इमेज
बीड जिल्हयातुन 1599 प्रकरणे राष्ट्रीय लोक अदालतमध्ये निकाली बीड- आज दिनांक 9 मे 2026 रोजी बीड मुख्यालयात राष्ट्रीय लोकन्यायालयाचेउद्घाटन आनंद एल.यावलकर, अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, बीड तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्या हस्ते संपन्न झाले.   सदर उदघाटन कार्यक्रमास जिल्हा न्यायाधीश-1 व्ही.एच. पाटवदकर, जिल्हा न्यायाधीश-2 एस.आर.शिंदे, तदर्थ जिल्हा न्यायाधीश-2 आर.एम नेरलीकर मुख्य न्यायदंडाधिकारी पी.आर.शिंदे व इतर न्यायिक अधिकारी तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव डाॅ.वहाब ए.सय्यद, बीड मुख्यालयातील सर्व न्यायिक अधिकारी, बीड जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष एस.जी.पिसुरे, उपाध्यक्ष आर.व्ही.देशमुख, सचिव सुभाष काळे तसेच त्यांचे सर्व पदाधिकारी, विधिज्ञ सदर उदघाटन कार्यक्रमास उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशावरूनआनंद एल. यावलकर प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण बीड यांच्या मार्गदर्शनाखाली आज दि. 9 मे 2026 रोजी पार पडलेल्या लोक न्यायालयात बीड जिल्हयातुन एकूण. 1209 प्रकरणे तडजोडीने निकाली निघाली आहेत. बीड...

MB NEWS-दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी,पीएम किसान निधीचा १२ वा हप्ता जमा होणार

 दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी,पीएम किसान निधीचा १२ वा हप्ता जमा होणार



नवी दिल्ली : पीएम किसान सन्मान निधी योजना म्हणजेच पीएम किसानच्या १२व्या हप्त्याची वाट पाहत असलेल्या लाभार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. दिवाळीपूर्वी मोदी सरकार लवकरच देशभरातील १२ कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात २००० रुपये ट्रान्सफर करणार आहे. सध्याच्या माहितीनुसार पीएम किसान योजनेचा १२वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. केंद्र सरकार १७ आणि १८ ऑक्टोबर २०२२ रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे ट्रान्सफर करण्याची शक्यता आहे. दरम्यान, पैसे हस्तांतरित करण्याच्या तारखेबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. उशीर का होतोय? योजनेतील अनियमितता टाळण्यासाठी सरकारने लाभार्थ्यांसाठी ई-केवायसी अनिवार्य केले आहे. ई-केवायसी अपडेट करण्याची शेवटची तारीख ३१ ऑगस्ट ठेवण्यात आली होती मात्र, शेतकऱ्यांचे ई-केवायसी पूर्ण झाले नसल्याने मुदतवाढ देण्यात आली. त्यामुळे शेतकऱ्यांना १२व्या हप्त्याचे पैसे मिळण्यास विलंब होत आहे. अशा परिस्थितीत ज्या शेतकऱ्यांनी अद्याप ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नसेल तर, पीएम किसान योजनेच्या वेबसाइटवर जाऊन लवकरात लवकर तुमचे ई-केवायसी पूर्ण करून घ्या, जेणेकरून त्वरित १२व्या हप्त्याची रक्कम तुमच्या खात्यात जमा होईल. यादीत तुमचे नाव आहे की नाही कसे चेक करणार.पीएम किसान सम्मान निधी योजनेंतर्गत आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या शेतकऱ्यांना सरकारकडून तीन हप्त्यांमध्ये दरवर्षी दोन हजार रुपयांची (दरवर्षी ६००० रुपये) आर्थिक मदत दिली जाते. या योजनेंतर्गत आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात एकूण ११ हप्त्याची रक्कम जमा झाली असून आता १२वा हप्ता लवकरच जमा केला जाणार आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....