इमेज
 चि. यशोधन आणि कु. किरण विवाहबंधनात: मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापुरात संपन्न झाला शाही विवाह सोहळा कोल्हापूर प्रतिनिधी: परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार आणि सौ. मनिषा अवचार यांचे सुपुत्र चि. यशोधन तसेच स्मृतीशेष रवींद्र मगदूम यांची कनिष्ठ सुपुत्री कु. किरण यांचा शुभविवाह नुकताच कोल्हापूर येथील एल. डी. लोन, चिंचवड रोड येथे अतिशय थाटामाटात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला सामाजिक, राजकीय,औष्णिक वीज निर्मिती,औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले. विशेषतः, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून अवचार आणि मगदूम कुटुंबाच्या आनंदात सहभाग नोंदवला. याप्रसंगी या प्रसंगी उपमुख्य अभियंता, भास्कर इंगळे कोराडी नागपूर, नितीन रडे. मुबंई, जगदीश मोरे, नासिक तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन आरोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय उदार, थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष अंगदभा...

MB NEWS-कॉ.गंगाधरअप्पा बुरांडे स्मृती निमित्त शनिवारी प्रा. इंद्रजित भालेराव यांचे व्याख्यान

कॉ.गंगाधरअप्पा बुरांडे स्मृती निमित्त शनिवारी प्रा. इंद्रजित भालेराव यांचे व्याख्यान



परळी / प्रतिनिधी
झुंजार स्वातंत्र्य सेनानी,बीड जिल्ह्याचे माजी खासदार,डाव्या चळवळीचे शिलेदार, महाराष्ट्र शिक्षण संस्था मोहा संस्थापक कॉ. गंगाधरअप्पा बुरांडे यांच्या 14 व्या स्मृतीदिनानिमित्त शनिवारी (दि.१) रोजी परळी तालुक्यातील मोहा येथे ग्रामीण साहित्यीक व शेतकरी कवी प्रा. इंद्रजीत भालेराव यांचे ग्रामीण भागातील शिक्षणाची सद्यःस्थिती व समाजाची भुमीका या विषयावर व्याख्यान होणार आहे. 

बीड जिल्हयाचे माजी खा.कॉ गंगाधर बुरांडे यांच्या स्मृती निमित्त मागील १४ वर्षा पासुन शेती, पर्यावरण, पाणी, माती, शैक्षणीक, शेतकऱ्यांच्या संबंधी सरकारचे धोरण यासह वंचित, पिडीत व रोजगाराच्या प्रश्नाचा उहापोह करण्यासाठी मोहा येथे व्याख्यानमाला आयोजीत करण्यात येत आहे. कॉ गंगाधरअप्पा बुरांडे स्मृती प्रतिष्ठाण अंबाजोगाई व महाराष्ट्र शिक्षण संस्था मोहा च्या वतीने व्याख्यानमालेचे १४ वे पुष्प वाहण्यात येणार आहे.यापूर्वी या व्याख्यानमालेस आपल्या कर्तृत्वाने राज्य नव्हे तर देशभरात ओळख निर्माण करणारे व्यक्तिमत्त्व या व्यासपीठावर उपस्थित राहिले आहेत.या वेळी या व्याख्यानमालेचे 14 वे  पुष्प गुभण्यासाठी ग्रामीण साहित्यीक व शेतकरी कवी प्रा. इंद्रजित भालेराव यांचे ग्रामीण भागातील शिक्षणाची सद्यःस्थिती व समाजाची भुमीका या विषयावर व्याख्यान होणार आहे.या  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे माजी विद्यार्थी, सिटु चे राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा कॉ. गंगाधरअप्पा बुरांडे स्मृती प्रतिष्ठाणचे अध्यक्ष कॉ.डॉ.डी.एल.कराड असणार आहेत. शनिवार (दि.१) सकाळी ११:०० वाजता परळी तालुक्यातील मोहा येथील महाराष्ट्र माध्य व उच्च माध्य विद्यालयात या व्याख्यानाचा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमास शेतकरी, शेतमजुर व नागरीकांनी मोठया संख्येनी सहभागी व्हावे असे आवाहन कॉ. गंगाधरअप्पा बुरांडे स्मृती प्रतिष्ठाण अंबाजोगाई व महाराष्ट्र शिक्षण संस्था मोहा च्या वतीने करण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट