दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न

इमेज
  चैत्यभूमी दादर येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न बीड ,प्रतिनिधी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, चैत्यभूमी दादर (पश्चिम), मुंबई येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, हे शिबिर दि. १२ मे ते २१ मे २०२६ या कालावधीत संपन्न होणार आहे. बौद्ध धम्माचा सखोल अभ्यास करण्याची इच्छा असलेल्या विविध समाजातील धर्मांतरित बौद्ध बांधवांसाठी हे विशेष शिबिर आयोजित करण्यात आले आहे. सत्यशोधक ओबीसी परिषद, सत्यशोधक समाज महासंघ, चर्मकार संघ, अखिल भारतीय धम्म महासंघ, प्रजासत्ताक जनता परिषद तसेच इतर विविध माध्यमांतून धर्मांतरित झालेल्या ओबीसी, पूर्वाश्रमीचे मातंग, वाल्मिकी, चर्मकार, ढोर समाजातील बौद्ध बांधवांना या शिबिरात सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय डॉ. भीमराव य. आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच संस्थेचे ट्रस्टी व राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा मुंबई केंद्रीय कार्यालय प्रमुख आद. अॅड. डॉ. एस. के. भंडारे यांच्या सल्ल्याने या शिबिराचे आय...

MB NEWS-कॉ.गंगाधरअप्पा बुरांडे स्मृतिदिनाचे औचित्य

 मांडेखेल येथे पंजाबराव डख यांचे व्याख्यान



कॉ.गंगाधरअप्पा बुरांडे स्मृतिदिनाचे औचित्य


परळी / प्रतिनिधी


झुंजार स्वातंत्र्य सेनानी,बीड जिल्ह्याचे माजी खासदार, महाराष्ट्र शिक्षण संस्था मोहा संस्थापक कॉ. गंगाधरअप्पा बुरांडे यांच्या १४ व्या स्मृती दिनानिमित्त मांडेखेल येथे शुक्रवार (दि.७) रोजी हवामानाचे अचुक अंदाज वर्तविणारे हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांचे व्याख्यान होणार आहे.


परळी तालुक्यातील मांडेखेल येथील आसुबाई माध्य व उच्च विद्यालयात कॉ. गंगाधरअप्पा बुरांडे स्मृती दिनानिमित्त गुणवंत विद्यार्थांचा गुणगौरव सोहळा व पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास अचुक हमानाचा अंदाज वर्तविणारे पंजाबराव डख, प्राचार्य सुनंदा तीडके व महाराष्ट्र शिक्षण संस्थेचे सचिव अँड.अजय बुरांडे यांची प्रमुख उपस्थीती असणार आहे. कॉ गंगाधरअप्पा बुरांडे यांनी चाळीस वर्षापुर्वी मांडेखेल व परिसरातील विद्यार्थांना शिक्षणाची सोय व्हावी म्हणुन महाराष्ट्र शिक्षण संस्था संचलित आसुबाई विद्यालयाची स्थापना केली. या शाळेतुन दरवर्षी अनेक गुणवंत विद्यार्थी बाहेर पडत असतात. त्यामुळे त्यांचा सन्मान व शाळेतील उपक्रमशिल शिक्षणाची पालकांना माहीती व्हावी यासाठी शुक्रवारी (ता.७) सकाळी 11 वाजता होणाऱ्या कार्यक्रमास शाळेचे गुणवंत विद्यार्थी, सर्व पालक व परिसरातील शेतकऱ्यांनी मोठया संख्येनी उपस्थीत रहावे असे आवाहन आसुबाई विद्यालयाचे मुख्याध्यापक व शिक्षकांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....