इमेज
 चि. यशोधन आणि कु. किरण विवाहबंधनात: मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापुरात संपन्न झाला शाही विवाह सोहळा कोल्हापूर प्रतिनिधी: परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार आणि सौ. मनिषा अवचार यांचे सुपुत्र चि. यशोधन तसेच स्मृतीशेष रवींद्र मगदूम यांची कनिष्ठ सुपुत्री कु. किरण यांचा शुभविवाह नुकताच कोल्हापूर येथील एल. डी. लोन, चिंचवड रोड येथे अतिशय थाटामाटात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला सामाजिक, राजकीय,औष्णिक वीज निर्मिती,औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले. विशेषतः, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून अवचार आणि मगदूम कुटुंबाच्या आनंदात सहभाग नोंदवला. याप्रसंगी या प्रसंगी उपमुख्य अभियंता, भास्कर इंगळे कोराडी नागपूर, नितीन रडे. मुबंई, जगदीश मोरे, नासिक तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन आरोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय उदार, थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष अंगदभा...

MB NEWS-परळी तालुक्यात बालविवाह मुक्त भारत अभियान

 परळी तालुक्यात बालविवाह मुक्त भारत अभियान



कैलास सत्यार्थी चिल्ड्रेन फाऊंडेशन,संत गाडगे महाराज सेवाभावी संस्था यांचा उपक्रम            

 परळी वैजनाथ,दि.17( प्रतिनिधी ) कैलास सत्यार्थी चिल्ड्रेन्स फाऊंडेशन , दिल्ली व संत गाडगे महाराज सेवाभावी संस्था,लिंबुटा ता.परळी जि.बीड यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दि.16आक्टोबर 2022 रोजी परळी तालुक्यातील अनेक गा्वांमध्ये कैंडल मार्च काढून बालविवाह मुक्त भारत अभियान राबविण्यात आले.बालविवाह म्हणजे काय, बालविवाहाचे दुष्परिणाम ,आरोग्यविषयक निर्माण होणा-या  समस्या आदी विषयांवर या जनजागृती रैलिच्या पार्श्वभुमीवर मार्गदर्शन करण्यात आले.महिला,मुले, पुरुष आणि काही ठिकाणी वृध्द अशा सर्वांनी या अभियानात आपले योगदान दिले.परळी तालुक्यातील सरफराजपूर,करेवाडी ,वडखेल ,सेलू (स),परचुंडी, देशमुख टाकळी यासह दहा ते अकरा गावांमध्ये हे बालविवाह मुक्त भारत अभियान राबविण्यात आले.
         सन२०११च्या जनगननेेनुसार  महाराष्ट्रात 11लाख 60 हजार 665 बालविवाह झाले आहेत.देशातील एकूण बालविवाहापैकी ते 10 टक्के होते.बालविवाहाच्या बाबतीत महाराष्ट्र देशात चौथ्या क्रमांकावर आहे.एका सर्वेक्षणानुसार देशातील 20ते 24 वर्ष वयोगटातील23.3 टक्के महिला अशा आहेत, ज्यांचे बालविवाह झाले आहेत. बालविवाहा सारखी सामाजिक दुष्पृवृती संपुष्टात आणणे हा या बालविवामुक्त भारत अभियानाचा उद्देश आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट