परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी  या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे  दर्शन घेतलं.  जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...

MB NEWS-पीक नुकसानीचे पंचनामे करून विमा मंजूर करा-किसान सभा

 पीक नुकसानीचे पंचनामे करून विमा मंजूर करा-किसान सभा


परळी / प्रतिनिधी


सलग सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांना पिक विमा देण्यात यावा व अतिवृष्टीगस्त शेतकऱ्यांना शासन स्तरावरुन मदत देण्यात यावी अशी मागणी अखिल भारतीय किसान सभेने केली आहे.


दि 11 ऑक्टोबर पासून सातत्याने परळी तालुक्यातील विविध महसूल मंडळात अतिवृष्टी होत आहे. यामुळे काढणीस आलेले काढून ठेवलेले सोयाबीन, बाजरी, इत्यादी पिकांचे तसेच वेचणीस आलेल्या कापसाचे तसेच पाणी साचून राहिल्याने तूर पिकाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून ते आणखीही पाऊस असाच पडत पडणे सुरूच आहे. या संदर्भात शेतकऱ्यांनी आपल्या पिकांचे काढणी अगोदर, काढणी समयी, वा काढणी पश्चात झालेल्या नुकसाना संदर्भातील तक्रारी 72 तासाच्या आत दाखल केलेल्या आहेत. नुकसानीचे प्रमाण व तक्रारींचे व्यापकप्रमाण पहाता पिकपंचनाम्यांच्या फेन्यांत वेळ काढू धोरण अवलंबता" च्या आधारे तातडीने अडचणीतल्या शेतकऱ्यांना पीकविम्याचे वाटप करावे व शासनाकडूनही या अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांना नियमाप्रमाणे मदत द्यावी. महावेब पोर्टल वरील पावसाच्या आकडेवारीत तफावत दिसून येत असली तरी प्रत्यक्षात खूप मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे. कुठे कुठे तर दगफुटीसदृश्य पाऊस पडला आहे. याही वास्तव बाबी लक्षात घेणे आवश्यक आहे. म्हणून अडचणीतल्या शेतकन्यांना तात्काळ पीक विमा व अतिवृष्टी मदतीचे वाटप करावे अशी मागणी अखिल भारतीय किसान सभेने निवेदनाद्वारे किसान सभेचे जिल्हा सचिव कॉ.मुरलीधर नागरगोजे, कॉ.पांडुरंग राठोड,कॉ.भगवान बडे,कॉ.बालाजी कडभाने,कॉ.ब्रम्हानंद देशमुख,कॉ.प्रवीण देशमुख,कॉ.परमेश्वर गित्ते,कॉ.विष्णू देशमुख, कॉ.संजय नवगरे आदींनी निवेदनाद्वारे परळी तहसिलदाराकडे केली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!