मोठ्या संख्येने उपस्थित रहा....

इमेज
द्रोणाचार्य सेमी इंग्लिश स्कूल व पूजा प्राथमिक विद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे आज आयोजन परळी वैजनाथ | प्रतिनिधी द्रोणाचार्य सेमी इंग्लिश स्कूल व पूजा प्राथमिक विद्यालय, परळी वैजनाथ यांच्या वतीने २० वे वार्षिक स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले आहे. हे स्नेहसंमेलन आज  बुधवार, दि. ५ फेब्रुवारी २०२५ रोजी दुपारी ३.३० वाजता लोकनेते गोपीनाथराव मुंडे  नटराज रंग मंदिर, परळी वैजनाथ येथे संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रामलिंग राजनळे सर (माजी मुख्याध्यापक, वैद्यनाथ विद्यालय) राहणार असून उद्घाटन  गणेश गिरी (गटशिक्षणाधिकारी, गटसाधन केंद्र, परळी वै.) यांच्या हस्ते होणार आहे. या काकार्यक्रमास बाजीराव  भैय्या   धर्माधिकारी (माजी नगराध्यक्ष),  कोकणे  (विस्ताराधिकारी),  धनंजय ढोणे  (पोलीस निरीक्षक),  दिवाकर जोशी (गझलकार), प्रा. रविंद्र जोशी सर (पत्रकार,  दैनिक पुढारी),  व्यंकटेश शिंदे (नगरसेवक) हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.           स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांचे नृत...

MB NEWS-साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना भाररत्न पुरस्कार द्या

 साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना भाररत्न पुरस्कार द्या

सकल मातंग समाजाचा परळीत भव्य विराट मोर्चा


परळी (प्रतिनिधी)

सकल मातंग समाजाच्या वतीने परळी तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला. अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा त्याचबरोबर परळी शहरातील बस स्टँड समोरील अण्णाभाऊ साठे चौकामध्ये अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा तात्काळ बसवावा या मागणीसाठी हा विराट मोर्चा काढण्यात आला. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मोर्चाला सुरुवात करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवरायांना अभिवादन करण्यात आले. संत भगवान बाबा चौक मार्गे हा मोर्चा तहसील कडे जाऊन धडकला. मातंग समाजाच्या वतीने करण्यात आलेल्या मागण्या शासनाने तात्काळ मार्गी न लावल्यास यापुढे तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा या मोर्चाच्या माध्यमातून देण्यात आला.


लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार देण्यासाठी राज्य शासनाने प्रस्ताव पारित करून केंद्र सरकारला शिफारस करावी. केंद्र सरकारने एकमताने हा प्रस्ताव मंजूर करून अण्णाभाऊंना भारतरत्न पुरस्कार घोषित करावा. परळीच्या बस स्टँड समोरील अण्णाभाऊ साठे चौकात पुतळा बसवावा अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून करण्यात येत आहे. शासनाने या मागणीला गांभीर्याने घेऊन हा प्रश्न मार्गी लावावा. अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाला भरघोस निधी उपलब्ध करून द्यावा अशा मागण्या करण्यात आल्या.


सकल मातंग समाजाच्या वतीने काढण्यात आलेला मोर्चा तहसील कार्यालयाच्या प्रांगणात आल्यानंतर उपस्थित जनसमुदायाला अनेक मान्यवरांनी मार्गदर्शन केले. मातंग समाजाचे ज्येष्ठ नेते विक्रम मिसाळ, बबन कसबे, डॉ.माणिक कांबळे, कमलाकर मिसाळ, उत्तमराव मने, संपत वाघमोडे, कमलाकर मिसाळ, अभिमान मस्के, जितेंद्र मस्के, मिलिंद घाडगे, गोपाळ वैराळ, कल्पना कांबळे, यशोदा कसबे आदींसह अनेक मान्यवरांनी उपस्थित जनसमुदायाला मार्गदर्शन केले. मोठ्या संख्येने महिला व पुरुष या विराट मोर्चात सहभागी झाले होते. परळीच्या रस्त्यावरून निघालेल्या मोर्चाने आणि त्यात दिलेल्या घोषणांनी परिसर दणाणून निघाला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....