दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न

इमेज
  चैत्यभूमी दादर येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न बीड ,प्रतिनिधी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, चैत्यभूमी दादर (पश्चिम), मुंबई येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, हे शिबिर दि. १२ मे ते २१ मे २०२६ या कालावधीत संपन्न होणार आहे. बौद्ध धम्माचा सखोल अभ्यास करण्याची इच्छा असलेल्या विविध समाजातील धर्मांतरित बौद्ध बांधवांसाठी हे विशेष शिबिर आयोजित करण्यात आले आहे. सत्यशोधक ओबीसी परिषद, सत्यशोधक समाज महासंघ, चर्मकार संघ, अखिल भारतीय धम्म महासंघ, प्रजासत्ताक जनता परिषद तसेच इतर विविध माध्यमांतून धर्मांतरित झालेल्या ओबीसी, पूर्वाश्रमीचे मातंग, वाल्मिकी, चर्मकार, ढोर समाजातील बौद्ध बांधवांना या शिबिरात सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय डॉ. भीमराव य. आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच संस्थेचे ट्रस्टी व राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा मुंबई केंद्रीय कार्यालय प्रमुख आद. अॅड. डॉ. एस. के. भंडारे यांच्या सल्ल्याने या शिबिराचे आय...

MB NEWS-म.सा.प परळी शाखेचा उपक्रम*

 रविवारी 'कविता रंगते कोजागिरी 'त हे निमंत्रितांचे कविसंमेलन



 म.सा.प परळी शाखेचा उपक्रम

परळी वैजनाथ, दि. ०४/ १० / २०२२, (प्रतिनिधी)ः-

मराठवाडा साहित्य परिषदेच्या येथील शाखेच्या वतीने कोजागिरीनिमित्त खास परळीकर रसिकांसाठी ' कविता रंगते कोजागिरी'त या निमंत्रितांच्या कविसंमेलनाचे आयोजन रविवार दि. ०९ / १० / २०२२ रोजी सायं . ७ : ० ० वा. ' बन्सल क्लासेस माधवबाग ' येथे करण्यात आले आहे.

 या कविसंमेलनात ज्यांच्या कवितेने रसिकमनात कायमचे घर केले असे चित्रपट कलावंत ,हास्यसम्राट , विनोदाचे बादशहा *नारायण सुमंत ( पिंपळखुंटे - माढा* )* गेय अभिव्यक्ती व हास्याचे फवारे उडवत रसिक मनावर कायम अधिराज्य करणारे *राजा धर्माधिकारी ( परतवाडा )* , '' गोड गळ्याचा व सक्षम काव्यविष्कार असलेले *सखाराम डाखोरे ( मुंबई )* , स्त्री मनाचा सक्षम हुंकार आशय व अभिव्यक्तीच्या अभिन्नतेसह आविष्कृत करणाऱ्या *प्रा.डॉ. प्रतिभा अहिरे (औरंगाबाद) , उत्कृष्ट निवेदक व आपल्या रांगड्या वाणीने रसिक मनावर अमीट छाप उमटवणारे व कवितेच्या प्रांतातही आपली स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करणारे * राजेसाहेब कदम ( अहमदपूर )* व ग्रामीण जाणिवांचा सशक्त आविष्कार करणारे *प्रदीप ईक्कर* (मंठा )  हे कवी निमंत्रित करण्यात आलेले आहेत . 

हास्याचे तुषार याबरोबरच अंतर्मुख करायला लावणाऱ्या सामाजिक कविता हे या कविसंमेलनाचा प्रमुख वैशिष्ट्यपूर्ण भाग असेल.   विविध रसांची अनुभूती देता देता वाङ्मयीन गुणांनी परिपूर्ण कविता असलेल्या या निमंत्रितांच्या कविसंमेलनात परळी पंचक्रोशीतील बहुसंख्य रसिकांनी उपस्थित राहवे . असे आवाहन मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष चंदुलाल बियाणी, सचिव प्रा.डॉ. राजकुमार यल्लावाड, कार्याध्यक्ष अनंत मुंडे, उपाध्यक्ष अरुण पवार , कोषाध्यक्ष प्रा.संजय अघाव , सहसचिव सुनिता कोमावार  ,उपाध्यक्ष चेतना गौरशेटे, प्रसिद्धी प्रमुख बालाजी कांबळे  , आबासाहेब वाघमारे , प्रा. मधू जामकर ,प्रा. अर्चना चव्हाण ,सिध्देश्वर इंगोले , मुक्तविहारी ऊर्फ केशव कुकडे, विजया दहिवाळ, प्रा .सुलभा वाघमारे, प्रा .डॉ .राजाभाऊ धायगुडे , बंडू आघाव , ॲड. दत्तात्रय आंधळे, रंगनाथ मुंडे , भवानराव देशमुख, महेश होनमाने, दिवाकर जोशी , लक्ष्मण लाड , गणपत गणगोपलवाड , प्रा .नयनकुमार विशारद, प्रा.डॉ. रा .ज. चाटे , प्रा.डॉ. बापू घोलप  व त्यांच्या सहकार्‍यांनी केले आहे .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....