इमेज
 चि. यशोधन आणि कु. किरण विवाहबंधनात: मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापुरात संपन्न झाला शाही विवाह सोहळा कोल्हापूर प्रतिनिधी: परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार आणि सौ. मनिषा अवचार यांचे सुपुत्र चि. यशोधन तसेच स्मृतीशेष रवींद्र मगदूम यांची कनिष्ठ सुपुत्री कु. किरण यांचा शुभविवाह नुकताच कोल्हापूर येथील एल. डी. लोन, चिंचवड रोड येथे अतिशय थाटामाटात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला सामाजिक, राजकीय,औष्णिक वीज निर्मिती,औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले. विशेषतः, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून अवचार आणि मगदूम कुटुंबाच्या आनंदात सहभाग नोंदवला. याप्रसंगी या प्रसंगी उपमुख्य अभियंता, भास्कर इंगळे कोराडी नागपूर, नितीन रडे. मुबंई, जगदीश मोरे, नासिक तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन आरोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय उदार, थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष अंगदभा...

MB NEWS-अण्णाभाऊंची लेखणी जगात देखणी, उपाशी पोटातून शब्दांच्या ठिणग्या पडतात- अजय मुंडे

 अण्णाभाऊंची लेखणी जगात देखणी, उपाशी पोटातून शब्दांच्या ठिणग्या पडतात- अजय मुंडे



*साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त अजय मुंडे यांचे प्रतिपादन, ठिकठिकाणी आयोजित कार्यक्रमात केले अभिवादन*



परळी (दि. 1) - ज्यांचं पोट भरलेलं असतं, त्यांना वेदनांची जाणीव नसते, त्यांच्या लेखनात विनोद दिसू शकतो, मात्र ज्यांचं पोट उपाशी असतं, त्यांच्या पोटातून क्रांतीच्या ठिणग्या पडतात, अशा केवळ विचार व साहित्यातून सामाजिक ठिणग्या पाडून सामाजिक क्रांती करणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे होय, असे प्रतिपादन युवा नेते अजय मुंडे यांनी केले आहे.


दि. 1 ऑगस्ट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त परळी तालुक्यातील विविध ठिकाणी आयोजित अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमात अजय मुंडे यांनी अभिवादन करत अण्णाभाऊ साठे यांच्या अनुयांयाना शुभेच्छा दिल्या. 


लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान मिळावा, मुंबईतील चिराग नगर यासह पुणे व अन्य प्रस्तावित ठिकाणी अण्णाभाऊ साठे यांचे भव्य स्मारक साकारले जावे, यासाठी सामाजिक न्याय खात्याचे मंत्री असताना धनंजय मुंडे साहेबानी प्रयत्न केले, मात्र केंद्र सरकारच्या आडमुठ्या धोरणाने त्यांच्या या भूमिकेस फारसे यश येऊ शकले नाही. आम्ही धनंजय मुंडे साहेबांचे सहकारी म्हणून आगामी काळात ही भूमिका रस्त्यावर येऊन मांडणार आहोत, अशी भूमिका अजय मुंडे यांनी मांडली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या