इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

मिरवट ग्रामस्थांचा आदर्श:जिल्हा परिषद शाळेसाठी जमा केले साडेतीन लाख रुपये!

मिरवट ग्रामस्थांचा आदर्श: जिल्हा परिषद शाळेसाठी जमा केले साडेतीन लाख रुपये!

परळी वैजनाथ, प्रतिनिधी...

       जिल्हा परिषदेची शाळा ही खऱ्या अर्थाने गावची शाळा असते आणि या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा विकास म्हणजे गावच्या भविष्यातील पिढ्यांचा विकास असे आम्हाला वाटते म्हणून आम्ही शाळेसाठी आमच्या सर्वांच्या खिशातून रुपये 3 लाख 50 हजार रुपये मुख्याध्यापकांकडे सुपूर्द करत आहोत असे म्हणत मिरवट तालुका परळी वैजनाथ येथील गावकऱ्यांनी शाळेप्रती आपली आपुलकी व्यक्त केली.

क्लिक करा व पहा: धनंजय मुंडेंचा शायराना अंदाज

जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये काही भौतिक सुविधा आणि शैक्षणिक सुविधा यांच्यासाठी आम्हाला तुमच्या मदतीची गरज आहे असे मुख्याध्यापक श्री हाडबे  टी. एन. आणि शिक्षकांनी गावकऱ्यांकडे व्यक्त केल्यानंतर गावकऱ्यांनी पुढाकार घेऊन शाळेसाठी निधी जमा केला. आपल्या गावचे सर्व शिक्षक अतिशय तळमळीने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी काम करत असून त्यांना काही भौतिक सुविधा कमी पडत आहेत असे लक्षात आल्यानंतर मिरवट येथील गावकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात शाळेच्या विकासासाठी निधी जमा केला. 

Click&watch:● पंकजा मुंडे-भाजप आणि महादेव जानकरांचं सूचक विधान.

या जमा केलेल्या शैक्षणिक निधीतून सध्या शाळेच्या प्रांगणात पेविंग ब्लॉक्स बसवण्यात आले असून त्यामुळे शाळेचे प्रांगण अतिशय सुंदर दिसत आहे. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये या ठिकाणी आता विद्यार्थ्यांच्या प्रार्थनेला येणारा अडथळा दूर झालेला आहे. समाज सहभागातूनच यापूर्वी सोलार सिस्टिमही बसवण्यात आलेली आहे. सध्या काही वर्गांच्या दुरुस्तीसाठी आणि इतर शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी गावकऱ्यांनी ही रक्कम मुख्याध्यापक श्री हाडबे टी. एन. यांच्याकडे जमा केली आहे.  

क्लिक करा व पहा:🔴 *प्रसिद्ध अभिनेत्री सूत्रसंचालिका स्पृहा जोशी म्हणतेय "आता तर मला परळीला यायलाच..."

शाळेची विद्यार्थी संख्या सध्या 188 असून आठ शिक्षक कार्यरत आहेत. साऊंड सिस्टिम च्या मदतीने घेतला जाणारा उत्तम परिपाठ, आधुनिक असलेले टॅब, संगणक तसेच शासनाने पुरवलेल्या शैक्षणिक साहित्याच्या मदतीने केले जाणारे दर्जेदार अध्यापन, स्पर्धा परीक्षांची तयारी, दर आठवड्याला वेगळे उपक्रम, वेगळ्या स्पर्धा आणि त्यांची बक्षिसे, शैक्षणिक तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये तालुक्यात आयोजित केल्या जाणाऱ्या स्पर्धांमध्ये सहभाग, विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक विकासाकडे लक्ष या सगळ्या उपक्रमामुळे जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा मिरवट नावारूपास आली आहे. 

Click&watch:➡️ *अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने सांगितलं परळी सोबतचं नातं.*

ग्रामपंचायत सुद्धा आघाडीवर...

     मिरवट या ठिकाणी असलेल्या ग्रामपंचायतीनेही आपल्या कामाने वेगळा ठसा उमटवला असून संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानामध्ये तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे. 

शाळेची सुंदर इमारत आणि स्वच्छता याचे गुणही या स्पर्धेमध्ये गृहीत धरण्यात आले होते. शाळेमध्ये प्रवेश करत असताना आम्ही राजकारण बाहेर सोडतो त्याचबरोबर ग्रामपंचायत निवडणुकीमध्येही निवडणुकीपुरतेच राजकारण असते एरवी आम्ही मित्रत्वाच्या नात्याने एकमेकांशी राहतो असे गावकऱ्यांनी बोलताना सांगितले. 

क्लिक करा व पहा:*वैद्यनाथ विद्यालयाचा पंकज नाईकवाडे एन.एम. एम.एस. शिष्यवृत्तीसाठी पात्र*

गावकऱ्यांनी शाळेप्रती दाखवलेला विश्वास भविष्यात आम्ही सार्थ करून दाखवू असे मुख्याध्यापक श्री हाडबे टी. एन. आणि शिक्षक वृंदांनी बोलून दाखवले आणि गावकऱ्यांचे आभार व्यक्त केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!