दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न

इमेज
  चैत्यभूमी दादर येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न बीड ,प्रतिनिधी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, चैत्यभूमी दादर (पश्चिम), मुंबई येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, हे शिबिर दि. १२ मे ते २१ मे २०२६ या कालावधीत संपन्न होणार आहे. बौद्ध धम्माचा सखोल अभ्यास करण्याची इच्छा असलेल्या विविध समाजातील धर्मांतरित बौद्ध बांधवांसाठी हे विशेष शिबिर आयोजित करण्यात आले आहे. सत्यशोधक ओबीसी परिषद, सत्यशोधक समाज महासंघ, चर्मकार संघ, अखिल भारतीय धम्म महासंघ, प्रजासत्ताक जनता परिषद तसेच इतर विविध माध्यमांतून धर्मांतरित झालेल्या ओबीसी, पूर्वाश्रमीचे मातंग, वाल्मिकी, चर्मकार, ढोर समाजातील बौद्ध बांधवांना या शिबिरात सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय डॉ. भीमराव य. आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच संस्थेचे ट्रस्टी व राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा मुंबई केंद्रीय कार्यालय प्रमुख आद. अॅड. डॉ. एस. के. भंडारे यांच्या सल्ल्याने या शिबिराचे आय...

MB NEWS-साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना भाररत्न पुरस्कार द्या

 साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना भाररत्न पुरस्कार द्या

सकल मातंग समाजाचा परळीत भव्य विराट मोर्चा


परळी (प्रतिनिधी)

सकल मातंग समाजाच्या वतीने परळी तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला. अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा त्याचबरोबर परळी शहरातील बस स्टँड समोरील अण्णाभाऊ साठे चौकामध्ये अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा तात्काळ बसवावा या मागणीसाठी हा विराट मोर्चा काढण्यात आला. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मोर्चाला सुरुवात करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवरायांना अभिवादन करण्यात आले. संत भगवान बाबा चौक मार्गे हा मोर्चा तहसील कडे जाऊन धडकला. मातंग समाजाच्या वतीने करण्यात आलेल्या मागण्या शासनाने तात्काळ मार्गी न लावल्यास यापुढे तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा या मोर्चाच्या माध्यमातून देण्यात आला.


लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार देण्यासाठी राज्य शासनाने प्रस्ताव पारित करून केंद्र सरकारला शिफारस करावी. केंद्र सरकारने एकमताने हा प्रस्ताव मंजूर करून अण्णाभाऊंना भारतरत्न पुरस्कार घोषित करावा. परळीच्या बस स्टँड समोरील अण्णाभाऊ साठे चौकात पुतळा बसवावा अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून करण्यात येत आहे. शासनाने या मागणीला गांभीर्याने घेऊन हा प्रश्न मार्गी लावावा. अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाला भरघोस निधी उपलब्ध करून द्यावा अशा मागण्या करण्यात आल्या.


सकल मातंग समाजाच्या वतीने काढण्यात आलेला मोर्चा तहसील कार्यालयाच्या प्रांगणात आल्यानंतर उपस्थित जनसमुदायाला अनेक मान्यवरांनी मार्गदर्शन केले. मातंग समाजाचे ज्येष्ठ नेते विक्रम मिसाळ, बबन कसबे, डॉ.माणिक कांबळे, कमलाकर मिसाळ, उत्तमराव मने, संपत वाघमोडे, कमलाकर मिसाळ, अभिमान मस्के, जितेंद्र मस्के, मिलिंद घाडगे, गोपाळ वैराळ, कल्पना कांबळे, यशोदा कसबे आदींसह अनेक मान्यवरांनी उपस्थित जनसमुदायाला मार्गदर्शन केले. मोठ्या संख्येने महिला व पुरुष या विराट मोर्चात सहभागी झाले होते. परळीच्या रस्त्यावरून निघालेल्या मोर्चाने आणि त्यात दिलेल्या घोषणांनी परिसर दणाणून निघाला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....