दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न

इमेज
  चैत्यभूमी दादर येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न बीड ,प्रतिनिधी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, चैत्यभूमी दादर (पश्चिम), मुंबई येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, हे शिबिर दि. १२ मे ते २१ मे २०२६ या कालावधीत संपन्न होणार आहे. बौद्ध धम्माचा सखोल अभ्यास करण्याची इच्छा असलेल्या विविध समाजातील धर्मांतरित बौद्ध बांधवांसाठी हे विशेष शिबिर आयोजित करण्यात आले आहे. सत्यशोधक ओबीसी परिषद, सत्यशोधक समाज महासंघ, चर्मकार संघ, अखिल भारतीय धम्म महासंघ, प्रजासत्ताक जनता परिषद तसेच इतर विविध माध्यमांतून धर्मांतरित झालेल्या ओबीसी, पूर्वाश्रमीचे मातंग, वाल्मिकी, चर्मकार, ढोर समाजातील बौद्ध बांधवांना या शिबिरात सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय डॉ. भीमराव य. आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच संस्थेचे ट्रस्टी व राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा मुंबई केंद्रीय कार्यालय प्रमुख आद. अॅड. डॉ. एस. के. भंडारे यांच्या सल्ल्याने या शिबिराचे आय...

MB NEWS-परळी तालुक्यात बालविवाह मुक्त भारत अभियान

 परळी तालुक्यात बालविवाह मुक्त भारत अभियान



कैलास सत्यार्थी चिल्ड्रेन फाऊंडेशन,संत गाडगे महाराज सेवाभावी संस्था यांचा उपक्रम            

 परळी वैजनाथ,दि.17( प्रतिनिधी ) कैलास सत्यार्थी चिल्ड्रेन्स फाऊंडेशन , दिल्ली व संत गाडगे महाराज सेवाभावी संस्था,लिंबुटा ता.परळी जि.बीड यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दि.16आक्टोबर 2022 रोजी परळी तालुक्यातील अनेक गा्वांमध्ये कैंडल मार्च काढून बालविवाह मुक्त भारत अभियान राबविण्यात आले.बालविवाह म्हणजे काय, बालविवाहाचे दुष्परिणाम ,आरोग्यविषयक निर्माण होणा-या  समस्या आदी विषयांवर या जनजागृती रैलिच्या पार्श्वभुमीवर मार्गदर्शन करण्यात आले.महिला,मुले, पुरुष आणि काही ठिकाणी वृध्द अशा सर्वांनी या अभियानात आपले योगदान दिले.परळी तालुक्यातील सरफराजपूर,करेवाडी ,वडखेल ,सेलू (स),परचुंडी, देशमुख टाकळी यासह दहा ते अकरा गावांमध्ये हे बालविवाह मुक्त भारत अभियान राबविण्यात आले.
         सन२०११च्या जनगननेेनुसार  महाराष्ट्रात 11लाख 60 हजार 665 बालविवाह झाले आहेत.देशातील एकूण बालविवाहापैकी ते 10 टक्के होते.बालविवाहाच्या बाबतीत महाराष्ट्र देशात चौथ्या क्रमांकावर आहे.एका सर्वेक्षणानुसार देशातील 20ते 24 वर्ष वयोगटातील23.3 टक्के महिला अशा आहेत, ज्यांचे बालविवाह झाले आहेत. बालविवाहा सारखी सामाजिक दुष्पृवृती संपुष्टात आणणे हा या बालविवामुक्त भारत अभियानाचा उद्देश आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....