दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न

इमेज
  चैत्यभूमी दादर येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न बीड ,प्रतिनिधी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, चैत्यभूमी दादर (पश्चिम), मुंबई येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, हे शिबिर दि. १२ मे ते २१ मे २०२६ या कालावधीत संपन्न होणार आहे. बौद्ध धम्माचा सखोल अभ्यास करण्याची इच्छा असलेल्या विविध समाजातील धर्मांतरित बौद्ध बांधवांसाठी हे विशेष शिबिर आयोजित करण्यात आले आहे. सत्यशोधक ओबीसी परिषद, सत्यशोधक समाज महासंघ, चर्मकार संघ, अखिल भारतीय धम्म महासंघ, प्रजासत्ताक जनता परिषद तसेच इतर विविध माध्यमांतून धर्मांतरित झालेल्या ओबीसी, पूर्वाश्रमीचे मातंग, वाल्मिकी, चर्मकार, ढोर समाजातील बौद्ध बांधवांना या शिबिरात सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय डॉ. भीमराव य. आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच संस्थेचे ट्रस्टी व राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा मुंबई केंद्रीय कार्यालय प्रमुख आद. अॅड. डॉ. एस. के. भंडारे यांच्या सल्ल्याने या शिबिराचे आय...

MB NEWS-श्री. पार्डीकर महाविद्यालयात आंतरराष्ट्रिय अहिंसा दिन साजरा

 श्री.पार्डीकर महाविद्यालयात आंतरराष्ट्रिय अहिंसा दिन साजरा

 सिरसाळा........

येथील श्री. पंडितगुरू पार्डीकर महाविद्यालयात दि. ०३/१०/२०२२ सोमवार रोजी इंग्रजी विभाग व एन एस एस विभागाच्या वतीने महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांची जयंती *"आंतरराष्ट्रिय अहिंसा दिवस"* म्हणून साजरी करण्यात आली. 

या प्रसंगी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एच. पी. कदम, प्रमुख अतिथी म्हणुन प्रा. डॉ. विष्णू चव्हाण (वैद्यनाथ महाविद्यालय परळी) तसेच महाविद्यालयातील इंग्रजी विभागप्रमुख प्रा. डॉ. अनंत जाधव, एन एस एस कार्यक्रमाधिकारी डॉ के एम नागरगोजे, डॉ जी गट्टी व प्रा विक्रम धनवे ई. मान्यवर उपस्थित होते. 

या कार्यक्रमात प्रमुख अतिथी व मान्यवरांच्या हस्ते इंग्रजी अभ्यास मंडळाचे' उदघाटन व 'Universal' या भित्तीपत्रकाचे प्रकाशन करण्यात आले. 

प्रसंगी बोलताना डॉ के एम नागरगोजे यांनी श्री लालबहादुर शास्त्री यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला.

डॉ. विष्णू चव्हाण यांनी महात्मा गांधी यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकून जगभर आंतरराष्ट्रिय अहिंसा दिवस साजरा करण्यामागचा हेतू स्पष्ट केला आणि इंग्रजांनी चालु केलेली नोकर निर्माण करणारी शिक्षण पद्धती भारतात नको असून "नई तालीम" शिक्षण पद्धती हवी असे मत गांधीजींचे होते, असे विचार माडले.

अध्यक्षीय समरोपात प्राचार्य डॉ. एच. पी. कदम यानी गांधींजीची "नई तालीम" व नविन सुरू झालेले शैक्षणीक धोरण यांचा संदर्भ जोडण्याचा प्रयत्न केला.

या कार्यक्रमात इंग्रजी विभागातील गोविंद काळे, श्रीकृष्ण सावंत, अविनाश पवार ई. विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाचे प्रस्ताविक इंग्रजी विभागप्रमुख डॉ. अनंत जाधव यांनी, सुत्र संचलन गोविंद पौळ याने, तर आभार प्रदर्शन प्रा. विक्रम धनवे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी इंग्रजी अभ्यास मंडळातील विद्यार्थी व एन एस एस विभागातील विद्यार्थी यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील विद्यार्थी, विद्यर्थिनी, प्राध्यापक, प्राध्यापिका, शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....