इमेज
  परळीत शिवसेनेचा ६० वा वर्धापन दिन उत्साहात; अभयकुमार ठक्कर यांच्या हस्ते ध्वजारोहण परळी वैजनाथ | प्रतिनिधी शिवसेनेच्या ६० व्या वर्धापन दिनानिमित्त शुक्रवार, दि. १९ जून रोजी परळी वैजनाथ येथील हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे चौकात उत्साहपूर्ण वातावरणात भगव्या ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे माजी उपजिल्हाप्रमुख तथा माजी नगराध्यक्ष अभयकुमार उर्फ पप्पू अण्णा ठक्कर यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी उपस्थित शिवसैनिकांनी "जय भवानी, जय शिवाजी", "शिवसेना जिंदाबाद", "हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो", तसेच "उद्धव साहेब तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ हैं" अशा जोरदार घोषणा देत परिसर दणाणून सोडला. घोषणांच्या गजरात संपूर्ण परिसर भगवामय झाला होता. भगव्या ध्वजाखाली एकत्र आलेल्या शिवसैनिकांनी शिवसेनेच्या विचारांशी निष्ठा राखण्याचा आणि संघटना अधिक बळकट करण्याचा निर्धार व्यक्त केला. यावेळी मार्गदर्शन करताना अभयकुमार उर्फ पप्पू अण्णा ठक्कर यांनी सर्व शिवसैनिकांना वर्ध...

MB NEWS- प्रा.टी.पी.मुंडे बांधावर : तलाठी सोबत घेऊन सरसकट पंचनामा करण्याच्या केल्या सूचना

 प्रा.टी.पी.मुंडे बांधावर : तलाठी  सोबत घेऊन सरसकट पंचनामा करण्याच्या केल्या सूचना



परळी वैजनाथ, प्रतिनिधी..

परळी तालुक्यातील मोजे संगम येथे रात्री विजेच्या कडकडाटासह अतिशय जोरदार पावसाचा कहर झाला. प्रा.टी.पी.मुंडे (सर )यांनी संगम येथे पुलाची, घरांची तसेच शेतातील पिकांची बांधावर जाऊन पाहणी केली. संगम वस्ती व गावाला जोडणाऱ्या पुलावरून अतिशय वेगाने पाणी वाहत असल्यामुळे गावचा संपर्क तुटला असून गावातील घरात पाणी शिरले आहे त्यामुळे घरात ठेवलेले सोयाबीन, कापूस, तूर इत्यादी पिके भिजवून गेली आहेत. पुन्हा एकदा संकटात सापडलेल्या शेतकऱ्यासाठी आणि नागरिकांसाठी  प्रा.टी.पी.मुंडे (सर) ॲक्शन मोडमध्ये आल्याचे पाहायला मिळाले. 


  संगम वागबेट येथील तलाठी श्रीमती गोरे मॅडम यांना सोबत घेऊन त्यांनी सर्व परिस्थितीचा आढावा घेतला तसेच पुलाची घरात भिजलेले पिके आणि शेतात जाऊन शेतकऱ्यांच्या पिकांची पाहणी केली तसेच सरसकट पंचनामा करण्याच्या सूचना तलाठी यांना दिल्या. प्रत्येक घरात जाऊन त्यांनी तेथील नागरिकांशी तसेच महिलांशी संवाद साधून त्यांचे अश्रू पुसले आणि त्यांना धीर दिला.

  रात्री झालेल्या परतीच्या पावसामुळे येथील पिकांचे घरांचे अतोनात नुकसान झाले आहे पावसाचा जोर एवढा होता की जनावरे सुद्धा बेपत्ता झाली आहेत तसेच काही गुरे पाण्यात वाहून गेली आहेत. घरामध्ये जवळपास 5 ते 6 फूट पावसाचे पाणी घुसल्याने घरामध्ये ठेवलेले सोयाबीन आणि कापूस भिजून नष्ट झाला आहे.


   संगम रोडवरील वस्ती येथे यश कन्स्ट्रक्शन कंपनीचे परळी-सोनपेठ इंजेगाव मार्गे या रस्त्याचे काम चालू आहे. संगम येथे रोडच्या बाजूने नाल्या काढल्या नसल्यामुळे पावसाचे पाणी संपूर्ण घरामध्ये गेले असून घरात असलेले सोयाबीन आणि कापूस तूर हे पिके भिजवून गेल्यामुळे त्याचा वास येत आहे आणि ते बाजारामध्ये विकण्यासही येत नाही. यश कन्स्ट्रक्शन कंपनीचे अधिकारी यांना फोन द्वारे बोलून त्यांनी रोडच्या बाजूने तात्पुरत्या स्वरूपात नाल्या करण्याच्या त्यांनी सूचना दिल्या. यावेळी विनायक गडदे, संतराम गडदे, संगमचे सरपंच हरिष नागरगोजे, युवा कार्यकर्ते पिंटू नागरगोजे,सरदारजी, दीपक नागरगोजे, आदीसह गावातील युवक जेष्ठ नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

● संबंधित व्हिडिओ बातमी पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा......


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या