दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न

इमेज
  चैत्यभूमी दादर येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न बीड ,प्रतिनिधी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, चैत्यभूमी दादर (पश्चिम), मुंबई येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, हे शिबिर दि. १२ मे ते २१ मे २०२६ या कालावधीत संपन्न होणार आहे. बौद्ध धम्माचा सखोल अभ्यास करण्याची इच्छा असलेल्या विविध समाजातील धर्मांतरित बौद्ध बांधवांसाठी हे विशेष शिबिर आयोजित करण्यात आले आहे. सत्यशोधक ओबीसी परिषद, सत्यशोधक समाज महासंघ, चर्मकार संघ, अखिल भारतीय धम्म महासंघ, प्रजासत्ताक जनता परिषद तसेच इतर विविध माध्यमांतून धर्मांतरित झालेल्या ओबीसी, पूर्वाश्रमीचे मातंग, वाल्मिकी, चर्मकार, ढोर समाजातील बौद्ध बांधवांना या शिबिरात सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय डॉ. भीमराव य. आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच संस्थेचे ट्रस्टी व राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा मुंबई केंद्रीय कार्यालय प्रमुख आद. अॅड. डॉ. एस. के. भंडारे यांच्या सल्ल्याने या शिबिराचे आय...

MB NEWS-अण्णाभाऊंची लेखणी जगात देखणी, उपाशी पोटातून शब्दांच्या ठिणग्या पडतात- अजय मुंडे

 अण्णाभाऊंची लेखणी जगात देखणी, उपाशी पोटातून शब्दांच्या ठिणग्या पडतात- अजय मुंडे



*साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त अजय मुंडे यांचे प्रतिपादन, ठिकठिकाणी आयोजित कार्यक्रमात केले अभिवादन*



परळी (दि. 1) - ज्यांचं पोट भरलेलं असतं, त्यांना वेदनांची जाणीव नसते, त्यांच्या लेखनात विनोद दिसू शकतो, मात्र ज्यांचं पोट उपाशी असतं, त्यांच्या पोटातून क्रांतीच्या ठिणग्या पडतात, अशा केवळ विचार व साहित्यातून सामाजिक ठिणग्या पाडून सामाजिक क्रांती करणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे होय, असे प्रतिपादन युवा नेते अजय मुंडे यांनी केले आहे.


दि. 1 ऑगस्ट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त परळी तालुक्यातील विविध ठिकाणी आयोजित अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमात अजय मुंडे यांनी अभिवादन करत अण्णाभाऊ साठे यांच्या अनुयांयाना शुभेच्छा दिल्या. 


लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान मिळावा, मुंबईतील चिराग नगर यासह पुणे व अन्य प्रस्तावित ठिकाणी अण्णाभाऊ साठे यांचे भव्य स्मारक साकारले जावे, यासाठी सामाजिक न्याय खात्याचे मंत्री असताना धनंजय मुंडे साहेबानी प्रयत्न केले, मात्र केंद्र सरकारच्या आडमुठ्या धोरणाने त्यांच्या या भूमिकेस फारसे यश येऊ शकले नाही. आम्ही धनंजय मुंडे साहेबांचे सहकारी म्हणून आगामी काळात ही भूमिका रस्त्यावर येऊन मांडणार आहोत, अशी भूमिका अजय मुंडे यांनी मांडली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....