इमेज
 चि. यशोधन आणि कु. किरण विवाहबंधनात: मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापुरात संपन्न झाला शाही विवाह सोहळा कोल्हापूर प्रतिनिधी: परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार आणि सौ. मनिषा अवचार यांचे सुपुत्र चि. यशोधन तसेच स्मृतीशेष रवींद्र मगदूम यांची कनिष्ठ सुपुत्री कु. किरण यांचा शुभविवाह नुकताच कोल्हापूर येथील एल. डी. लोन, चिंचवड रोड येथे अतिशय थाटामाटात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला सामाजिक, राजकीय,औष्णिक वीज निर्मिती,औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले. विशेषतः, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून अवचार आणि मगदूम कुटुंबाच्या आनंदात सहभाग नोंदवला. याप्रसंगी या प्रसंगी उपमुख्य अभियंता, भास्कर इंगळे कोराडी नागपूर, नितीन रडे. मुबंई, जगदीश मोरे, नासिक तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन आरोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय उदार, थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष अंगदभा...

MB NEWS-जाणुन घ्या- पीएफआय संघटना : का घातली बंदी?

 जाणुन घ्या-  पीएफआय संघटना : का घातली बंदी?


             पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाविरुद्ध  (पीएफआय) राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एनआयएने पुन्हा धडक कारवाई केली.  एकाच दिवशी संघटनेशी संबंधित १५० हून अधिक लोकांना ताब्यात घेतले तर काहींना अटक करण्यात आली. आता केंद्र सरकारने यावर मोठी कारवाई करत बेकायदेशीर संघटना ठरवत  बंदी घालण्याचा निर्णय घेतला.
       पाच कारणांसाठी या संघटनेवर केंद्राने बंदी घातली आहे. पीएफआयवर दहशतवादी संघटनांशी संबंध असल्याचा गंभीर आरोपहीआहे. पीएफआयविरोधात भक्कम पुरावे मिळाल्यानंतरच या संस्थेवर ५ वर्षांसाठी बंदी घालण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. पीएफआयसह अन्य संघटनाविरोधात गेल्या काही दिवसापासून देशात छापेमारी सुरू आहे.एनआयए, ईडी यासह राज्य पोलीस पथकेही पीएफआयच्या ठिकांणांवर छापेमारी करत आहेत.


     या संघटनांच्या विरोधात पुरावे मिळाल्यानंतरच केंद्रीय गृहमंत्रालयाने ५ वर्षांसाठी बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात केद्रांने अधिसूचनाही जारी केली आहे. पाटणा येथील फुलवारी शरीफ टेरर मॉड्युलमध्ये पीएफआयचे नाव आले आहे. तसेच एका प्राध्यापकाचा हात कापल्याचा आरोपही आहे.

'पीएफआय'वर बंदी का घातली?

पीएफआयवर देशाविरोधात कारवाई केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच पीएफआयचे आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेट ऑफ सीरिया आणि इराकशी कनेक्शन असल्याचाही आरोप करण्यात आला आहे. देशात वेगवेगळ्या विचार असलेल्या व्यक्ती आणि संस्थाविरोधात हिंसात्मक वृत्ती ठेवणे, अतिरेक्यांसाठी फंड गोळा करणे, देशाच्या घटनात्मक अधिकारांना आव्हान देणे आणि राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण करणे, असे आरोप पीएफआय विरोधात करण्यात आले आहेत. त्यामुळे या संघटनेवर ५ वर्षासाठी बंदी घालण्यात आल्याचे केंद्राने म्हटले आहे.  

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या