इमेज
  अहिल्यानगर ते बीड राज्य मार्गाच्या रुंदीकरणासाठी ९६६ कोटी रुपयांना मंजुरी ​अहिल्यानगर ते बीड या प्रमुख राज्य मार्ग क्र. १६ च्या सुधारणा व रुंदीकरणासाठी राज्य शासनाने ९६६ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. आमदारांचे स्वीय सहाय्यक विनोद रोडे यांनी यासंदर्भात अधिकृत माहिती दिली आहे. ​अहिल्यानगर ते बीड दरम्यानचा सुमारे ९६ किलोमीटर लांबीचा हा प्रमुख राज्य मार्ग अनेक वर्षांपासून अत्यंत धोकादायक आणि वळणावळणाचा बनला होता. यामुळे या मार्गावर वारंवार अपघात घडत होते. वाहनचालक, प्रवासी आणि स्थानिक नागरिकांकडून या रस्त्याच्या सुधारणेची मागणी सातत्याने केली जात होती. या पार्श्वभूमीवर आमदार धस यांनी विविध स्तरांवर प्रयत्न केले होते. ​राज्य शासनाने या आश्वासनाची पूर्तता करत टाकळी काझी ते बीड दरम्यान किमी १३/१०० ते १०९/७०० या टप्प्यातील संपूर्ण रस्त्याच्या सुधारणा कामासाठी हा निधी मंजूर केला आहे. या अंतर्गत धोकादायक वळणांचे सरळीकरण करणे, रस्त...

MB NEWS-_रविवारी व्यापक बैठकीचे आयोजन_

 प्रभू वैद्यनाथ कॉरिडॉर साठी नागरिक उभारणार लढा





रविवारी व्यापक बैठकीचे आयोजन

परळी वैद्यनाथ (प्रतिनिधी)दि.29 - देशातील पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या प्रभू वैद्यनाथाच्या पावन भूमीत कॉरिडॉर व्हावे यासाठी आता नागरिक व्यापक लढा उभारणार आहेत.सध्या देशभरात वेगवेगळे धार्मिक कॉरिडॉर विकसित होत आहेत.सध्या महाराष्ट्रात मुंबई येथील मुंबादेवी मंदिर व पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिराचा समावेश आहे.याच प्रकारे प्रभू वैद्यनाथ कॉरिडॉर व्हावे म्हणून परळीतील नागरिकांनी रविवारी सर्वसमावेशक व्यापक बैठकीचे आयोजन केले आहे. 


शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या

राष्ट्रमाता जिजामाता उद्यानात ही बैठक रविवार दि.30 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वा आयोजित करण्यात आली आहे.कॉरिडॉर मध्ये मंदिरांचे “संरक्षण आणि जतन” करण्यासाठी करत आधुनिक तंत्रज्ञानाची प्राचीन श्रद्धेशी जोडण्यासाठी काम केले जाते.यामुळे परिसरातील जनतेच्या नागरिकांचा जीवनस्तर उंचावण्यासाठी मोठी मदत होते काशी विश्वनाथ, उज्जैन असे मोठे उदाहरण आहेत.या संपूर्ण प्रक्रियेत तेथील स्थानिकांना प्रचंड प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात.आता यासाठी परळी वैद्यनाथ शहर व परिसरातील नागरिक आता एकत्र येऊन शासन दरबारी आपली मागणी कायदेशीर पद्धतीने मांडणार आहेत.यासाठी सर्व नागरिकांनी या बैठकीत सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या