इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

MB NEWS-परतीच्या पावसाने परळीतील मोंढ्यात पाणीच पाणी ; न.प. प्रशासनाला देणं न घेणं- आश्विन मोगरकर

 परतीच्या पावसाने परळीतील मोंढ्यात  पाणीच पाणी ;न.प. प्रशासनाला देणं न घेणं- आश्विन मोगरकर



परळी वैजनाथ

परतीच्या पावसाने परळी शहरातील मोंढा मार्केट भागात पाणीच पाणी झाले असून नगर परिषदेने रस्ते व नाल्यांचे बोगस कामे केल्यामुळे विकासकामांसाठी आलेले करोडो रुपये पाण्यातच गेले असल्याचा आरोप भाजपाचे अश्विन मोगरकर यांनी केला आहे.

परळी शहरातील महत्वाचा भाग असलेला मोंढा मार्केट भागात बुधवार दि 12 ऑक्टोबर ला दुपारी आलेल्या पावसाच्या जोरदार सडाक्यामुळे पाणीच पाणी झाले होते. नाली वर आणि रस्ते खाली अश्या पद्धतीने बांधकाम झालेल्या मोंढ्यातील रस्तावरून चक्क नदीच वहात असल्याचा भास होत होता. दुकानांच्या चौकटिपर्यंत पाणी पोचले होते. यामुळे दुकानदारांची धावपळ उडाली होती. नगरपरिषदेला कर भरणारे व्यापारी पावसाच्या साठलेल्या पाण्याने त्रस्त असताना प्रशासक असलेले मुख्याधिकारी व इतर अधिकारी मात्र आपल्या कार्यालयातून बाहेर पडण्यास सुद्धा तयार नाहीत. शहरात नगरपरिषदेत नगर रचनाकार आहे का असा प्रश्न पडावा अशी रस्ते व नाल्यांची बोगस कामे झाली आहेत असा आरोप भाजपाचे अश्विन मोगरकर यांनी केला आहे. पावसाचे पाणी नालीत न जाता रस्त्यावरूनच वहात आहे. कुठे रस्ता खाली नाली वर तर कुठे नालीचा पत्ताच नाही अशी कामे झाल्यामुळे पावसाचे पाणी दुकानात शिरत आहे. प्रशासक म्हणून सर्वाधिकार असलेल्या मुख्याधिकारी नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी शहरात फेरफटका मारल्याचे दिसून येत नाहीत. यामुळे कर्मचारी वर्गावर कुठलाही धाक नाही यामुळे शहरात नागरिक व व्यापाऱ्यांना होत असल्याच्या त्रासाला पारावर उरलेला नाही. शहरात स्वच्छतेचे तीनतेरा वाजले आहेत. नाल्या वेळेवर काढल्या जात नाहीत तर कधी काढलेला गाळ उचलला जात नाही. यामुळे दुर्गंधी पसरून डासांचा प्रचंड प्रमाणात उच्छाद वाढला आहे. मलेरिया, डेंगू व साथीच्या आजाराने नागरिक त्रस्त आहेत. धूर फवारणी, औषध फवारणी पूर्णपणे बंद आहे. या गंभीर समस्येकडे लक्ष द्यायला नगर परिषद प्रशासनाकडे वेळ नाही.

प्रशासक असलेल्या मुख्याधिकाऱ्यांनी शहरात फिरून नागरिकांच्या समस्या त्वरित जाणून घ्याव्यात व शहरातील नित्कृष्ठ व चुकीच्या झालेल्या रस्ते व नाल्याची कामे दुरुस्त करून व्यापारी व नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी भाजपाचे अश्विन मोगरकर यांनी केली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!