ऐसा आनंद सोहळा, जगमित्र नागा पाहे डोळा”

इमेज
संत जगमित्रनागा अभंग गाथेच्या प्रकाशनानंतर संत जगमित्रनागांची जन्मभूमी पिरंगुटमध्ये स्वागत व सत्कार पिरंगुट, प्रतिनिधी : ऐतिहासिक संतभूमी पिरंगुट येथील १३व्या शतकातील संतश्रेष्ठ जगमित्र नागा महाराज यांच्या दुर्मिळ अभंगांचा अमूल्य ठेवा असलेल्या ‘संत जगमित्रनागा अभंग गाथा’ या ग्रंथाच्या प्रकाशनानंतर पिरंगुट ग्रामस्थांच्या वतीने संपादक ह.भ.प. ॲड. दत्तात्रय आंधळे यांचा स्वागत व सत्कार सोहळा उत्साहात संपन्न झाला. संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक तथा ‘संत जगमित्र नागा चरित्र’ ग्रंथाचे लेखक ह.भ.प. ॲड. दत्तात्रय आंधळे यांनी संपादित केलेल्या या गाथेमध्ये संत जगमित्रनागा महाराजांचे दुर्मिळ अभंग संकलित करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे अभंगांसोबत त्यांचा सोपा व सुबोध भावार्थही देण्यात आल्याने हा ग्रंथ वारकरी संप्रदायातील अभ्यासक, कीर्तनकार, प्रवचनकार, संशोधक आणि संत साहित्यप्रेमींसाठी महत्त्वपूर्ण संदर्भग्रंथ ठरणार आहे. यावेळी मुंबई उच्च न्यायालयाचे वकील आर. आर. सूर्यवंशी, एस. आर. सूर्यवंशी, मठाधिपती श्री गिरी महाराज, मुळशी पंचायत समिती सदस्य राहुल पवळे, पोलीस पाटील प्रकाश पवळे, माजी सरपंच चांगद...

MB NEWS- प्रा.टी.पी.मुंडे बांधावर : तलाठी सोबत घेऊन सरसकट पंचनामा करण्याच्या केल्या सूचना

 प्रा.टी.पी.मुंडे बांधावर : तलाठी  सोबत घेऊन सरसकट पंचनामा करण्याच्या केल्या सूचना



परळी वैजनाथ, प्रतिनिधी..

परळी तालुक्यातील मोजे संगम येथे रात्री विजेच्या कडकडाटासह अतिशय जोरदार पावसाचा कहर झाला. प्रा.टी.पी.मुंडे (सर )यांनी संगम येथे पुलाची, घरांची तसेच शेतातील पिकांची बांधावर जाऊन पाहणी केली. संगम वस्ती व गावाला जोडणाऱ्या पुलावरून अतिशय वेगाने पाणी वाहत असल्यामुळे गावचा संपर्क तुटला असून गावातील घरात पाणी शिरले आहे त्यामुळे घरात ठेवलेले सोयाबीन, कापूस, तूर इत्यादी पिके भिजवून गेली आहेत. पुन्हा एकदा संकटात सापडलेल्या शेतकऱ्यासाठी आणि नागरिकांसाठी  प्रा.टी.पी.मुंडे (सर) ॲक्शन मोडमध्ये आल्याचे पाहायला मिळाले. 


  संगम वागबेट येथील तलाठी श्रीमती गोरे मॅडम यांना सोबत घेऊन त्यांनी सर्व परिस्थितीचा आढावा घेतला तसेच पुलाची घरात भिजलेले पिके आणि शेतात जाऊन शेतकऱ्यांच्या पिकांची पाहणी केली तसेच सरसकट पंचनामा करण्याच्या सूचना तलाठी यांना दिल्या. प्रत्येक घरात जाऊन त्यांनी तेथील नागरिकांशी तसेच महिलांशी संवाद साधून त्यांचे अश्रू पुसले आणि त्यांना धीर दिला.

  रात्री झालेल्या परतीच्या पावसामुळे येथील पिकांचे घरांचे अतोनात नुकसान झाले आहे पावसाचा जोर एवढा होता की जनावरे सुद्धा बेपत्ता झाली आहेत तसेच काही गुरे पाण्यात वाहून गेली आहेत. घरामध्ये जवळपास 5 ते 6 फूट पावसाचे पाणी घुसल्याने घरामध्ये ठेवलेले सोयाबीन आणि कापूस भिजून नष्ट झाला आहे.


   संगम रोडवरील वस्ती येथे यश कन्स्ट्रक्शन कंपनीचे परळी-सोनपेठ इंजेगाव मार्गे या रस्त्याचे काम चालू आहे. संगम येथे रोडच्या बाजूने नाल्या काढल्या नसल्यामुळे पावसाचे पाणी संपूर्ण घरामध्ये गेले असून घरात असलेले सोयाबीन आणि कापूस तूर हे पिके भिजवून गेल्यामुळे त्याचा वास येत आहे आणि ते बाजारामध्ये विकण्यासही येत नाही. यश कन्स्ट्रक्शन कंपनीचे अधिकारी यांना फोन द्वारे बोलून त्यांनी रोडच्या बाजूने तात्पुरत्या स्वरूपात नाल्या करण्याच्या त्यांनी सूचना दिल्या. यावेळी विनायक गडदे, संतराम गडदे, संगमचे सरपंच हरिष नागरगोजे, युवा कार्यकर्ते पिंटू नागरगोजे,सरदारजी, दीपक नागरगोजे, आदीसह गावातील युवक जेष्ठ नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

● संबंधित व्हिडिओ बातमी पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा......


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या