इमेज
  परळीजवळील चांदापूर तलावात बुडालेल्या युवकाचा दोन दिवसांनंतरही शोध लागेना; शोधकार्य युद्धपातळीवर सुरू परळी वैजनाथ: प्रतिनिधी... परळी शहराजवळील चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेलेला सुमित कलशेट्टी (वय ३७, रा. सुर्वेश्वर नगर, परळी वैजनाथ) हा युवक पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तलावात बुडाला. या दुर्दैवी घटनेला तब्बल दोन दिवस उलटून गेले आहेत. मात्र, अद्यापही या युवकाचा कोणताही पत्ता लागलेला नाही. स्थानिक प्रशासन आणि नागरिकांच्या वतीने तलावात शोधकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.      सुमित कलशेट्टी हे मंगळवारी (दि. २३ जून) सकाळी चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेले होते. पोहत असताना अचानक पाण्याचा अंदाज चुकल्यामुळे ते तलावाच्या खोल भागात गेले आणि बेपत्ता झाले. ते बराच वेळ बाहेर न आल्याने उपस्थित नागरिकांच्या लक्षात ही बाब आली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि प्रशासकीय पथकाने तातडीने तलावाकडे धाव घेतली. गेल्या दोन दिवसांपासून स्थानिक  आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या मदतीने तलावाच्या कानाकोपऱ्यात शोध घेतला जात आहे. मात्र, अद्याप यश आलेले नाही. या अत्यंत दुर्दैवी आण...

MB NEWS- *'हर घर तिरंगा' अभियानांतर्गत प्रत्येकाने आपल्या घरावर तिरंगा ध्वज फडकवावा - पंकजाताई मुंडे यांचं आवाहन*

 *'हर घर तिरंगा' अभियानांतर्गत प्रत्येकाने आपल्या घरावर तिरंगा ध्वज फडकवावा - पंकजाताई मुंडे यांचं आवाहन* 


*भाजपच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी स्वतःसह नागरिकांना अभियानात सहभागी करून घ्यावं*



*स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव; १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान देशभरात राबविण्यात येणार अभियान* 


परळी । दिनांक ०३। 

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षांनिमित्त राबविण्यात येत असलेल्या 'हर घर तिरंगा' अभियानांतर्गत प्रत्येक नागरिकाने आपल्या घरावर तिरंगा ध्वज फडकावयाचा आहे. भाजपच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी स्वतःसह नागरिकांनाही या अभियानात सहभागी करून घ्यावं असं आवाहन भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी केलं आहे.


   'हर घर तिरंगा' अभियान हा कुठल्याही राजकीय पक्षाचा विषय नाही तर आपल्या अस्मितेचा, राष्ट्रप्रेमाचा आणि देश भक्तीचा विषय आहे. आपल्या देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाले असून आज आपण सर्व स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहोत. येत्या १३, १४ व १५ ऑगस्ट रोजी प्रत्येकाने आपल्या घरावर आपल्या अस्मितेचं प्रतिक असलेला तिरंगा ध्वज फडकावून राष्ट्राभिमान बाळगावा. १५ ऑगस्ट रोजी आपण स्वतः या अभियानात सहभागी होऊन काही घरांना भेटी देणार आहे असं पंकजाताई मुंडे यांनी सांगितलं आहे. भाजपचे सर्व पदाधिकारी, बुथ प्रमुख व कार्यकर्त्यांनी आपापल्या घरावर तर तिरंगा फडकवावाच पण प्रभागातील प्रत्येक नागरिकाला यात सहभाग घ्यायला सांगून अभियान यशस्वी करावं असे आवाहन पंकजाताईंनी केलं आहे. 

••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या