परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी  या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे  दर्शन घेतलं.  जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...

MB NEWS-शेतकऱ्यांच्या जनआक्रोश धरणे आंदोलनात शासनावर अजय मुंडेंचा हल्लाबोल

 शेतकऱ्यांच्या जनआक्रोश धरणे आंदोलनात शासनावर अजय मुंडेंचा हल्लाबोल



_......तर येणाऱ्या काळात आ. धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शेतकऱ्यांसह जेलभरो करू!_


बीड, प्रतिनिधी ता. 16...... बीड जिल्ह्यातील हजारो शेतकरी आज सर्वपक्षीय जनआक्रोश धरणे आंदोलनात सहभागी झाले होते.  बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या अग्रीम पीकविमा, अनुदान, जनावरांच्या लम्पी आजारावर मुबलक लशींची उपलब्धी व्हावी आदी मागण्यांसाठी बीड येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज धरणे आंदोलन करण्यात आले. बीड जिल्ह्यातील हजारो शेतकरी बांधव या जनआक्रोश आंदोलनात सहभागी झाले होते. या सर्वपक्षीय शेतकऱ्यांच्या जनआक्रोश आंदोलनात युवक नेते श्री. अजय मुंडे यांनी आपली भूमिका मांडली.


त्यांनी आपल्या भाषणात शेतकऱ्यांच्या व्यथा मांडताना बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांचा पाढा वाचत प्रशासनावर जोरदार हल्ला चढवला, मागील वर्षी आ. धनंजय मुंडे जिल्ह्याचे पालकमंत्री असताना ज्याप्रमाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 25% अग्रीम विमा मदत देण्यात आली, त्याप्रमाणे याही वर्षी विमा लागू असलेल्या सर्व पिकांना अग्रीम मदत द्यायला हवी होती पण ती देण्यात आली नाही. शेतकऱ्यांवार अस्मानी संकट कौसळलेलं असताना राज्यातील सुलतानी राजवटीची वागणूक बेजवाबदारपणाची असल्याचे श्री. मुंडे म्हणाले.


शेतकऱ्यांच्या या जनआक्रोश आंदोलनाची दखल राज्यसरकारला घ्यावी लागेल अन्यथा येणाऱ्या काळात आ. धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शेतकऱ्यांसह जेलभरो आंदोलन करून आ.मुंडेच शेतकऱ्यांना मदत देण्यास राज्य सरकारला भाग पाडतील, असा विश्वासही यावेळी श्री. अजय मुंडे यांनी बोलून दाखवला.


यावेळी बीडचे जिल्हाधिकारी यांना शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांचे निवेदन बीड जिल्ह्यातील सर्व आमदार लोकप्रतिनिधी, शेतकरी बांधव, शेतकरी एकजूट संघर्ष समिती व सर्व शेतकरी संघटना यांच्या उपस्थितीत देण्यात आले. या जनआक्रोश धरणे आंदोलनात मोठ्या प्रमाणावर शेतकरी बांधव सहभागी  झाले होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!