केला तर शिवाजी कुरे यांनी आभार प्रदर्शन केले. या अधिवेशनास बीड जिल्ह्यातील 80 प्रतिनिधी उपस्थित होते. अधिवेशन यशस्वी करण्यासाठी शेख जावेद, जालिंदर गिरी, सुवर्णा रेवले, उर्मिला लांबोटे, साईराम कांबळे, यासीन शेख, साबिर शेख ,शेख जावेद, प्रकाश वाघमारे मंगेश सरवदे ,बाबा रोडे आदींनी परिश्रम घेतले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या