दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न

इमेज
  चैत्यभूमी दादर येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न बीड ,प्रतिनिधी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, चैत्यभूमी दादर (पश्चिम), मुंबई येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, हे शिबिर दि. १२ मे ते २१ मे २०२६ या कालावधीत संपन्न होणार आहे. बौद्ध धम्माचा सखोल अभ्यास करण्याची इच्छा असलेल्या विविध समाजातील धर्मांतरित बौद्ध बांधवांसाठी हे विशेष शिबिर आयोजित करण्यात आले आहे. सत्यशोधक ओबीसी परिषद, सत्यशोधक समाज महासंघ, चर्मकार संघ, अखिल भारतीय धम्म महासंघ, प्रजासत्ताक जनता परिषद तसेच इतर विविध माध्यमांतून धर्मांतरित झालेल्या ओबीसी, पूर्वाश्रमीचे मातंग, वाल्मिकी, चर्मकार, ढोर समाजातील बौद्ध बांधवांना या शिबिरात सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय डॉ. भीमराव य. आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच संस्थेचे ट्रस्टी व राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा मुंबई केंद्रीय कार्यालय प्रमुख आद. अॅड. डॉ. एस. के. भंडारे यांच्या सल्ल्याने या शिबिराचे आय...

MB NEWS- *परळी तालुक्यात परचुंडी व परिसरात जमिनीतुन गुढ आवाज: नागरिकांचे प्रशासनाला निवेदन*

 परळी तालुक्यात परचुंडी व परिसरात जमिनीतुन गुढ आवाज: नागरिकांचे प्रशासनाला निवेदन

परळीवैजनाथ /प्रतिनिधीः 

           परळी तालुक्यातील परचुंडी मलनाथपुर परिसराला  अचानक काही क्षण जमिनीतुन गुढ आवाज व पत्रे  हादरल्याचा अनुभव आला. त्यामुळे नागरिकांत भिती निर्माण झाली आहे.दरम्यान याबाबत महसूल प्रशासन सखोल माहिती घेत आहे.
   परचुंडी मलनाथपुर परिसराला काल दि.25 पासून  जमीन  हादरली, पत्र्याचा आवाज आला व जमिनीतुन आवाज आला असे जाणवल्याचे या भागातील नागरिकांनी सांगितले. अचानक जाणवलेल्या हादर्यामुळे  नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.  मोठा हादरा व जमिनीतुन गुढ आवाज परिसरातील लोकांना ऐकायला आला. त्यामुळे परिसरातील मोठ्या प्रमाणावर लोक एकत्र झाले होते.नेमका हादरा कशामुळे बसला हे स्पष्ट झाले नाही.    

नागरीकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये....

     दरम्यान अशा काही घटना घडल्या की लगेचच सोशल नेटवर्किंग मिडियातून यासंदर्भात मिळेल त्या माहितीनुसार विविध प्रकारच्या पोस्ट मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असतात. घटनांबद्दल गांभीर्य लक्षात घेऊन माहिती दिली गेली पाहिजे परंतु फाॅरवर्ड आणि काॅपी पेस्ट च्या जमान्यात घटनेचे गांभीर्य ओळखले जात नाही. त्यामुळे नागरिकांनी  अधिकृत व खात्री करूनच माहिती पुढे प्रसारित करावी.अफवा पसरवू नये किंवा कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....