इमेज
  दिल्ली वर्ड पब्लिक स्कूलचा विद्यार्थी दिपक गोविंद गित्ते  इंटरनॅशनल 60 किलो वजन गटामध्ये ज्युडो येथे सिलेक्शन  परळी ( प्रतिनिधी) दिल्ली वर्ड पब्लिक स्कूलचा विद्यार्थी चिरंजीव दीपक गोविंदराव गित्ते यांची मध्यप्रदेश भोपाल येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी इंटरनॅशनल 60 किलो वजन गटामध्ये ज्युडो या खेळामध्ये सिलेक्शन झाल्याबद्दल शाळेचे प्रेरणास्थान मार्गदर्शक मा. श्री .किरण गित्ते साहेब IAS सचिव : सार्वजनिक बांधकाम, आरोग्य, उद्योग व वाणिज्य विभाग त्रिपुरा सरकार,  विवेकानंद युथ वेल्फेअर सोसायटीचे अध्यक्षा : सौ.उषाताई किरण गित्ते , शाळेचे मुख्याध्यापक मा. श्री. श्रीकांत पाटील सर यांनी गोविंद गित्ते कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत .  या स्पर्धा मध्य प्रदेश भोपाल येथे इंटरनॅशनल या स्पर्धा दिनांक 12 मे 2026 रोजी होणार आहेत.           मराठवाड्यातील  नामांकित दिल्ली वर्ड पब्लिक स्कूलने आतापर्यंत अनेक विद्यार्थ्यांना खेळामध्ये महाराष्ट्र व महाराष्ट्राच्या बाहेर विद्यार्थ्यांचे सिलेक्शन झाले असून आता दीपक गोविंदराव गित्ते या विद्यार्थ्य...

MB NEWS-शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राज्यसरकार कर्णबधिर झाले आहे - अजय मुंडे

 शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राज्यसरकार कर्णबधिर झाले आहे - अजय मुंडे



_आ. धनंजय मुंडे पालकमंत्री असताना बीड जिल्ह्यात प्रथमच सोयाबीन या पिकास 25% अग्रीम विमा रक्कम शेतकऱ्यांना देण्यात आली होती - अजय मुंडेंनी करून दिली आठवण !_


बीड...प्रतिनिधी ता.14) बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या अग्रीम पीकविमा, अनुदान, जनावरांच्या लम्पी आजारावर मुबलक लशींची उपलब्धी आदी विषयांवर आज बीड येथील शासकीय विश्राम गृहात आयोजित सर्वपक्षीय बैठकीत युवक नेते श्री. अजय मुंडे यांनी सहभाग घेत मांडले. या बैठकीस भारतीय जनता पक्ष सोडून अन्य जवळपास सर्वच पक्षांचे व शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. 


बीड जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पालकमंत्री आ. धनंजयजी मुंडे साहेब असताना, बीड जिल्ह्यात प्रथमच सोयाबीन या पिकास 25% अग्रीम विमा रक्कम शेतकऱ्यांना देण्यात आली होती, अशी आठवणही या सर्वपक्षीय बैठकीत श्री. मुंडेंनी करून दिली. आज त्याच धर्तीवर जिल्ह्यातील सर्व महसुली मंडळांमध्ये सोयाबीनसह विमा संरक्षित असलेल्या सर्वच पिकांना अग्रीम विमा मिळावा, ही प्रमुख मागणी आहे, असेही श्री. मुंडे म्हणाले.


शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर कर्णबधिर झालेल्या सरकारला शेतकऱ्यांच्या आक्रोशाची जन आंदोलनाच्या माध्यमातून जाणीव करून देण्याचे आजच्या बैठकीत नियोजन करण्यात आले आहे असेही अजय मुंडे यांनी ठणकावून सांगितले. माजी मंत्री आ. धनंजयजी मुंडे साहेब यांच्या नेतृत्वात येत्या 16 सप्टेंबर रोजी बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पीकविमा, अनुदान व अन्य विषयी सर्वपक्षीय धरणे आंदोलन पुकारण्यात आले असून, या आंदोलनात सर्व पक्षीय नेत्यांनी व शेतकरी पुत्रांनी संमिलीत व्हावे, असे आवाहनही यावेळी युवक नेते श्री. अजय मुंडे यांनी केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....