इमेज
 चि. यशोधन आणि कु. किरण विवाहबंधनात: मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापुरात संपन्न झाला शाही विवाह सोहळा कोल्हापूर प्रतिनिधी: परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार आणि सौ. मनिषा अवचार यांचे सुपुत्र चि. यशोधन तसेच स्मृतीशेष रवींद्र मगदूम यांची कनिष्ठ सुपुत्री कु. किरण यांचा शुभविवाह नुकताच कोल्हापूर येथील एल. डी. लोन, चिंचवड रोड येथे अतिशय थाटामाटात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला सामाजिक, राजकीय,औष्णिक वीज निर्मिती,औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले. विशेषतः, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून अवचार आणि मगदूम कुटुंबाच्या आनंदात सहभाग नोंदवला. याप्रसंगी या प्रसंगी उपमुख्य अभियंता, भास्कर इंगळे कोराडी नागपूर, नितीन रडे. मुबंई, जगदीश मोरे, नासिक तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन आरोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय उदार, थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष अंगदभा...

MB NEWS-श्री. पार्डीकर महाविद्यालयात आंतरराष्ट्रिय अहिंसा दिन साजरा

 श्री.पार्डीकर महाविद्यालयात आंतरराष्ट्रिय अहिंसा दिन साजरा

 सिरसाळा........

येथील श्री. पंडितगुरू पार्डीकर महाविद्यालयात दि. ०३/१०/२०२२ सोमवार रोजी इंग्रजी विभाग व एन एस एस विभागाच्या वतीने महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांची जयंती *"आंतरराष्ट्रिय अहिंसा दिवस"* म्हणून साजरी करण्यात आली. 

या प्रसंगी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एच. पी. कदम, प्रमुख अतिथी म्हणुन प्रा. डॉ. विष्णू चव्हाण (वैद्यनाथ महाविद्यालय परळी) तसेच महाविद्यालयातील इंग्रजी विभागप्रमुख प्रा. डॉ. अनंत जाधव, एन एस एस कार्यक्रमाधिकारी डॉ के एम नागरगोजे, डॉ जी गट्टी व प्रा विक्रम धनवे ई. मान्यवर उपस्थित होते. 

या कार्यक्रमात प्रमुख अतिथी व मान्यवरांच्या हस्ते इंग्रजी अभ्यास मंडळाचे' उदघाटन व 'Universal' या भित्तीपत्रकाचे प्रकाशन करण्यात आले. 

प्रसंगी बोलताना डॉ के एम नागरगोजे यांनी श्री लालबहादुर शास्त्री यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला.

डॉ. विष्णू चव्हाण यांनी महात्मा गांधी यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकून जगभर आंतरराष्ट्रिय अहिंसा दिवस साजरा करण्यामागचा हेतू स्पष्ट केला आणि इंग्रजांनी चालु केलेली नोकर निर्माण करणारी शिक्षण पद्धती भारतात नको असून "नई तालीम" शिक्षण पद्धती हवी असे मत गांधीजींचे होते, असे विचार माडले.

अध्यक्षीय समरोपात प्राचार्य डॉ. एच. पी. कदम यानी गांधींजीची "नई तालीम" व नविन सुरू झालेले शैक्षणीक धोरण यांचा संदर्भ जोडण्याचा प्रयत्न केला.

या कार्यक्रमात इंग्रजी विभागातील गोविंद काळे, श्रीकृष्ण सावंत, अविनाश पवार ई. विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाचे प्रस्ताविक इंग्रजी विभागप्रमुख डॉ. अनंत जाधव यांनी, सुत्र संचलन गोविंद पौळ याने, तर आभार प्रदर्शन प्रा. विक्रम धनवे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी इंग्रजी अभ्यास मंडळातील विद्यार्थी व एन एस एस विभागातील विद्यार्थी यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील विद्यार्थी, विद्यर्थिनी, प्राध्यापक, प्राध्यापिका, शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या