इमेज
  अहिल्यानगर ते बीड राज्य मार्गाच्या रुंदीकरणासाठी ९६६ कोटी रुपयांना मंजुरी ​अहिल्यानगर ते बीड या प्रमुख राज्य मार्ग क्र. १६ च्या सुधारणा व रुंदीकरणासाठी राज्य शासनाने ९६६ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. आमदारांचे स्वीय सहाय्यक विनोद रोडे यांनी यासंदर्भात अधिकृत माहिती दिली आहे. ​अहिल्यानगर ते बीड दरम्यानचा सुमारे ९६ किलोमीटर लांबीचा हा प्रमुख राज्य मार्ग अनेक वर्षांपासून अत्यंत धोकादायक आणि वळणावळणाचा बनला होता. यामुळे या मार्गावर वारंवार अपघात घडत होते. वाहनचालक, प्रवासी आणि स्थानिक नागरिकांकडून या रस्त्याच्या सुधारणेची मागणी सातत्याने केली जात होती. या पार्श्वभूमीवर आमदार धस यांनी विविध स्तरांवर प्रयत्न केले होते. ​राज्य शासनाने या आश्वासनाची पूर्तता करत टाकळी काझी ते बीड दरम्यान किमी १३/१०० ते १०९/७०० या टप्प्यातील संपूर्ण रस्त्याच्या सुधारणा कामासाठी हा निधी मंजूर केला आहे. या अंतर्गत धोकादायक वळणांचे सरळीकरण करणे, रस्त...

MB NEWS- *परळी तालुक्यात परचुंडी व परिसरात जमिनीतुन गुढ आवाज: नागरिकांचे प्रशासनाला निवेदन*

 परळी तालुक्यात परचुंडी व परिसरात जमिनीतुन गुढ आवाज: नागरिकांचे प्रशासनाला निवेदन

परळीवैजनाथ /प्रतिनिधीः 

           परळी तालुक्यातील परचुंडी मलनाथपुर परिसराला  अचानक काही क्षण जमिनीतुन गुढ आवाज व पत्रे  हादरल्याचा अनुभव आला. त्यामुळे नागरिकांत भिती निर्माण झाली आहे.दरम्यान याबाबत महसूल प्रशासन सखोल माहिती घेत आहे.
   परचुंडी मलनाथपुर परिसराला काल दि.25 पासून  जमीन  हादरली, पत्र्याचा आवाज आला व जमिनीतुन आवाज आला असे जाणवल्याचे या भागातील नागरिकांनी सांगितले. अचानक जाणवलेल्या हादर्यामुळे  नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.  मोठा हादरा व जमिनीतुन गुढ आवाज परिसरातील लोकांना ऐकायला आला. त्यामुळे परिसरातील मोठ्या प्रमाणावर लोक एकत्र झाले होते.नेमका हादरा कशामुळे बसला हे स्पष्ट झाले नाही.    

नागरीकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये....

     दरम्यान अशा काही घटना घडल्या की लगेचच सोशल नेटवर्किंग मिडियातून यासंदर्भात मिळेल त्या माहितीनुसार विविध प्रकारच्या पोस्ट मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असतात. घटनांबद्दल गांभीर्य लक्षात घेऊन माहिती दिली गेली पाहिजे परंतु फाॅरवर्ड आणि काॅपी पेस्ट च्या जमान्यात घटनेचे गांभीर्य ओळखले जात नाही. त्यामुळे नागरिकांनी  अधिकृत व खात्री करूनच माहिती पुढे प्रसारित करावी.अफवा पसरवू नये किंवा कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट