युवकांचा स्तुत्य उपक्रम....

इमेज
  महेश नवमीनिमित्त माहेश्वरी मित्र परिवारातर्फे गुरुकुलातील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप परळी वैजनाथ: प्रतिनिधी.... दरवर्षीप्रमाणे या वर्षीही महेश नवमीचा उत्सव अत्यंत उत्साहात आणि श्रद्धेने साजरा करण्यात आला. या महोत्सवाचे औचित्य साधून श्री स्वामी श्रद्धानंद गुरुकुल येथील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप करण्यात आले. युवकांच्या या कौतुकास्पद कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. हा सेवा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सिद्धांत मंत्री, केदार सारडा, हर्ष भंडारी, रुपेश बंग, अथर्व कलंत्री, अनिकेत सारडा, श्याम बजाज, यश डीडवाणी, श्रीनिवास जाजू, युवराज जाजू, गोकुल भंसाली, गणेश सोनी, तेजस इनदानी, जय तोष्णीवाल, यश लोढा तसेच समस्त माहेश्वरी मित्र परिवाराचे विशेष सहकार्य लाभले. माहेश्वरी मित्र परिवारातर्फे सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहे. समाजसेवा आणि सुसंस्कारांचे हे कार्य आपण सर्वांच्या साथीने असेच पुढे सुरू ठेवूया, असा संकल्प यावेळी करण्यात आला.

MB NEWS-शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राज्यसरकार कर्णबधिर झाले आहे - अजय मुंडे

 शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राज्यसरकार कर्णबधिर झाले आहे - अजय मुंडे



_आ. धनंजय मुंडे पालकमंत्री असताना बीड जिल्ह्यात प्रथमच सोयाबीन या पिकास 25% अग्रीम विमा रक्कम शेतकऱ्यांना देण्यात आली होती - अजय मुंडेंनी करून दिली आठवण !_


बीड...प्रतिनिधी ता.14) बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या अग्रीम पीकविमा, अनुदान, जनावरांच्या लम्पी आजारावर मुबलक लशींची उपलब्धी आदी विषयांवर आज बीड येथील शासकीय विश्राम गृहात आयोजित सर्वपक्षीय बैठकीत युवक नेते श्री. अजय मुंडे यांनी सहभाग घेत मांडले. या बैठकीस भारतीय जनता पक्ष सोडून अन्य जवळपास सर्वच पक्षांचे व शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. 


बीड जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पालकमंत्री आ. धनंजयजी मुंडे साहेब असताना, बीड जिल्ह्यात प्रथमच सोयाबीन या पिकास 25% अग्रीम विमा रक्कम शेतकऱ्यांना देण्यात आली होती, अशी आठवणही या सर्वपक्षीय बैठकीत श्री. मुंडेंनी करून दिली. आज त्याच धर्तीवर जिल्ह्यातील सर्व महसुली मंडळांमध्ये सोयाबीनसह विमा संरक्षित असलेल्या सर्वच पिकांना अग्रीम विमा मिळावा, ही प्रमुख मागणी आहे, असेही श्री. मुंडे म्हणाले.


शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर कर्णबधिर झालेल्या सरकारला शेतकऱ्यांच्या आक्रोशाची जन आंदोलनाच्या माध्यमातून जाणीव करून देण्याचे आजच्या बैठकीत नियोजन करण्यात आले आहे असेही अजय मुंडे यांनी ठणकावून सांगितले. माजी मंत्री आ. धनंजयजी मुंडे साहेब यांच्या नेतृत्वात येत्या 16 सप्टेंबर रोजी बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पीकविमा, अनुदान व अन्य विषयी सर्वपक्षीय धरणे आंदोलन पुकारण्यात आले असून, या आंदोलनात सर्व पक्षीय नेत्यांनी व शेतकरी पुत्रांनी संमिलीत व्हावे, असे आवाहनही यावेळी युवक नेते श्री. अजय मुंडे यांनी केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या