इमेज
  परळीजवळील चांदापूर तलावात बुडालेल्या युवकाचा दोन दिवसांनंतरही शोध लागेना; शोधकार्य युद्धपातळीवर सुरू परळी वैजनाथ: प्रतिनिधी... परळी शहराजवळील चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेलेला सुमित कलशेट्टी (वय ३७, रा. सुर्वेश्वर नगर, परळी वैजनाथ) हा युवक पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तलावात बुडाला. या दुर्दैवी घटनेला तब्बल दोन दिवस उलटून गेले आहेत. मात्र, अद्यापही या युवकाचा कोणताही पत्ता लागलेला नाही. स्थानिक प्रशासन आणि नागरिकांच्या वतीने तलावात शोधकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.      सुमित कलशेट्टी हे मंगळवारी (दि. २३ जून) सकाळी चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेले होते. पोहत असताना अचानक पाण्याचा अंदाज चुकल्यामुळे ते तलावाच्या खोल भागात गेले आणि बेपत्ता झाले. ते बराच वेळ बाहेर न आल्याने उपस्थित नागरिकांच्या लक्षात ही बाब आली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि प्रशासकीय पथकाने तातडीने तलावाकडे धाव घेतली. गेल्या दोन दिवसांपासून स्थानिक  आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या मदतीने तलावाच्या कानाकोपऱ्यात शोध घेतला जात आहे. मात्र, अद्याप यश आलेले नाही. या अत्यंत दुर्दैवी आण...

*मोखाडयातील घटना दुर्दैवी ; सरकारने आदिवासी भागात तातडीने मुलभूत सुविधा पुरवाव्यात* - *पंकजाताई मुंडे यांची राज्य सरकारकडे मागणी*

 *मोखाडयातील घटना दुर्दैवी ; सरकारने आदिवासी भागात तातडीने मुलभूत सुविधा पुरवाव्यात*



 - *पंकजाताई मुंडे यांची राज्य सरकारकडे मागणी* 


मुंबई  ।दिनांक १६।

आरोग्य सुविधा वेळेत न मिळाल्याने मोखाडा (जि. पालघर) तालुक्यातील एका गर्भवती महिलेच्या जुळ्या बालकांचा झालेला मृत्यु हा दुर्दैवी आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षांत विकासरूपी पोषण अजूनही दुर्गम भागात नाही याचं दुःख आहे असं ट्विट भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी केलं आहे. त्यांच्या या ट्विटची आदिवासी विकासमंत्री विजयकुमार गावित यांनी तातडीने दखल घेतली आहे. 


    जव्हार - मोखाडा सारख्या दुर्गम भागातील आदिवासी महिलेच्या बाबतीत घडलेला हा प्रकार दुर्दैवी आहे, या घटनेने मी व्यथित झाले आहे असे पंकजाताई म्हणाल्या.   "एका माऊलीला जुळ्या मुलांना जीव गमवावा लागला. कारण गावाला रस्ता नाही.गरिबांच्या गरजा आणि जीवाची लढाई आजही कठीण आहे.अमृत महोत्सवी वर्षात देशाच्या या भागात विकास रूपी पोषण अजुनही नाही याचं दुःख व दुर्दैवी वाटले " असं ट्विट त्यांनी केलं आहे.


 मी स्वतः याबाबत राज्य सरकारला पत्र लिहिणार आहे. मी मंत्री असताना दुर्गम भागातील रस्त्याकडे  विशेष लक्ष दिले होते. मंत्री आणि अधिकाऱ्यांनी योग्य समन्वय साधून काम केलं पाहिजे. सरकारने दुर्गम भागाच्या विकासाकडे लक्ष द्यावे आणि राज्य सरकार ते करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. दरम्यान पंकजाताई यांच्या ट्विटची आदिवासी विकास मंत्री गावित यांनी तातडीने दखल घेत सरकारी पातळीवर हालचाली सुरू केल्या आहेत. 

••••

----------------------------------------------------------

Click: *घरफोडी:दीड लाखाची रोख रक्कम चोरली*

Click: *सावधान: ओटीपी विचारून दीड लाखाचा गंडा*

Click:*भाजप संसदीय मंडळातून नितीन गडकरी बाहेर तर केंद्रीय निवडणूक प्रचार समितीत देवेंद्र फडणवीस*

Click:*राणी लक्ष्मीबाई टॉवर येथील समूह राष्ट्रगीत गायनात नागरिकांचा स्वयंस्फूर्तीने सहभाग*

Click:*श्रीमती महानंदाबाई गंगाधरअप्पा बुरांडे यांचा सत्कार*

Click:*परळीतील व्यापाऱ्यांनी केले सामूहिक राष्ट्रगीत गायन*

Click:● *वैद्यनाथ ज्योतिर्लिंग स्थान:आंतरराष्ट्रीय कथा व्यासपीठावरुन धनंजय मुंडेंनी ठणकावून सांगितले......* _MB NEWS ला नक्की SUBSCRIBE करा._

■ VIDEO News ■

--------------------------------------------

Click:  ■ *LIC मध्ये नौकरीची सुवर्णसंधी*

Click :■ *१५ आँगस्टला घरी फडकवलेल्या राष्ट्रध्वजाचे नंतर करायचे काय ?*

■ VIDEO News ■





टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या