इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

MB NEWS- त्या 800 कंत्राटी चालकांना एसटी महामंडळाने शासकीय सेवेत सामील करून घ्यावे - धनंजय मुंडेंची मागणी

 त्या 800 कंत्राटी चालकांना एसटी महामंडळाने शासकीय सेवेत सामील करून घ्यावे - धनंजय मुंडेंची मागणी



*एसटी संप काळात सेवा दिलेल्या 800 कंत्राटी चालकांची सेवा बंद करण्याच्या निर्णयावरून धनंजय मुंडे यांनी केली मागणी*


*कठीण काळात सेवा दिलेल्यांना आता वाऱ्यावर सोडणे योग्य नाही - धनंजय मुंडे यांची मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना विनंती*


परळी (दि. 05) - एसटी कर्मचाऱ्यांच्या संप काळात राज्य परिवहन महामंडळाने बससेवा सुरू रहावी यासाठी बाह्य सांथेमार्फत 800 कंत्राटी चालक नेमले होते,मात्र आता त्या सर्वांना आता काढून टाकण्यात येत असून, या सर्व कंत्राटी चालकांना राज्य शासनाने सेवेत सामावून घ्यावे, अशी मागणी माजी मंत्री आ. धनंजय मुंडे यांनी ट्विट द्वारे केली आहे. 


एसटी कर्मचाऱ्यांच्या संप काळात 800 खाजगी चालकांना एसटी महामंडळाने बाह्य संस्थेमार्फत कंत्राटी नेमणूक करून राज्यातील विविध जिल्ह्यात एसटी चालू ठेवण्याचा प्रयत्न केला होता. त्या सर्व 800 लोकांनी आजतागायत दिवस रात्र सेवा दिली. मात्र त्या सर्वांची सेवा आता बंद करा, अशा स्वरूपाचे आदेश एसटी महामंडळाने आज पारित केले आहेत. 


ज्या लोकांनी एसटी बंद होऊ नये म्हणून दिवसरात्र काम केले आता त्यांना वाऱ्यावर सोडणं योग्य नाही. अचानक रोजगार गेल्याने त्यांच्या व त्यांच्या कुटुंबांवर आता उपासमारीची वेळ येऊ शकते. या अन्यायाबाबत काही कंत्राटी चालकांनी धनंजय मुंडे यांच्या कार्यालयाकडे निवेदन देखील दिले आहे.


कठीण काळात सेवा दिलेल्या कर्मचाऱ्यांना आता वाऱ्यावर सोडून देणे योग्य नसून त्या सर्व कर्मचाऱ्यांना राज्य शासनाने नियमित सेवेत सामावून घ्यावे, अशी विनंती धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडे एका ट्विट द्वारे केली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!