युवकांचा स्तुत्य उपक्रम....

इमेज
  महेश नवमीनिमित्त माहेश्वरी मित्र परिवारातर्फे गुरुकुलातील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप परळी वैजनाथ: प्रतिनिधी.... दरवर्षीप्रमाणे या वर्षीही महेश नवमीचा उत्सव अत्यंत उत्साहात आणि श्रद्धेने साजरा करण्यात आला. या महोत्सवाचे औचित्य साधून श्री स्वामी श्रद्धानंद गुरुकुल येथील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप करण्यात आले. युवकांच्या या कौतुकास्पद कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. हा सेवा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सिद्धांत मंत्री, केदार सारडा, हर्ष भंडारी, रुपेश बंग, अथर्व कलंत्री, अनिकेत सारडा, श्याम बजाज, यश डीडवाणी, श्रीनिवास जाजू, युवराज जाजू, गोकुल भंसाली, गणेश सोनी, तेजस इनदानी, जय तोष्णीवाल, यश लोढा तसेच समस्त माहेश्वरी मित्र परिवाराचे विशेष सहकार्य लाभले. माहेश्वरी मित्र परिवारातर्फे सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहे. समाजसेवा आणि सुसंस्कारांचे हे कार्य आपण सर्वांच्या साथीने असेच पुढे सुरू ठेवूया, असा संकल्प यावेळी करण्यात आला.

MB NEWS-शेतकऱ्यांच्या जनआक्रोश धरणे आंदोलनात शासनावर अजय मुंडेंचा हल्लाबोल

 शेतकऱ्यांच्या जनआक्रोश धरणे आंदोलनात शासनावर अजय मुंडेंचा हल्लाबोल



_......तर येणाऱ्या काळात आ. धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शेतकऱ्यांसह जेलभरो करू!_


बीड, प्रतिनिधी ता. 16...... बीड जिल्ह्यातील हजारो शेतकरी आज सर्वपक्षीय जनआक्रोश धरणे आंदोलनात सहभागी झाले होते.  बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या अग्रीम पीकविमा, अनुदान, जनावरांच्या लम्पी आजारावर मुबलक लशींची उपलब्धी व्हावी आदी मागण्यांसाठी बीड येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज धरणे आंदोलन करण्यात आले. बीड जिल्ह्यातील हजारो शेतकरी बांधव या जनआक्रोश आंदोलनात सहभागी झाले होते. या सर्वपक्षीय शेतकऱ्यांच्या जनआक्रोश आंदोलनात युवक नेते श्री. अजय मुंडे यांनी आपली भूमिका मांडली.


त्यांनी आपल्या भाषणात शेतकऱ्यांच्या व्यथा मांडताना बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांचा पाढा वाचत प्रशासनावर जोरदार हल्ला चढवला, मागील वर्षी आ. धनंजय मुंडे जिल्ह्याचे पालकमंत्री असताना ज्याप्रमाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 25% अग्रीम विमा मदत देण्यात आली, त्याप्रमाणे याही वर्षी विमा लागू असलेल्या सर्व पिकांना अग्रीम मदत द्यायला हवी होती पण ती देण्यात आली नाही. शेतकऱ्यांवार अस्मानी संकट कौसळलेलं असताना राज्यातील सुलतानी राजवटीची वागणूक बेजवाबदारपणाची असल्याचे श्री. मुंडे म्हणाले.


शेतकऱ्यांच्या या जनआक्रोश आंदोलनाची दखल राज्यसरकारला घ्यावी लागेल अन्यथा येणाऱ्या काळात आ. धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शेतकऱ्यांसह जेलभरो आंदोलन करून आ.मुंडेच शेतकऱ्यांना मदत देण्यास राज्य सरकारला भाग पाडतील, असा विश्वासही यावेळी श्री. अजय मुंडे यांनी बोलून दाखवला.


यावेळी बीडचे जिल्हाधिकारी यांना शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांचे निवेदन बीड जिल्ह्यातील सर्व आमदार लोकप्रतिनिधी, शेतकरी बांधव, शेतकरी एकजूट संघर्ष समिती व सर्व शेतकरी संघटना यांच्या उपस्थितीत देण्यात आले. या जनआक्रोश धरणे आंदोलनात मोठ्या प्रमाणावर शेतकरी बांधव सहभागी  झाले होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या