इमेज
  अहिल्यानगर ते बीड राज्य मार्गाच्या रुंदीकरणासाठी ९६६ कोटी रुपयांना मंजुरी ​अहिल्यानगर ते बीड या प्रमुख राज्य मार्ग क्र. १६ च्या सुधारणा व रुंदीकरणासाठी राज्य शासनाने ९६६ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. आमदारांचे स्वीय सहाय्यक विनोद रोडे यांनी यासंदर्भात अधिकृत माहिती दिली आहे. ​अहिल्यानगर ते बीड दरम्यानचा सुमारे ९६ किलोमीटर लांबीचा हा प्रमुख राज्य मार्ग अनेक वर्षांपासून अत्यंत धोकादायक आणि वळणावळणाचा बनला होता. यामुळे या मार्गावर वारंवार अपघात घडत होते. वाहनचालक, प्रवासी आणि स्थानिक नागरिकांकडून या रस्त्याच्या सुधारणेची मागणी सातत्याने केली जात होती. या पार्श्वभूमीवर आमदार धस यांनी विविध स्तरांवर प्रयत्न केले होते. ​राज्य शासनाने या आश्वासनाची पूर्तता करत टाकळी काझी ते बीड दरम्यान किमी १३/१०० ते १०९/७०० या टप्प्यातील संपूर्ण रस्त्याच्या सुधारणा कामासाठी हा निधी मंजूर केला आहे. या अंतर्गत धोकादायक वळणांचे सरळीकरण करणे, रस्त...

MB NEWS- ■ राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान चे प्रकल्प उपसंचालक श्याम पटवारी यांची टोकवाडी येथे भेट

 ■ राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान चे प्रकल्प उपसंचालक श्याम पटवारी यांची टोकवाडी येथे भेट

गावाच्या विकासात टोकवाडीने आदर्श निर्माण केला आहे- श्याम पटवारी 


परळी वैजनाथ, प्रतिनिधी...

         राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान चे राज्य प्रकल्प संचालक श्याम पटवारी यांनी परळी तालुक्यातील आदर्श गाव असलेल्या टोकवाडी येथे भेट देऊन विविध विकास कामांची पाहणी केली. या पाहणीनंतर समाधान व्यक्त करत त्यांनी गावाच्या विकासात टोकवाडीने आदर्श निर्माण केला असल्याचे गौरव उद्गार काढले.

         राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान महाराष्ट्र राज्याचे प्रकल्प उपसंचालक श्री. श्याम पटवारी यांनी टोकवाडी येथे भेट दिली. यावेळी त्यांनी गावातील स्वच्छता अभियान, घनदाट जंगल, आरो वाॅटर प्रकल्प, मोफत पिठाची गिरणी, सुंदर व बोलकी शाळा सार्वजनिक स्मशानभूमी, बायोगॅस युनिट, हॅन्ड वॉश सेंटर, ग्रामपंचायत कार्यालय आदी ठिकाणी भेटी देऊन झालेल्या उत्कृष्ट कामाचे कौतुक केले. श्री शाम पटवारी यांचा ग्रामपंचायत व गावकऱ्यांच्या वतीने ह्रदय सत्कार करण्यात आला. यावेळी प्रास्ताविकपर मनोगत व्यक्त करताना श्री. वरद गणेश मंडळाचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य डॉ. राजाराम मुंडे यांनी ग्रामपंचायत मार्फत टोकवाडी येथे सुरू असलेल्या विविध विकास कामांची व उपक्रमांची सविस्तर माहिती दिली. यावेळी बोलताना राज्य प्रकल्प उपसंचालक श्याम पटवारी यांनी टोकवाडी ग्रामपंचायतच्या माध्यमातून होत असलेल्या कामाचे कौतुक केले. त्याचप्रमाणे ग्रामीण भागात टोकवाडीच्या शाळेला आलेले हे रूप एखाद्या उत्कृष्ट खाजगी संस्थेच्या शाळेप्रमाणे असल्याचे ते म्हणाले. त्याचबरोबर गावातील आर ओ वॉटर, वनराई, स्वच्छ व सुंदर गावाची संकल्पना राबविण्याचे प्रयत्न आदी सर्वच कामे उत्कृष्ट असून इतर गावांनाही या कामांचा आदर्श वाटावा असे कार्य असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले.

        या कार्यक्रमास पंचायत समिती माजी सभापती बालाजी (पिंटू) मुंडे, टोकवाडीच्या सरपंच सौ. गोदावरीताई राजाराम मुंडे, उपसरपंच उषाताई रोडे, अश्रुबा काळे, भानूबापू मुंडे, ग्रामसेविका सुनीता रांजणकर, ग्रामपंचायत सदस्य, आशा वर्कर्स, स्वच्छता कर्मचारी, अंगणवाडी शिक्षिका, ग्रामपंचायत कर्मचारी आदींसह गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाम आघाव सर यांनी केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या