दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न

इमेज
  चैत्यभूमी दादर येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न बीड ,प्रतिनिधी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, चैत्यभूमी दादर (पश्चिम), मुंबई येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, हे शिबिर दि. १२ मे ते २१ मे २०२६ या कालावधीत संपन्न होणार आहे. बौद्ध धम्माचा सखोल अभ्यास करण्याची इच्छा असलेल्या विविध समाजातील धर्मांतरित बौद्ध बांधवांसाठी हे विशेष शिबिर आयोजित करण्यात आले आहे. सत्यशोधक ओबीसी परिषद, सत्यशोधक समाज महासंघ, चर्मकार संघ, अखिल भारतीय धम्म महासंघ, प्रजासत्ताक जनता परिषद तसेच इतर विविध माध्यमांतून धर्मांतरित झालेल्या ओबीसी, पूर्वाश्रमीचे मातंग, वाल्मिकी, चर्मकार, ढोर समाजातील बौद्ध बांधवांना या शिबिरात सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय डॉ. भीमराव य. आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच संस्थेचे ट्रस्टी व राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा मुंबई केंद्रीय कार्यालय प्रमुख आद. अॅड. डॉ. एस. के. भंडारे यांच्या सल्ल्याने या शिबिराचे आय...

MB NEWS-अण्णाभाऊंचं लिखाण सामाजिक सलोखा निर्माण करणारं आहे - लक्ष्मण वैराळ

अण्णाभाऊंचं लिखाण सामाजिक सलोखा निर्माण करणारं आहे - लक्ष्मण वैराळ



परळी (प्रतिनिधी) लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याचा समाजामध्ये जास्तीत जास्त प्रचार प्रसार झाला, तर समाजात भाईचाऱ्याची भावना निर्माण होईल असे प्रतिपादन परळी ग्रामीण पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक मारुती मुंडे यांनी केले. यावेळी प्रमूख पाहुणे म्हणून अण्णाभाऊंच्या साहित्याचे अभ्यासक लक्ष्मण वैराळ हे होते. यावेळी वैराळ यांनी अण्णाभाऊंच्या कार्यावर प्रकाश टाकला ते म्हणाले ,अण्णाभाऊंनी आपल्या साहित्यातून समाजिक एकोपा निर्माण व्हावा आणि समाजातील जातीय, वर्गीय विषमता नष्ट व्हावी आणि यासाठी अट्टहास धरला त्यांचे विचार आजही प्रासंगिक आहेत.

यावेळही उपस्थितांनी अण्णाभाऊंच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.कार्यक्रमासाठी सपोनी शिवाजी पोळ,पोलीस नवनाथ हरेगावकर, प्रकाश वाघमारे, लक्ष्मण टोले, व्यंकट डोरनाळे, सुनिल अन्नमवार, भाग्यश्री डाके,पत्रकार भगवान साकसमुद्रे, विक्रम मिसाळ, बबन कसबे, अभिमान मस्के, कैलास डूमने, पद्माकर उखलीकर व ठाण्यातील सर्व कर्मचारी उपस्थित होते .

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भगवान साकसमुद्रे यांनी केले

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....