मोठ्या संख्येने उपस्थित रहा....

इमेज
द्रोणाचार्य सेमी इंग्लिश स्कूल व पूजा प्राथमिक विद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे आज आयोजन परळी वैजनाथ | प्रतिनिधी द्रोणाचार्य सेमी इंग्लिश स्कूल व पूजा प्राथमिक विद्यालय, परळी वैजनाथ यांच्या वतीने २० वे वार्षिक स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले आहे. हे स्नेहसंमेलन आज  बुधवार, दि. ५ फेब्रुवारी २०२५ रोजी दुपारी ३.३० वाजता लोकनेते गोपीनाथराव मुंडे  नटराज रंग मंदिर, परळी वैजनाथ येथे संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रामलिंग राजनळे सर (माजी मुख्याध्यापक, वैद्यनाथ विद्यालय) राहणार असून उद्घाटन  गणेश गिरी (गटशिक्षणाधिकारी, गटसाधन केंद्र, परळी वै.) यांच्या हस्ते होणार आहे. या काकार्यक्रमास बाजीराव  भैय्या   धर्माधिकारी (माजी नगराध्यक्ष),  कोकणे  (विस्ताराधिकारी),  धनंजय ढोणे  (पोलीस निरीक्षक),  दिवाकर जोशी (गझलकार), प्रा. रविंद्र जोशी सर (पत्रकार,  दैनिक पुढारी),  व्यंकटेश शिंदे (नगरसेवक) हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.           स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांचे नृत...

MB NEWS-अश्विनी वैष्णव यांचा सकारात्मक प्रतिसाद ; विभागाला दिल्या तोडगा काढण्याच्या सूचना

 प्र


आष्टी-मुंबई रेल्वेसेवेसाठी खा.प्रितमताई मुंडे यांनी घेतली केंद्रीय रेल्वेमंत्र्यांची भेट



अश्विनी वैष्णव यांचा सकारात्मक प्रतिसाद ; विभागाला दिल्या तोडगा काढण्याच्या सूचना 


बीड । दि. ०३ ।

नगर-बीड-परळी रेल्वे मार्गातील नगर ते आष्टी हा साठ किमीचा पहिला टप्पा पूर्ण झाल्यानंतर आष्टी रेल्वेस्थानकावर नगर-आष्टी डेमु रेल्वे सेवेची सुरुवात करण्यात आली आहे. या मार्गावरील रेल्वेसेवेचा विस्तार करून आष्टी ते मुंबई पर्यंत प्रवासी रेल्वे सुरू करण्यात यावी अशी पुनःश्च मागणी खासदार डॉ.प्रितमताई मुंडे यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली आहे.


छत्रपती संभाजीनगर येथील विमानतळावर केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांनी भेट घेतली.बीड जिल्ह्यासाठी रेल्वेची सेवा मुंबई पर्यंत सुरू होणे जेवढे फायदेशीर आहे तेवढेच रेल्वे विभागासाठी देखील फलदायी ठरणार आहे. बीडकरांच्या हिताचा आणि रेल्वेच्या फायद्याचा सारासार विचार करून आष्टीपासून मुंबई पर्यंत प्रवासी रेल्वेवाहतूक सुरू करण्यात यावी, रेल्वे हा बीड जिल्ह्यातील प्रत्येकासाठी  जिव्हाळ्याचा विषय आहे अशी मागणी खासदार प्रितमताई मुंडे यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली आहे.


खासदार प्रितमताई मुंडे यांच्या मागणीला रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन तात्काळ तोडगा काढण्याच्या सूचना रेल्वे विभागाला दिल्या आहेत.बीड  जिल्ह्याच्या विकासासाठी रेल्वेची भूमिका महत्वाची असल्यामुळे आपण याबाबत सकारात्मक आहोत असे ही त्यांनी यावेळी सांगितले. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब  दानवे, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यावेळी उपस्थिती होते.


••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....