इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

MB NEWS-शेतकऱ्यांबाबत प्रशासनाची गंभीर अनास्था: किसान सभेने आंदोलनाचे निवेदन देऊनही कार्यालयीन दिनी कृषी कार्यालय दुपारपर्यंत कुलूप बंद

शेतकऱ्यांबाबत प्रशासनाची गंभीर अनास्था: किसान सभेने आंदोलनाचे  निवेदन देऊनही कार्यालयीन दिनी कृषी कार्यालय दुपारपर्यंत कुलूप बंद



परळी / प्रतिनिधी


दिवाळी सणात शेतकऱ्यांचे विमा अग्रीम व अतिवृष्टी मदतीसाठी शिमगा आंदोलन अखिल भारतीय किसान सभेच्यावतीने परळी तालुका कृषी अधिकारी कार्यालयासमोर करण्यात आले. सुट्टी नसताना देखील तालुका कृषी कार्यालय चक्क 1 वाजता आंदोलनकर्त्यांच्या धसक्याने उघडण्यात आले.या ठिकाणी एक ही कर्मचारी उपस्थित नसल्याने आंदोलनकर्ते संतप्त झाले. परिस्थितीचे गांभीर्य पाहता शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उमाकांत कस्तुरे व त्यांचे कर्मचारी कृषी कार्यालय परिसरात डेरेदाखल झाले.


संपूर्ण जिल्ह्यातच झालेली अतिवृष्टी जून-जुलै मधील सततचा पाऊस त्यानंतरचा पावसातील मोठा खंड आणि वेगवेगळ्या रोगांचा व किडींचा प्रादुर्भाव या तावडीतून जे काही वाचलेले निम्मेशिम्मे पीक तेही ऑक्टोबर मधील अतिवृष्टीने पुरते हातून गेले आहे.अशा अवस्थेत अगोदर घोषित केलेले पंचवीस टक्के पीकविमा अग्रीम तेही शेतक-यांच्या पदरात अजूनही पडलेले नाही.या अतिवृष्टीने प्रचंड शेतकऱ्यांचे नुकसान केलेले असून त्याची दखल शासन आणि प्रशासनाने घेतली नाही. शेतकऱ्यांना लवकरात लवकर विमा अग्रिम मिळावे व अतिवृष्टी मदत मिळावी या मागण्यांना घेऊन मंगळवार दि २५ रोजी दिवाळी सणात परळी तालुका कृषी कार्यालयासमोर शिमगा आंदोलन किसान सभेकडून करण्यात आले.या आंदोलनाचे निवेदन कल्पना देऊन ही तालुक्यातील कृषी कार्यालय चक्क दुपारी 1 वाजेपर्यंत कुलूप बंद असल्याने आंदोलनकर्ते संतप्त झाले आहेत.कृषी अधिकारी,पीक विमा कंपनी व ईडी सरकार विरोधात आंदोलनकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करीत आपला आक्रोश व्यक्त केला.दरम्यान  आंदोलन कर्त्यांच्या धास्तीने धावत-पळत आलेल्या कृषी अधिकारी यांनी दि 28 तारखेपर्यंत पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करून शासनास अहवाल सादर करू असे लेखी आश्वासन आंदोलनकर्त्याना दिल्यानंतर हे शेतकऱ्यांचे शिमगा आंदोलन मागे घेण्यात आले.यावेळी किसान सभेचे जिल्हा सचिव कॉ.अजय बुरांडे, जिल्हाक्षक कॉ. मुरलीधर नागरगोजे,कॉ. पांडुरंग राठोड, कॉ. भगवान बड़े,कॉ. कांबळे आबा कॉ. विष्णू देशमुख,कॉ. रूस्तुम माने,कॉ. मुक्तेश्वर कडभाने,कॉ. राजेभाऊ गडदे,कॉ. बालासाहेब पौळ,कॉ. धनंजय सोळके,कॉ. माऊली मुठाळ,कॉ. अशोक नागरगोजे,कॉ. अंकुश उबाळे,कॉ. रमेश देवकते,कॉ. सखाराम देवळे यांच्यासह अनेक शेतकरी, शेतकरी पुत्र उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!