दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न

इमेज
  चैत्यभूमी दादर येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न बीड ,प्रतिनिधी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, चैत्यभूमी दादर (पश्चिम), मुंबई येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, हे शिबिर दि. १२ मे ते २१ मे २०२६ या कालावधीत संपन्न होणार आहे. बौद्ध धम्माचा सखोल अभ्यास करण्याची इच्छा असलेल्या विविध समाजातील धर्मांतरित बौद्ध बांधवांसाठी हे विशेष शिबिर आयोजित करण्यात आले आहे. सत्यशोधक ओबीसी परिषद, सत्यशोधक समाज महासंघ, चर्मकार संघ, अखिल भारतीय धम्म महासंघ, प्रजासत्ताक जनता परिषद तसेच इतर विविध माध्यमांतून धर्मांतरित झालेल्या ओबीसी, पूर्वाश्रमीचे मातंग, वाल्मिकी, चर्मकार, ढोर समाजातील बौद्ध बांधवांना या शिबिरात सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय डॉ. भीमराव य. आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच संस्थेचे ट्रस्टी व राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा मुंबई केंद्रीय कार्यालय प्रमुख आद. अॅड. डॉ. एस. के. भंडारे यांच्या सल्ल्याने या शिबिराचे आय...

MB NEWS- ■ राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान चे प्रकल्प उपसंचालक श्याम पटवारी यांची टोकवाडी येथे भेट

 ■ राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान चे प्रकल्प उपसंचालक श्याम पटवारी यांची टोकवाडी येथे भेट

गावाच्या विकासात टोकवाडीने आदर्श निर्माण केला आहे- श्याम पटवारी 


परळी वैजनाथ, प्रतिनिधी...

         राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान चे राज्य प्रकल्प संचालक श्याम पटवारी यांनी परळी तालुक्यातील आदर्श गाव असलेल्या टोकवाडी येथे भेट देऊन विविध विकास कामांची पाहणी केली. या पाहणीनंतर समाधान व्यक्त करत त्यांनी गावाच्या विकासात टोकवाडीने आदर्श निर्माण केला असल्याचे गौरव उद्गार काढले.

         राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान महाराष्ट्र राज्याचे प्रकल्प उपसंचालक श्री. श्याम पटवारी यांनी टोकवाडी येथे भेट दिली. यावेळी त्यांनी गावातील स्वच्छता अभियान, घनदाट जंगल, आरो वाॅटर प्रकल्प, मोफत पिठाची गिरणी, सुंदर व बोलकी शाळा सार्वजनिक स्मशानभूमी, बायोगॅस युनिट, हॅन्ड वॉश सेंटर, ग्रामपंचायत कार्यालय आदी ठिकाणी भेटी देऊन झालेल्या उत्कृष्ट कामाचे कौतुक केले. श्री शाम पटवारी यांचा ग्रामपंचायत व गावकऱ्यांच्या वतीने ह्रदय सत्कार करण्यात आला. यावेळी प्रास्ताविकपर मनोगत व्यक्त करताना श्री. वरद गणेश मंडळाचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य डॉ. राजाराम मुंडे यांनी ग्रामपंचायत मार्फत टोकवाडी येथे सुरू असलेल्या विविध विकास कामांची व उपक्रमांची सविस्तर माहिती दिली. यावेळी बोलताना राज्य प्रकल्प उपसंचालक श्याम पटवारी यांनी टोकवाडी ग्रामपंचायतच्या माध्यमातून होत असलेल्या कामाचे कौतुक केले. त्याचप्रमाणे ग्रामीण भागात टोकवाडीच्या शाळेला आलेले हे रूप एखाद्या उत्कृष्ट खाजगी संस्थेच्या शाळेप्रमाणे असल्याचे ते म्हणाले. त्याचबरोबर गावातील आर ओ वॉटर, वनराई, स्वच्छ व सुंदर गावाची संकल्पना राबविण्याचे प्रयत्न आदी सर्वच कामे उत्कृष्ट असून इतर गावांनाही या कामांचा आदर्श वाटावा असे कार्य असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले.

        या कार्यक्रमास पंचायत समिती माजी सभापती बालाजी (पिंटू) मुंडे, टोकवाडीच्या सरपंच सौ. गोदावरीताई राजाराम मुंडे, उपसरपंच उषाताई रोडे, अश्रुबा काळे, भानूबापू मुंडे, ग्रामसेविका सुनीता रांजणकर, ग्रामपंचायत सदस्य, आशा वर्कर्स, स्वच्छता कर्मचारी, अंगणवाडी शिक्षिका, ग्रामपंचायत कर्मचारी आदींसह गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाम आघाव सर यांनी केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....